शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवरील कारवाई थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 16:15 IST

 लाेकमत न्यूज नेटवर्क वर्धा :   राज्यात पाऊस वेळेवर आल्याने खरीपाच्या लागवडीची लगबग सुरु झाली. सुरुवातीलाच सोयाबीनचे बियाणे बोगस ...

ठळक मुद्देराज्यभरात ३० हजार तक्रारी बियाण्यांवरील खर्च व्यर्थ, शेतकऱ्यांचे वर्षभराचे उत्पन्नही गेले

 लाेकमत न्यूज नेटवर्कवर्धा :   राज्यात पाऊस वेळेवर आल्याने खरीपाच्या लागवडीची लगबग सुरु झाली. सुरुवातीलाच सोयाबीनचे बियाणे बोगस असल्याच्या तक्रारी सुरु झाल्यात. यामध्ये कपाशीचाही समावेश असून राज्यभरात बोगस बियाण्यांसंदर्भात तब्बल ३० हजार तक्रारी शासनाला प्राप्त झाल्यात. एकट्या वर्धा जिल्ह्यातच ३२९ तक्रारी असून काही प्रकरणात गुन्हे नोंदविण्यात आले पण, पुढील कारवाई थंडबस्त्यात असल्याने शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला मिळाला नाहीत.राज्यभरात यावर्षी सततचा पाऊस, बोगस बियाणे आणि रोगाचा प्रकोप यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी पेरलेले कपाशी व सोयाबीनचे पेरलेले बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवले. बियाण्यांची उगवण क्षमताच कमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांनी ३० हजार तक्रारी शासनाला प्राप्त झाल्याचे खुद्द कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांनी स्पष्ट केले आहे. यामध्ये महाबीजसह बावीस कंपन्यांंचा समावेश असल्याचेही निदर्शनास आले आहे. तक्रारीच्या अनुषंगाने कृषी विभागाकडून कारवाईला गती देत काही ठिकाणी कंपनी व कृषी केंद्रांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. पण, त्यानंतर पुढे कारवाईला थांबा देण्यात आल्याचे दिसून येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा बियाण्यावरील खर्च व्यर्थ गेला असून वर्षभराचे उत्पन्नही गेल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. राज्यभरातील शेतकरी कार्यालयाचे उंबरठे झिजवित असून कागद काळे करुन थकले पण, अद्याप मोबदला मिळाला नाही.

 जिल्ह्यात सोयाबीनच्या ५३० तक्रारी खरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत ५३० तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ३२९ तक्रारीमध्ये बियाण्यात दोष आढळून आल्याने इंदोरच्या एका कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच ११७ शेतकऱ्यांना १८९ बॅग सोयाबीन बियाणे वितरण करून  ४ लक्ष ८५ हजार ७५०  रुपये नुकसान भरपाई दिल्याची माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली आहे. खरीप हंगामामध्ये बियाणे ४५२, रासायनिक खते ३१५ व कीटकनाशक २६५ कृषी केद्रांची तपासणी केली असता बियाणे ४७, रासायनिक खते १७ व किटकनाशक ६  अशा एकूण ७० कृषी केंद्रांना विक्रीबंदचे आदेश देण्यात आल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मी ६२ एकरामध्ये सोयाबीनची पेरणी करण्याकरिता ६५ बॅग सोयाबीनची खरेदी केली होती. पेरणीपर्यंत सात लाख रुपयांच्यावर खर्च आला. पण, पेरलेले सोयाबीन उगवलेच नसल्याने शेतात वखरणी करावी लागली. कृषी विभागाकडे तक्रार केल्यानंतर कंपनी आणि कृषी केंद्र संचालकावर गुन्हा दाखल झाला. मात्र, अद्याप कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. यावर तोडगा निघाला नाही तर दिवाळीनंतर आम्ही सर्व नुकसानग्रस्त शेतकरी आंदोलन करणार आहे.- शीतल चौधरी, शेतकरी, गोविंदपूर ता.हिंगणघाट

टॅग्स :agricultureशेती