शहरं
Join us  
Trending Stories
1
‘महायुती सत्तेवर आली तरी मुंबईचं बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरे सत्तेवर आले तर...’, नितेश राणेंचा दावा 
2
एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला रस्त्याने ६७० किमी प्रवास; बलाढ्य अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली...
3
स्टार क्रिकेटर Jasprit Bumrah चा 'रशियन सुंदरी' सोबतचा फोटो व्हायरल; कोण आहे 'ही' तरुणी?
4
तुमचा iPhone हॅक तर झाला नाही ना? 'या' ४ गोष्टी दिसताच समजा कुणीतरी करतंय तुमची हेरगिरी
5
इराणच्या 'या' निर्णयाचा भारताला मोठा फटका, 2000 कोटी रुपयांवर आडलं घोडं...! काय आहे संपूर्ण प्रकरण?
6
अपघातग्रस्ताला 1.5 लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचार; मोदी सरकार आणतेय नवीन योजना
7
Share Market Down: शेअर बाजारात ५०० अंकांपेक्षा अधिक घसरण, निफ्टीबी २५,८०० च्या खाली; 'ही' आहेत ५ कारणं
8
अर्थसंकल्पापूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत होऊ शकते वाढ; काय म्हटलंय नव्या रिपोर्टमध्ये
9
Ritual: सावधान! तुम्हीही मंदिरात मूर्तीच्या मागच्या बाजूला डोकं टेकवता का? आधी 'हे' वाचा
10
काळाचा घाला! MBBS विद्यार्थ्यासोबत आक्रित घडलं, नेपाळमध्ये मृत्यूने गाठलं; १० मार्चला होतं लग्न
11
२० रुपयांच्या पाण्याच्या बाटलीचे ५५ रुपये लावले; ग्राहकाने रेस्टॉरंट मालकाला शिकवला धडा
12
एक दिवसाच्या दूध-ब्रेडपेक्षाही स्वस्त आहे 'या' देशात सोनं; एका ग्रॅमसाठी मोजावे लागतात अवघे इतके रुपये!
13
"शशांकने एवढा तमाशा करायला नको होता...", मंदार देवस्थळींच्या वादात अभिनेत्रीच्या नवऱ्याची उडी, म्हणाला- "माझ्या बायकोचेही ३.५० लाख..."
14
Nashik Municipal Election 2026 : कुंभ पर्वातील वचनात शाश्वत विकासाची ग्वाही; भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
15
WPL 2026 Opening Ceremony : हरमनप्रीत अन् स्मृती मैदानात उतरण्याआधी या बॉलिवूडकरांचा दिसणार जलवा
16
'लाडक्या बहिणीं'साठी स्टार प्रचारकही मैदानात, महिला मतांचा कौल ठरणार निर्णायक
17
पगारवाढ हवी असेल तर ऑफिसला यावंच लागेल; TCS चा कडक पवित्रा, 'WFO' अटेंडन्स पूर्ण नसल्यास अप्रेझल रखडणार
18
Social Viral: कोण म्हणतं पाणीपुरी विकणं छोटं काम आहे? तापसीने करून दाखवलं 'वर्ल्ड रेकॉर्ड'
19
'भाजपाची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी, जे तमाशा बंद करायला आले होते पण...', जयंत पाटील यांची बोचरी टीका
20
२ हजारांच्या नोटा, फॉरेन करन्सी... अपघातात मृत्यू झालेल्या भिकाऱ्याच्या बॅगेत सापडले ४५ लाख
Daily Top 2Weekly Top 5

भूमिगतमध्ये कंत्राटदारावरील कारवाईही गडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 05:00 IST

कंत्राटदाराने सुरुवातीपासूनच नियोजनशुन्य कारभार चालविला आणि प्रशासनाकडूनही त्याची पाठराखण करण्यात आली. दंड आकारणीसह चौकशी करुन काळ्या यादीत टाकण्याचे आदेश मंत्रालयातून मिळाल्यावरही कार्यवाही झाली नसल्याने कामात काहीही सुधारणा झाली नाही. परिणामी शहरातील १ लाख ३ हजार वर्धेकरांना या खोदकामाने वेठीस धरले आहे.

ठळक मुद्देना दंड आकारला, ना चौकशी केली : नियोजनशून्य कामामुळे वर्धेकरांना धरले जाताहेत वेठीस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहर विकासाच्या दृष्टीकोणातून केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत शहरामध्ये गेल्या साडेतीन वर्षांपासून भूमिगत जलवाहिनी व मलवाहिनीचे काम सुरु आहे. कंत्राटदाराने सुरुवातीपासूनच नियोजनशुन्य कारभार चालविला आणि प्रशासनाकडूनही त्याची पाठराखण करण्यात आली. दंड आकारणीसह चौकशी करुन काळ्या यादीत टाकण्याचे आदेश मंत्रालयातून मिळाल्यावरही कार्यवाही झाली नसल्याने कामात काहीही सुधारणा झाली नाही. परिणामी शहरातील १ लाख ३ हजार वर्धेकरांना या खोदकामाने वेठीस धरले आहे.अमृत योजनेंतर्गत असलेल्या २४ कोटी ८० लाखांचे भूमिगत जलवाहिनीचे काम पूर्णत्वास गेले असून सध्या ९२ कोटी ८० लाख रुपयाच्या मलनिस्सारण योजनेचे काम सुरु आहे. मलनिस्सारण योजनेच्या कामाचा कंत्राट पी.एल.अडके या कंपनीकडे असून सुरुवातीपासून नियोजनशुन्यता, सुरक्षेचा अभाव या कामामध्ये दिसून आला.त्यामुळे खोदकामाच्या खड्यात पडून अनेकांचे अपघात झाले. एका दाम्पत्याला आपला मुलगाही गमवावा लागला. यासंदर्भात पोलिसांत तक्रार करण्यासोबतच या कंत्राटदाराला दंड ठोठावून त्याला काळ्या यादीत टाका, असा निर्णय मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. सोबतच नागपूरच्या व्ही.एन.आय.टी. या संस्थेमार्फत चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले होते.पण, यासंदर्भात काहीच झाले नसल्याचे सध्याच्या परिस्थितीवरुन दिसून येत आहे. वर्धेकरांना सहन कराव्या लागत असलेल्या यातना प्रशासनासह लोकप्रतिनिधीही उघड्या डोळ्यांनी बघत असून कार्यवाही किंवा कंत्राटदाराच्या कामात सुधारणा होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.हा गंभीर प्रकार पालकमंत्री सुनील केदार यांच्या लक्षात आणून दिला असता त्यांनी शहरातील रस्त्यांची दिवसभर पाहणी करुन समस्या जाणून घेतली जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे पालकमंत्री यांच्याकडून वर्धेकरांना अपेक्षा असून त्याची पूतर्ता कधी होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कंत्राटदाराच्या उलट्या बोंबामलनिस्सार योजनेच्या कामामुळे वर्धेकरांना होणाऱ्या त्रासाबाबत तक्रारी वाढल्यानंतर त्या मंत्रालयापर्यंत पोहोचल्या. नियोजित कालावधीत काम पूर्ण न केल्यामुळे दंड आकारुन आकारावा. तरीही कंत्राटदाराने सुधारणा केली नाही तर त्याला काळ्या यादी टाकावे, असा आदेश देण्यात आला होता. कंत्राटदाराने या आदेशाच्या विरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेत लोकप्रतिनिधीसह नागरिक कामात अडचणी आणत असल्याने काम पूर्णत्वास जावू शकले नाही, असे मत मांडून स्थगिती मिळविल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाचीही अडचण झाली असून याचाच फायदा कंत्राटदार घेत आहे.नगरसेवक जाणार ‘बॅक फूटवर’?अमृत वाढीव पाणीपुरवठा योजना व मलनिस्सारण योजनेच्या कामामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात तीव्र रोष आहे. शहरातील सर्व रस्ते फोडून विकासाची वाट लावली आहे. सध्याच्या घडीला खड्डेमय वर्धा शहर झाले असून काहींना आर्थिक, काहींना मानसिक तर काहींना शारीरिक त्रास सहन करावा लागला. याचाच परिणाम आगामी काळात प्रभागातील नगरसेवकांना भोगवा लागण्याची शक्यता नाकरता येत नाही. कारण नगरसेवक या कामांना विरोध करीत नसल्याने नागरिकांच्या चेहºयावर जरी ‘हसू’ दिसत असले तरी ते निवडणुकीत काही सत्ताधाऱ्यांसाठी नक्कीच ‘आसू’ बनण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा