शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवरील कारवाई थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 16:15 IST

 लाेकमत न्यूज नेटवर्क वर्धा :   राज्यात पाऊस वेळेवर आल्याने खरीपाच्या लागवडीची लगबग सुरु झाली. सुरुवातीलाच सोयाबीनचे बियाणे बोगस ...

ठळक मुद्देराज्यभरात ३० हजार तक्रारी बियाण्यांवरील खर्च व्यर्थ, शेतकऱ्यांचे वर्षभराचे उत्पन्नही गेले

 लाेकमत न्यूज नेटवर्कवर्धा :   राज्यात पाऊस वेळेवर आल्याने खरीपाच्या लागवडीची लगबग सुरु झाली. सुरुवातीलाच सोयाबीनचे बियाणे बोगस असल्याच्या तक्रारी सुरु झाल्यात. यामध्ये कपाशीचाही समावेश असून राज्यभरात बोगस बियाण्यांसंदर्भात तब्बल ३० हजार तक्रारी शासनाला प्राप्त झाल्यात. एकट्या वर्धा जिल्ह्यातच ३२९ तक्रारी असून काही प्रकरणात गुन्हे नोंदविण्यात आले पण, पुढील कारवाई थंडबस्त्यात असल्याने शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला मिळाला नाहीत.राज्यभरात यावर्षी सततचा पाऊस, बोगस बियाणे आणि रोगाचा प्रकोप यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी पेरलेले कपाशी व सोयाबीनचे पेरलेले बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवले. बियाण्यांची उगवण क्षमताच कमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांनी ३० हजार तक्रारी शासनाला प्राप्त झाल्याचे खुद्द कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांनी स्पष्ट केले आहे. यामध्ये महाबीजसह बावीस कंपन्यांंचा समावेश असल्याचेही निदर्शनास आले आहे. तक्रारीच्या अनुषंगाने कृषी विभागाकडून कारवाईला गती देत काही ठिकाणी कंपनी व कृषी केंद्रांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. पण, त्यानंतर पुढे कारवाईला थांबा देण्यात आल्याचे दिसून येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा बियाण्यावरील खर्च व्यर्थ गेला असून वर्षभराचे उत्पन्नही गेल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. राज्यभरातील शेतकरी कार्यालयाचे उंबरठे झिजवित असून कागद काळे करुन थकले पण, अद्याप मोबदला मिळाला नाही.

 जिल्ह्यात सोयाबीनच्या ५३० तक्रारी खरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत ५३० तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ३२९ तक्रारीमध्ये बियाण्यात दोष आढळून आल्याने इंदोरच्या एका कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच ११७ शेतकऱ्यांना १८९ बॅग सोयाबीन बियाणे वितरण करून  ४ लक्ष ८५ हजार ७५०  रुपये नुकसान भरपाई दिल्याची माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली आहे. खरीप हंगामामध्ये बियाणे ४५२, रासायनिक खते ३१५ व कीटकनाशक २६५ कृषी केद्रांची तपासणी केली असता बियाणे ४७, रासायनिक खते १७ व किटकनाशक ६  अशा एकूण ७० कृषी केंद्रांना विक्रीबंदचे आदेश देण्यात आल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मी ६२ एकरामध्ये सोयाबीनची पेरणी करण्याकरिता ६५ बॅग सोयाबीनची खरेदी केली होती. पेरणीपर्यंत सात लाख रुपयांच्यावर खर्च आला. पण, पेरलेले सोयाबीन उगवलेच नसल्याने शेतात वखरणी करावी लागली. कृषी विभागाकडे तक्रार केल्यानंतर कंपनी आणि कृषी केंद्र संचालकावर गुन्हा दाखल झाला. मात्र, अद्याप कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. यावर तोडगा निघाला नाही तर दिवाळीनंतर आम्ही सर्व नुकसानग्रस्त शेतकरी आंदोलन करणार आहे.- शीतल चौधरी, शेतकरी, गोविंदपूर ता.हिंगणघाट

टॅग्स :agricultureशेती