शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
2
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
3
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
4
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
5
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
6
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
7
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
8
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
9
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
10
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
11
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
12
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
15
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
16
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
17
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
18
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
19
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
20
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...

भूमिगतमध्ये कंत्राटदारावरील कारवाईही गडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 05:00 IST

कंत्राटदाराने सुरुवातीपासूनच नियोजनशुन्य कारभार चालविला आणि प्रशासनाकडूनही त्याची पाठराखण करण्यात आली. दंड आकारणीसह चौकशी करुन काळ्या यादीत टाकण्याचे आदेश मंत्रालयातून मिळाल्यावरही कार्यवाही झाली नसल्याने कामात काहीही सुधारणा झाली नाही. परिणामी शहरातील १ लाख ३ हजार वर्धेकरांना या खोदकामाने वेठीस धरले आहे.

ठळक मुद्देना दंड आकारला, ना चौकशी केली : नियोजनशून्य कामामुळे वर्धेकरांना धरले जाताहेत वेठीस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहर विकासाच्या दृष्टीकोणातून केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत शहरामध्ये गेल्या साडेतीन वर्षांपासून भूमिगत जलवाहिनी व मलवाहिनीचे काम सुरु आहे. कंत्राटदाराने सुरुवातीपासूनच नियोजनशुन्य कारभार चालविला आणि प्रशासनाकडूनही त्याची पाठराखण करण्यात आली. दंड आकारणीसह चौकशी करुन काळ्या यादीत टाकण्याचे आदेश मंत्रालयातून मिळाल्यावरही कार्यवाही झाली नसल्याने कामात काहीही सुधारणा झाली नाही. परिणामी शहरातील १ लाख ३ हजार वर्धेकरांना या खोदकामाने वेठीस धरले आहे.अमृत योजनेंतर्गत असलेल्या २४ कोटी ८० लाखांचे भूमिगत जलवाहिनीचे काम पूर्णत्वास गेले असून सध्या ९२ कोटी ८० लाख रुपयाच्या मलनिस्सारण योजनेचे काम सुरु आहे. मलनिस्सारण योजनेच्या कामाचा कंत्राट पी.एल.अडके या कंपनीकडे असून सुरुवातीपासून नियोजनशुन्यता, सुरक्षेचा अभाव या कामामध्ये दिसून आला.त्यामुळे खोदकामाच्या खड्यात पडून अनेकांचे अपघात झाले. एका दाम्पत्याला आपला मुलगाही गमवावा लागला. यासंदर्भात पोलिसांत तक्रार करण्यासोबतच या कंत्राटदाराला दंड ठोठावून त्याला काळ्या यादीत टाका, असा निर्णय मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. सोबतच नागपूरच्या व्ही.एन.आय.टी. या संस्थेमार्फत चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले होते.पण, यासंदर्भात काहीच झाले नसल्याचे सध्याच्या परिस्थितीवरुन दिसून येत आहे. वर्धेकरांना सहन कराव्या लागत असलेल्या यातना प्रशासनासह लोकप्रतिनिधीही उघड्या डोळ्यांनी बघत असून कार्यवाही किंवा कंत्राटदाराच्या कामात सुधारणा होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.हा गंभीर प्रकार पालकमंत्री सुनील केदार यांच्या लक्षात आणून दिला असता त्यांनी शहरातील रस्त्यांची दिवसभर पाहणी करुन समस्या जाणून घेतली जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे पालकमंत्री यांच्याकडून वर्धेकरांना अपेक्षा असून त्याची पूतर्ता कधी होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कंत्राटदाराच्या उलट्या बोंबामलनिस्सार योजनेच्या कामामुळे वर्धेकरांना होणाऱ्या त्रासाबाबत तक्रारी वाढल्यानंतर त्या मंत्रालयापर्यंत पोहोचल्या. नियोजित कालावधीत काम पूर्ण न केल्यामुळे दंड आकारुन आकारावा. तरीही कंत्राटदाराने सुधारणा केली नाही तर त्याला काळ्या यादी टाकावे, असा आदेश देण्यात आला होता. कंत्राटदाराने या आदेशाच्या विरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेत लोकप्रतिनिधीसह नागरिक कामात अडचणी आणत असल्याने काम पूर्णत्वास जावू शकले नाही, असे मत मांडून स्थगिती मिळविल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाचीही अडचण झाली असून याचाच फायदा कंत्राटदार घेत आहे.नगरसेवक जाणार ‘बॅक फूटवर’?अमृत वाढीव पाणीपुरवठा योजना व मलनिस्सारण योजनेच्या कामामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात तीव्र रोष आहे. शहरातील सर्व रस्ते फोडून विकासाची वाट लावली आहे. सध्याच्या घडीला खड्डेमय वर्धा शहर झाले असून काहींना आर्थिक, काहींना मानसिक तर काहींना शारीरिक त्रास सहन करावा लागला. याचाच परिणाम आगामी काळात प्रभागातील नगरसेवकांना भोगवा लागण्याची शक्यता नाकरता येत नाही. कारण नगरसेवक या कामांना विरोध करीत नसल्याने नागरिकांच्या चेहºयावर जरी ‘हसू’ दिसत असले तरी ते निवडणुकीत काही सत्ताधाऱ्यांसाठी नक्कीच ‘आसू’ बनण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा