शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
6
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
7
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
8
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
9
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
10
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
11
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
12
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
14
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
15
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
16
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
17
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
18
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
19
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
20
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?

मलनिस्सारणमुळे अडली सिमेंटीकरणाची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 23:26 IST

शहरात नगरपालिकेच्यावतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नियंत्रणाखाली अमृत योजनेंतर्गत मलनिस्सारण योजनेचे काम सुरु आहे. या कामाकरिता सिमेंटचे पक्के रस्ते फोडून पाईपलाईन टाकण्यात आल्याने सुरुवातीपासून ही योजना वादग्रस्त ठरली.

ठळक मुद्देआता रस्ता फोडण्यास मनाई : सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात नगरपालिकेच्यावतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नियंत्रणाखाली अमृत योजनेंतर्गत मलनिस्सारण योजनेचे काम सुरु आहे. या कामाकरिता सिमेंटचे पक्के रस्ते फोडून पाईपलाईन टाकण्यात आल्याने सुरुवातीपासून ही योजना वादग्रस्त ठरली. कंत्राटदाराने मनमर्जीने काम चालविल्याने शहरातील अर्थसंकल्पीय कामे रेंगाळली आहे. याचाच फटका महात्मा गांधी चौक ते बसस्थानकापर्यंतच्या कामाला बसला आहे. त्यामुळे आता मलनिस्सारण योजनेकरिता रस्ता फोडण्याची परवानगी देणार नाही, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने नगरपालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला पत्राव्दारे दिल्या आहे.शहरातील विविध रस्त्यांच्या सिमेंटीकरणासह रुंदिकरणाच्या कामाला गती देण्यात आली आहे. यातील बहूतांश रस्त्यांचे सिमेंटीकरण पूर्ण झाले आहे. हल्ली महात्मा गांधी पुतळा ते बसस्थानकापर्यंतच्या मार्गाचे सिमेेंटीकरण व रुदिकरणाचे काम सुरु आहे. या मार्गावरुन मलनिस्सारणची पाईपालाईन जाणार असल्याने या मार्गावरील मलनिस्सारणचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. महात्मा गांधी पुतळा ते झाशी राणी चौकापर्यंतचे सिमेंटिकरण व रुंदिकरणाच्या कामासह मलनिस्सारणचेही काम पुर्ण झाले आहे. मात्र झाशी राणी चौक ते बजाज चौकापर्यंतच्या मलनिस्सारणच्या कामाला कंत्राटदाराने अद्यापही हात लावला नसल्याने सिमेंटीकरणाचेही काम रखडले आहे. परिणामी नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत असल्याने ओरड होत आहे. याबाबत वांरवार पत्रव्यवहार करुनही दुर्लक्ष करण्यात आल्याने आता या रस्त्याचे काम सुरु करण्यात येत असून मलनिस्सारणाच्या कामासाठी रस्ता फोडण्याची परवानगी मिळणार नाही, असे पत्रातून कळविले आहे. त्यामुळे आता या मार्गावरील मलनिस्सारण योजना रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रस्त्याच्या बांधकामाचा कालावधी संपल्याने वाढली अडचण१६ एप्रिल २०१८ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आयोजित बैठकीत ज्या रस्त्यावर सिमेंटीकरणाचे कामे मंजूर आहे आणि त्याचा करारनामा झाला आहे, ती कामे प्राधान्याने करण्याविषयी सूचना देण्यात आल्या होत्या.परंतू दीड वर्षाचा कालावधी लोटूनही झाशी राणी चौक ते बसस्थानकापर्यंतचे मलनिस्सारणचे काम केले नाही. त्यामुळे करारानुसार कंत्राटदाराचा कालावधीही संपल्याने अडचण वाढली आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक