शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

शहरात २९७ वाहन धारकांवर कारवाई

By admin | Updated: June 25, 2017 00:43 IST

वाहतूक पोलीस शाखेच्यावतीने शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचे प्रयत्न केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वाहतूक पोलीस शाखेच्यावतीने शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचे प्रयत्न केले जात आहे. पोलीस निरीक्षक बदलताच या कारवाईला वेग आल्याचे दिसून आले. गुरूवारी डॉ. आंबेडकर व बजाज चौकात तथा शुक्रवारी शहरात अन्यत्र मोहीम राबविण्यात आली. २९७ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. गुरूवारी चुकीच्या दिशेने वाहने चालविणाऱ्या १४८ तर नो पार्किंगमध्ये वाहने पार्क करणाऱ्या ५५ वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली. शुक्रवारी एकूण ९४ वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक पोलीस शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून मुंबई येथील दत्तात्रय गुरव यांनी सूत्रे स्वीकारली. कार्यभार स्वीकारताच त्यांनी वाहतुकीला शिस्त लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. गुरूवारी डॉ. आंबेडकर व बजाज चौकात विशेष मोहीम राबविली. यात चुकीच्या बाजूने वाहने चालविणाऱ्या १४८ धारकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. यात एक आॅटो व चार कारचा समावेश होता. शिवाय बाजार परिसरातील नो-पार्किंगमध्ये वाहने उभ्या करणाऱ्या ५५ वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली. यात सर्व दुचाकी धारकांचा समावेश आहे. शुक्रवारीही शहरात ९४ वाहनांवर कारवाई करण्यात आली. काही वर्षांपूर्वी बाजारपेठेत पार्किंगची पी-वन, पी-टू ही सिस्टीम लागू करण्यात आली होती. यात काही दिवस रस्त्याच्या एका बाजूने तर काही दिवस रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने वाहने उभी करावी, अशा सूचना होत्या. ही पद्धत गुरव यांनी पुन्हा अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.