शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

सातव्या दिवशीही प्रशासन स्तब्धच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 22:04 IST

थकित वेतनाच्या मागणीसाठी दि वर्धा जिल्हा देखरेख सहकारी संस्था मर्या. वर्धा अंतर्गत येणाऱ्या गटसचिवांनी गुरूवार ७ जून पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर बुधवारी आंदोलनाच्या सातव्या दिवशीही तोडगा न निघाल्याने सदर आंदोलन सुरूच होते.

ठळक मुद्देआंदोलनकर्त्यांचा आरोप : गटसचिवांचे बेमुदत उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : थकित वेतनाच्या मागणीसाठी दि वर्धा जिल्हा देखरेख सहकारी संस्था मर्या. वर्धा अंतर्गत येणाऱ्या गटसचिवांनी गुरूवार ७ जून पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर बुधवारी आंदोलनाच्या सातव्या दिवशीही तोडगा न निघाल्याने सदर आंदोलन सुरूच होते. सात दिवस लोटूनही ढिम्म जिल्हा प्रशासन मागण्यांवर तोडगा काढण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.दि वर्धा जिल्हा देखरेख सहकारी संस्था मर्या. वर्धा अंतर्गत काम करणारे ७९ गटसचिव तसेच चार कर्मचाºयांना गत तीन वर्षांपासून वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम ७९ (१) अन्वये कलम ६९ (ख) नुसार जिल्हा देखरेख मार्फत नियुक्त केलेल्या गटसचिवांचे वेतनापोटी द्यावयाची १.२५ पट रक्कम जिल्हा देखरेख सहकारी संस्थेच्या खात्यात किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्यात दरमहा १० तारखेपर्यंत जमा करावी. ज्या संस्था वेतनाची रक्कम या पद्धतीने जमा करणार नाही. त्यांच्याबाबत जिल्हा बँकेने जिल्हास्तरीय समितीच्या शिफारशीनुसार संबंधित संस्थेच्या बँक खात्याला रक्कम नावे टाकून जिल्हा देखरेख सहकारी संस्थेच्या खात्यात जमा करावी, अशा सुचना असताना त्याकडे दुर्लक्ष करीत गटसचिवांचे वेतन अडविण्यात आले. हे धोरण चुकीचे असून गटसचिवांना तात्काळ त्यांना वेतन देण्यात यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी आंदोलनाच्या सातव्या दिवशी जिल्हाकचेरीसमोर धरणे देत रेटून लावली. आंदोलनात मोठ्या संख्येने गटसचिव सहभागी झाले होते. माजी आमदार राजू तिमांडे यांनी आज उपोषण मंडपाला भेट देवून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.महिला काँग्रेसने जाहीर केला पाठींबावर्धा जिल्हा देखरेख सहकारी संस्था मर्या. वर्धा अंतर्गत कार्यरत गटसचिवांना त्यांचे तीन वर्षांचे थकित मिळालेच पाहिजे. त्यांनी ज्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे त्या मागण्या रास्त आहेत. या आंदोलनाला महिला काँग्रेस पाठींबा जाहीर करीत असून संबंधितांनी मागण्यांच्या सोडवणुकीसाठी तात्काळ योग्य पावले उचलावित, अशी मागणी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर पाठींब्याबाबतचे पत्र त्यांनी त्यांच्या खासगी सचिवांमार्फत आंदोलनकर्त्यांना सादर केले आहे. सदर पत्र काँग्रेसचे सुधीर पांगुळ यांनी एच.सी. बुचे, जी.बी. महाजन, ए.जी. बोरकर, जी.एम. डहाके, डी. वाय. घोडमारे, पी.एम. काळे यांच्या स्वाधीन केले.