शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

विदेशवारी करून परतलेल्या सहा व्यक्तींवर प्रशासनाचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 05:00 IST

ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात विदेशवारी करून परतलेल्या प्रत्येक व्यक्तीवर जिल्हा प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत सहा व्यक्ती विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतले असून त्यापैकी तीन व्यक्ती मुंबई, दोन हैदराबाद तर एक दिल्ली येथील विमानतळावर उतरल्यानंतर वर्धा जिल्ह्यात आलेत. असे असले तरी या सर्व व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात सहा व्यक्ती परतले आहेत. या सहा व्यक्तींमध्ये तीन पुरुष तर तीन महिलांचा समावेश असून या सहाही व्यक्तींची आरटीपीसीआर पद्धतीने कोविड चाचणी केली असता त्यांचा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. असे असले तरी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना केंद्रस्थानी ठेवून या सहाही व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शिवाय त्यांची वेळोवेळी कोविड टेस्ट केली जाणार असून कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांचे स्वॅब पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. एकूणच विदेशवारी करून जिल्ह्यात परतलेल्या या व्यक्तींवर जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा बारकाईने लक्ष आहे. मुंबई, हैदराबाद अन् दिल्ली होत परतले वर्ध्यात-    ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात विदेशवारी करून परतलेल्या प्रत्येक व्यक्तीवर जिल्हा प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत सहा व्यक्ती विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतले असून त्यापैकी तीन व्यक्ती मुंबई, दोन हैदराबाद तर एक दिल्ली येथील विमानतळावर उतरल्यानंतर वर्धा जिल्ह्यात आलेत. असे असले तरी या सर्व व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आहे.-    या व्यक्तींवर आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचे लक्ष असून त्यांची विलगीकरण कालावधीत वेळोवेळी कोविड चाचणी केली जाणार आहे. जर कुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास पॉझिटिव्ह व्यक्तीचे स्वॅब ओमायकॉनची शहानिशा करण्यासाठी पुणे येथे पाठविले जाणार आहे.

विदेशवारी करून आलेल्यांत वर्धेतील सर्वाधिक -   विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतलेल्यांमध्ये वर्धा शहरातील चार, हिंगणघाट येथील एक तर वर्धा शहराशेजारील नालवाडी येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. या सर्व व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असला तरी त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

दोघांनीच घेतली आहे कोविडची व्हॅक्सिन-    विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतलेल्या सहा व्यक्तींमध्ये तीन महिला तर तीन पुरुषांचा समावेश आहे. या सहापैकी केवळ दोन व्यक्तींचीच कोविडची प्रतिबंधात्मक लस घेतली असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आले आहे.

पाचव्या आणि दहाव्या दिवशी होणार पुन्हा कोविड चाचणी-    विदेशवारी करून परतलेल्यांची विलगीकरण कालावधीत पाचव्या दिवशी तसेच दहाव्या दिवशी आरटीपीसीआर पद्धतीने कोविड चाचणी केली जाणार आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्याकडून शासनाच्या सूचनांचे पालन करून घेतले जाणार आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन