शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

विदेशवारी करून परतलेल्या सहा व्यक्तींवर प्रशासनाचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 05:00 IST

ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात विदेशवारी करून परतलेल्या प्रत्येक व्यक्तीवर जिल्हा प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत सहा व्यक्ती विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतले असून त्यापैकी तीन व्यक्ती मुंबई, दोन हैदराबाद तर एक दिल्ली येथील विमानतळावर उतरल्यानंतर वर्धा जिल्ह्यात आलेत. असे असले तरी या सर्व व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात सहा व्यक्ती परतले आहेत. या सहा व्यक्तींमध्ये तीन पुरुष तर तीन महिलांचा समावेश असून या सहाही व्यक्तींची आरटीपीसीआर पद्धतीने कोविड चाचणी केली असता त्यांचा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. असे असले तरी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना केंद्रस्थानी ठेवून या सहाही व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शिवाय त्यांची वेळोवेळी कोविड टेस्ट केली जाणार असून कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांचे स्वॅब पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. एकूणच विदेशवारी करून जिल्ह्यात परतलेल्या या व्यक्तींवर जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा बारकाईने लक्ष आहे. मुंबई, हैदराबाद अन् दिल्ली होत परतले वर्ध्यात-    ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात विदेशवारी करून परतलेल्या प्रत्येक व्यक्तीवर जिल्हा प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत सहा व्यक्ती विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतले असून त्यापैकी तीन व्यक्ती मुंबई, दोन हैदराबाद तर एक दिल्ली येथील विमानतळावर उतरल्यानंतर वर्धा जिल्ह्यात आलेत. असे असले तरी या सर्व व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आहे.-    या व्यक्तींवर आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचे लक्ष असून त्यांची विलगीकरण कालावधीत वेळोवेळी कोविड चाचणी केली जाणार आहे. जर कुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास पॉझिटिव्ह व्यक्तीचे स्वॅब ओमायकॉनची शहानिशा करण्यासाठी पुणे येथे पाठविले जाणार आहे.

विदेशवारी करून आलेल्यांत वर्धेतील सर्वाधिक -   विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतलेल्यांमध्ये वर्धा शहरातील चार, हिंगणघाट येथील एक तर वर्धा शहराशेजारील नालवाडी येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. या सर्व व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असला तरी त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

दोघांनीच घेतली आहे कोविडची व्हॅक्सिन-    विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतलेल्या सहा व्यक्तींमध्ये तीन महिला तर तीन पुरुषांचा समावेश आहे. या सहापैकी केवळ दोन व्यक्तींचीच कोविडची प्रतिबंधात्मक लस घेतली असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आले आहे.

पाचव्या आणि दहाव्या दिवशी होणार पुन्हा कोविड चाचणी-    विदेशवारी करून परतलेल्यांची विलगीकरण कालावधीत पाचव्या दिवशी तसेच दहाव्या दिवशी आरटीपीसीआर पद्धतीने कोविड चाचणी केली जाणार आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्याकडून शासनाच्या सूचनांचे पालन करून घेतले जाणार आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन