शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

जमिनीच्या पट्ट्यांकरिता आदिवासींची अद्यापही भटकंती

By admin | Updated: May 10, 2015 01:33 IST

वन हक्क कायदा २००६ अन्वये जिल्ह्यातील अतिक्रमित आदिवासींना जमिनीचे पट्टे मिळण्यास विलंब होत आहे़ ...

वर्धा : वन हक्क कायदा २००६ अन्वये जिल्ह्यातील अतिक्रमित आदिवासींना जमिनीचे पट्टे मिळण्यास विलंब होत आहे़ जिल्ह्यातील आदिवासी अतिक्रमित जमिनीचे पट्टे मिळण्यासाठी संबंधित कार्यालयाच्या पायऱ्या झिजवीत आहेत. संबंधित शासकीय कार्यालयाकडून मात्र आदिवासींना टोलवाटोलवीचे उत्तर देण्यात येत आहेत. आदिवासी विभागाचे राज्यमंत्री रविवारी वर्धेत येत आहेत. त्यांना आदिवासींच्या समस्यांची माहिती आहे. यामुळे ते या समस्येकडे लक्ष देतील काय, असा प्रश्न येथील आदिवासी बांधवांनी केला आहे. या कायद्याची अंमलबजावणी तीन टप्प्यावर होत असून जिल्हा समितीकडून मान्य झालेले दावे मंजूर समजले जातात; परंतु जिल्ह्यात दाव्याबाबत सगळा गोंधळ उद्भवल्याचे चित्र निर्माण झाले आहे़दावे तपासणीच्या प्रक्रियेत निकाली निघालेले प्रलंबित, त्रृटीप्राप्त व नाकारल्या गेलेल्या दाव्याची माहिती आॅनलाईन करण्याची तरतूद आहे़ नमुद प्रपत्रात ही माहिती ग्रामपातळीपर्यंत पोहोचविण्याचा दंडक ुआहे. असे असताना तसे होत नसल्याने लाभ मिळू शकणारा आदिवासी त्यापासून वंचित आहे़त्या प्रकारच्या तक्रारी आयुक्त कार्यालय व प्रकल्प कार्यालय आदिवासी विकास विभाग यांच्याकडे झाल्यात; परंतु कारवाई शुन्य आहे़ ग्रामपातळीपर्यंतची माहिती आदिवासी विकास विभागाकडून न पोहचविल्याने अनेक आदिवासी आपल्या अतिक्रमीत जमिनीच्या पट्ट्याच्या हक्काबाबत अनभिज्ञ आहेत़ वन विभागाकडून तसेच महसूल विभागाकडून सातत्याने या गरीब आदिवासींवर खोट्या केसेस दाखल करीत ओहत. पिके शेतात उभी असताना त्यांची नासधूस केल्या जात आहे. निरपराध आदिवसींना अपराधी घोषित केले जात असल्याचा आरोप आदिवासी नेते अवचित सयाम यांनी पत्रातून केला आहे़ (प्रतिनिधी)