शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

मलनिस्सारणमुळे अडली सिमेंटीकरणाची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 23:26 IST

शहरात नगरपालिकेच्यावतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नियंत्रणाखाली अमृत योजनेंतर्गत मलनिस्सारण योजनेचे काम सुरु आहे. या कामाकरिता सिमेंटचे पक्के रस्ते फोडून पाईपलाईन टाकण्यात आल्याने सुरुवातीपासून ही योजना वादग्रस्त ठरली.

ठळक मुद्देआता रस्ता फोडण्यास मनाई : सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात नगरपालिकेच्यावतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नियंत्रणाखाली अमृत योजनेंतर्गत मलनिस्सारण योजनेचे काम सुरु आहे. या कामाकरिता सिमेंटचे पक्के रस्ते फोडून पाईपलाईन टाकण्यात आल्याने सुरुवातीपासून ही योजना वादग्रस्त ठरली. कंत्राटदाराने मनमर्जीने काम चालविल्याने शहरातील अर्थसंकल्पीय कामे रेंगाळली आहे. याचाच फटका महात्मा गांधी चौक ते बसस्थानकापर्यंतच्या कामाला बसला आहे. त्यामुळे आता मलनिस्सारण योजनेकरिता रस्ता फोडण्याची परवानगी देणार नाही, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने नगरपालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला पत्राव्दारे दिल्या आहे.शहरातील विविध रस्त्यांच्या सिमेंटीकरणासह रुंदिकरणाच्या कामाला गती देण्यात आली आहे. यातील बहूतांश रस्त्यांचे सिमेंटीकरण पूर्ण झाले आहे. हल्ली महात्मा गांधी पुतळा ते बसस्थानकापर्यंतच्या मार्गाचे सिमेेंटीकरण व रुदिकरणाचे काम सुरु आहे. या मार्गावरुन मलनिस्सारणची पाईपालाईन जाणार असल्याने या मार्गावरील मलनिस्सारणचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. महात्मा गांधी पुतळा ते झाशी राणी चौकापर्यंतचे सिमेंटिकरण व रुंदिकरणाच्या कामासह मलनिस्सारणचेही काम पुर्ण झाले आहे. मात्र झाशी राणी चौक ते बजाज चौकापर्यंतच्या मलनिस्सारणच्या कामाला कंत्राटदाराने अद्यापही हात लावला नसल्याने सिमेंटीकरणाचेही काम रखडले आहे. परिणामी नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत असल्याने ओरड होत आहे. याबाबत वांरवार पत्रव्यवहार करुनही दुर्लक्ष करण्यात आल्याने आता या रस्त्याचे काम सुरु करण्यात येत असून मलनिस्सारणाच्या कामासाठी रस्ता फोडण्याची परवानगी मिळणार नाही, असे पत्रातून कळविले आहे. त्यामुळे आता या मार्गावरील मलनिस्सारण योजना रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रस्त्याच्या बांधकामाचा कालावधी संपल्याने वाढली अडचण१६ एप्रिल २०१८ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आयोजित बैठकीत ज्या रस्त्यावर सिमेंटीकरणाचे कामे मंजूर आहे आणि त्याचा करारनामा झाला आहे, ती कामे प्राधान्याने करण्याविषयी सूचना देण्यात आल्या होत्या.परंतू दीड वर्षाचा कालावधी लोटूनही झाशी राणी चौक ते बसस्थानकापर्यंतचे मलनिस्सारणचे काम केले नाही. त्यामुळे करारानुसार कंत्राटदाराचा कालावधीही संपल्याने अडचण वाढली आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक