शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

मलनिस्सारणमुळे अडली सिमेंटीकरणाची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 23:26 IST

शहरात नगरपालिकेच्यावतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नियंत्रणाखाली अमृत योजनेंतर्गत मलनिस्सारण योजनेचे काम सुरु आहे. या कामाकरिता सिमेंटचे पक्के रस्ते फोडून पाईपलाईन टाकण्यात आल्याने सुरुवातीपासून ही योजना वादग्रस्त ठरली.

ठळक मुद्देआता रस्ता फोडण्यास मनाई : सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात नगरपालिकेच्यावतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नियंत्रणाखाली अमृत योजनेंतर्गत मलनिस्सारण योजनेचे काम सुरु आहे. या कामाकरिता सिमेंटचे पक्के रस्ते फोडून पाईपलाईन टाकण्यात आल्याने सुरुवातीपासून ही योजना वादग्रस्त ठरली. कंत्राटदाराने मनमर्जीने काम चालविल्याने शहरातील अर्थसंकल्पीय कामे रेंगाळली आहे. याचाच फटका महात्मा गांधी चौक ते बसस्थानकापर्यंतच्या कामाला बसला आहे. त्यामुळे आता मलनिस्सारण योजनेकरिता रस्ता फोडण्याची परवानगी देणार नाही, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने नगरपालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला पत्राव्दारे दिल्या आहे.शहरातील विविध रस्त्यांच्या सिमेंटीकरणासह रुंदिकरणाच्या कामाला गती देण्यात आली आहे. यातील बहूतांश रस्त्यांचे सिमेंटीकरण पूर्ण झाले आहे. हल्ली महात्मा गांधी पुतळा ते बसस्थानकापर्यंतच्या मार्गाचे सिमेेंटीकरण व रुदिकरणाचे काम सुरु आहे. या मार्गावरुन मलनिस्सारणची पाईपालाईन जाणार असल्याने या मार्गावरील मलनिस्सारणचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. महात्मा गांधी पुतळा ते झाशी राणी चौकापर्यंतचे सिमेंटिकरण व रुंदिकरणाच्या कामासह मलनिस्सारणचेही काम पुर्ण झाले आहे. मात्र झाशी राणी चौक ते बजाज चौकापर्यंतच्या मलनिस्सारणच्या कामाला कंत्राटदाराने अद्यापही हात लावला नसल्याने सिमेंटीकरणाचेही काम रखडले आहे. परिणामी नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत असल्याने ओरड होत आहे. याबाबत वांरवार पत्रव्यवहार करुनही दुर्लक्ष करण्यात आल्याने आता या रस्त्याचे काम सुरु करण्यात येत असून मलनिस्सारणाच्या कामासाठी रस्ता फोडण्याची परवानगी मिळणार नाही, असे पत्रातून कळविले आहे. त्यामुळे आता या मार्गावरील मलनिस्सारण योजना रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रस्त्याच्या बांधकामाचा कालावधी संपल्याने वाढली अडचण१६ एप्रिल २०१८ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आयोजित बैठकीत ज्या रस्त्यावर सिमेंटीकरणाचे कामे मंजूर आहे आणि त्याचा करारनामा झाला आहे, ती कामे प्राधान्याने करण्याविषयी सूचना देण्यात आल्या होत्या.परंतू दीड वर्षाचा कालावधी लोटूनही झाशी राणी चौक ते बसस्थानकापर्यंतचे मलनिस्सारणचे काम केले नाही. त्यामुळे करारानुसार कंत्राटदाराचा कालावधीही संपल्याने अडचण वाढली आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक