शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

अकरावीची प्रवेश संख्या अनअपडेट

By admin | Updated: June 15, 2017 00:41 IST

केंद्रीय व राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर झाला. शालांत प्रमाणपत्र परीक्षेत १५ हजार १३१ तर

शिक्षणातील मागासलेपण : पत्राला पाठ महेश सायखेडे । लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : केंद्रीय व राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर झाला. शालांत प्रमाणपत्र परीक्षेत १५ हजार १३१ तर सीबीएसई बोर्डाचे अडीच ते तीन हजारांवर विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आता १८ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याकरिता कनिष्ठ महाविद्यालयात तेवढ्या तुकड्या आहेत काय, हा प्रश्नच आहे. सध्या याबाबत शिक्षण विभागही अनभिज्ञ असून २०१३ पासून तुकड्या व महाविद्यालयांची संख्या अपडेटच केली नसल्याचे समोर आले आहे. निकालानंतर चांगल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून प्रत्येक पालक, विद्यार्थी धावपळ करताना दिसतात; पण जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील (माध्यमिक) कनिष्ठ महाविद्यालयाच्या मंजूर तुकड्यांसह पटसंख्येची माहितीच २०१३-१४ पासून अपडेट करण्यात आलेली नाही. ही माहिती अपडेट व्हावी म्हणून ६ जूनच्या पत्रान्वये जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांकडून आवश्यक माहिती मागविण्यात आली होती; पण केवळ १० टक्केच कनिष्ठ महाविद्यालयांनी ही माहिती पाठविल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत जिल्ह्यातील १५ हजार १३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हे विद्यार्थी विज्ञान, वाणिज्य, कला, संयुक्त आदी विभागाचे शिक्षण पूढे घेणार आहे. आपल्या पाल्याला नामवंत कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून प्रत्येक पालक धडपड करताना दिसतो. आवश्यक कागदपत्रांची जुळवा-जुळवही ते करताना दिसतात; पण जि.प. शिक्षण विभागाकडे कनिष्ठ महाविद्यालयाच्या मंजूर तुकड्या व पटसंख्येची माहितीच अपडेट नाही. जिल्ह्यात सध्या विना अनुदानित ३४, स्वयं अर्थसहायीत १७, अनुदानित ८२ शाळा आहेत. तसेच विना अनुदानित १३ व अनुदानित १२ महाविद्यालये आहे. यात २० टक्के प्रवेशासाठी शिक्षण विभागाची मान्यता घेणे क्रमप्राप्त आहे. कला, वाणिज्य, विज्ञान व इतर विभागाच्या किती शाळा, प्रवेश क्षमता किती ही माहिती अद्ययावत व्हावी म्हणून कनिष्ठ महाविद्यालयांना पत्र दिले; पण त्यांनीही पत्राला केराची टोपली दाखविली. या प्रकारामुळे पुन्हा एकदा जि.प.चा शिक्षण विभाग किती मागासला आहे, हे समोर आले. तुकड्यांबाबत साशंकता मागील वर्षी १७ हजार ६६० विद्यार्थ्यांनी अकरावीमध्ये प्रवेश घेतले होते. यंदा या प्रवेश संख्येत घट झाली की वाढ, हे कळण्यास वाव नाही. अद्याप कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेश संख्येची निश्चिती केली नाही. यामुळे २०१७-१८ सत्रातील १८ हजारांवर विद्यार्थ्यांना सुरळीत प्रवेश मिळणार की नाही, याबाबत साशंकता आहे. महाविद्यालयांना केलेल्या प्रवेशबंदीचा अकरावी प्रवेशावर परिणाम नसला तरी अनिश्चितता आहे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या मंजूर तुकड्या तसेच पटसंख्येची माहिती अपडेट व्हावी म्हणून जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना पत्र पाठविण्यात आले आहे. पत्रात नमूद केलेली माहिती त्वरित पाठविणे क्रमप्राप्त असताना अद्याप बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयांनी माहिती पाठविलेली नाही. सदर प्रकरणी योग्य कार्यवाही करण्यात येईल. - एस.आर. मेश्राम, उपशिक्षणाधिकारी (माध्य.), जि.प. वर्धा.