शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवरील कारवाई थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 16:15 IST

 लाेकमत न्यूज नेटवर्क वर्धा :   राज्यात पाऊस वेळेवर आल्याने खरीपाच्या लागवडीची लगबग सुरु झाली. सुरुवातीलाच सोयाबीनचे बियाणे बोगस ...

ठळक मुद्देराज्यभरात ३० हजार तक्रारी बियाण्यांवरील खर्च व्यर्थ, शेतकऱ्यांचे वर्षभराचे उत्पन्नही गेले

 लाेकमत न्यूज नेटवर्कवर्धा :   राज्यात पाऊस वेळेवर आल्याने खरीपाच्या लागवडीची लगबग सुरु झाली. सुरुवातीलाच सोयाबीनचे बियाणे बोगस असल्याच्या तक्रारी सुरु झाल्यात. यामध्ये कपाशीचाही समावेश असून राज्यभरात बोगस बियाण्यांसंदर्भात तब्बल ३० हजार तक्रारी शासनाला प्राप्त झाल्यात. एकट्या वर्धा जिल्ह्यातच ३२९ तक्रारी असून काही प्रकरणात गुन्हे नोंदविण्यात आले पण, पुढील कारवाई थंडबस्त्यात असल्याने शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला मिळाला नाहीत.राज्यभरात यावर्षी सततचा पाऊस, बोगस बियाणे आणि रोगाचा प्रकोप यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी पेरलेले कपाशी व सोयाबीनचे पेरलेले बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवले. बियाण्यांची उगवण क्षमताच कमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांनी ३० हजार तक्रारी शासनाला प्राप्त झाल्याचे खुद्द कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांनी स्पष्ट केले आहे. यामध्ये महाबीजसह बावीस कंपन्यांंचा समावेश असल्याचेही निदर्शनास आले आहे. तक्रारीच्या अनुषंगाने कृषी विभागाकडून कारवाईला गती देत काही ठिकाणी कंपनी व कृषी केंद्रांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. पण, त्यानंतर पुढे कारवाईला थांबा देण्यात आल्याचे दिसून येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा बियाण्यावरील खर्च व्यर्थ गेला असून वर्षभराचे उत्पन्नही गेल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. राज्यभरातील शेतकरी कार्यालयाचे उंबरठे झिजवित असून कागद काळे करुन थकले पण, अद्याप मोबदला मिळाला नाही.

 जिल्ह्यात सोयाबीनच्या ५३० तक्रारी खरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत ५३० तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ३२९ तक्रारीमध्ये बियाण्यात दोष आढळून आल्याने इंदोरच्या एका कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच ११७ शेतकऱ्यांना १८९ बॅग सोयाबीन बियाणे वितरण करून  ४ लक्ष ८५ हजार ७५०  रुपये नुकसान भरपाई दिल्याची माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली आहे. खरीप हंगामामध्ये बियाणे ४५२, रासायनिक खते ३१५ व कीटकनाशक २६५ कृषी केद्रांची तपासणी केली असता बियाणे ४७, रासायनिक खते १७ व किटकनाशक ६  अशा एकूण ७० कृषी केंद्रांना विक्रीबंदचे आदेश देण्यात आल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मी ६२ एकरामध्ये सोयाबीनची पेरणी करण्याकरिता ६५ बॅग सोयाबीनची खरेदी केली होती. पेरणीपर्यंत सात लाख रुपयांच्यावर खर्च आला. पण, पेरलेले सोयाबीन उगवलेच नसल्याने शेतात वखरणी करावी लागली. कृषी विभागाकडे तक्रार केल्यानंतर कंपनी आणि कृषी केंद्र संचालकावर गुन्हा दाखल झाला. मात्र, अद्याप कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. यावर तोडगा निघाला नाही तर दिवाळीनंतर आम्ही सर्व नुकसानग्रस्त शेतकरी आंदोलन करणार आहे.- शीतल चौधरी, शेतकरी, गोविंदपूर ता.हिंगणघाट

टॅग्स :agricultureशेती