शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

संत भानुदास महाराज संस्थेला जिल्हाधिकाºयांची आकस्मिक भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 22:30 IST

स्थानिक श्री संत भानुदास महाराज संस्थेला शिक्षण दिनानिमित्त जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अचानक भेट दिली.

ठळक मुद्देशेतकºयांनी वाचला समस्यांचा पाढा : मूकबधीर तथा अपंगांना साहित्य देण्याची दिली ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धमनेरी : स्थानिक श्री संत भानुदास महाराज संस्थेला शिक्षण दिनानिमित्त जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अचानक भेट दिली. प्रारंभी त्यांनी बाबांचे दर्शन घेतल्यानंतर संपूर्ण परिसराची पाहणी केली. अंध, अपंग, मूकबधीर युनिटला भेट देत माहिती जाणून घेतली. जिल्हाधिकाºयांच्या आकस्मिक भेटीने संस्थेचे पदाधिकारी व विद्यार्थीही भारावून गेले होते.नवाल यांनी येथील वातावरण आनंदमय असल्याचे नमूद केले. जिल्हाधिकाºयांचे पदाधिकाºयांनी स्वागत केल्यानंतर अंध मुलांनी स्वागत गित सादर केले. नवाल यांनी मार्गदर्शन करताना मूकबधीर मुलांची यादी माझ्याकडे द्या. मी सर्व मुलांना कर्णबधीर यंत्र देणार आहे. अपंग मुलांना तीन चाकी सायकल देण्याचा प्रयत्न करणार आहे. याव्यतिरिक्त काही अडचणी भासल्यास मी माझ्यापरीने सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या ठिकाणी स्वयंरोजगारासारखे युनिट सुरू करा. मी त्यालाही मान्यता व निधी देण्याचा प्रयत्न राहिल, असे सांगत बºयाच उपाययोजना सूचविल्या. यावेळी संस्थेचे संचालक राजू मालानी, सचिव ज्ञानेश्वर निमकर तथा सर्व युनिटचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी, गावातील नागरिक, श्री सद्गुरू विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक नांदे, देशमुख, सावरकर, गिरडकर आदींची उपस्थिती होती.गावातील काही शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांना काही महत्त्वाच्या प्रश्नांबाबत निवेदन सादर केले. यानंतर त्यांना दहा मिनीटांचा वेळ मागून पिकाच्या पैसेवारीबाबत माहिती जाणून घेतली. वर्धमनेरी येथील पिकाची पैसेवारी ७० ते ७२ टक्के लावण्यात आली आहे. यावर मी पुन्हा सर्व्हे करण्याकरिता सूचना देतो, असे नवाल यांनी सांगितले. रिडींग न घेता सरसकट १५ ते २० हजरांपर्यंत देयके देण्यात आली. चालू बिलही दोन ते अडीच हजारापर्यंत देण्यात आल्याची तक्रार शेतकºयांनी नवाल यांना केली. यावर जिल्हाधिकाºयांनी मुख्य अभियंता वर्धा यांच्याशी भ्रमध्वनीवर चर्चा केली. सर्व कृषीपंप धारकांना मिटरचे रिडींग घेवून देयके देण्यात यावीत, अशा सूचनाही त्यांनी केल्या. गावातील नागरिकांनी ग्रामविकास अधिकारी टिपले यांच्या तक्रारी केल्या. याबाबत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाºयांशी चर्चा करून माहिती घेण्याचा प्रयत्न करतो, असेही त्यांनी सांगितले. यावेळी गावातील शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी, तहसीलदार, शासकीय अधिकारी यांच्या ताफ्यामुळे गावात उत्साह दिसून येत होता.माहिती असताना तलाठ्याची गैरहजेरीजिल्हाधिकारी तथा तहसीलदार गावात येणार असल्याची माहिती तलाठ्यांना होती. असे असताना त्या कार्यालयात उपस्थित राहिल्या नाहीत. यामुळे अधिकाºयांसह ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. ग्रामस्थ व प्रशासन यांच्यातील दुवा असलेल्या ग्रामविकास अधिकारी, तलाठी यांना समज देण्याची मागणीही करण्यात आली.