शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

संत भानुदास महाराज संस्थेला जिल्हाधिकाºयांची आकस्मिक भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 22:30 IST

स्थानिक श्री संत भानुदास महाराज संस्थेला शिक्षण दिनानिमित्त जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अचानक भेट दिली.

ठळक मुद्देशेतकºयांनी वाचला समस्यांचा पाढा : मूकबधीर तथा अपंगांना साहित्य देण्याची दिली ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धमनेरी : स्थानिक श्री संत भानुदास महाराज संस्थेला शिक्षण दिनानिमित्त जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अचानक भेट दिली. प्रारंभी त्यांनी बाबांचे दर्शन घेतल्यानंतर संपूर्ण परिसराची पाहणी केली. अंध, अपंग, मूकबधीर युनिटला भेट देत माहिती जाणून घेतली. जिल्हाधिकाºयांच्या आकस्मिक भेटीने संस्थेचे पदाधिकारी व विद्यार्थीही भारावून गेले होते.नवाल यांनी येथील वातावरण आनंदमय असल्याचे नमूद केले. जिल्हाधिकाºयांचे पदाधिकाºयांनी स्वागत केल्यानंतर अंध मुलांनी स्वागत गित सादर केले. नवाल यांनी मार्गदर्शन करताना मूकबधीर मुलांची यादी माझ्याकडे द्या. मी सर्व मुलांना कर्णबधीर यंत्र देणार आहे. अपंग मुलांना तीन चाकी सायकल देण्याचा प्रयत्न करणार आहे. याव्यतिरिक्त काही अडचणी भासल्यास मी माझ्यापरीने सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या ठिकाणी स्वयंरोजगारासारखे युनिट सुरू करा. मी त्यालाही मान्यता व निधी देण्याचा प्रयत्न राहिल, असे सांगत बºयाच उपाययोजना सूचविल्या. यावेळी संस्थेचे संचालक राजू मालानी, सचिव ज्ञानेश्वर निमकर तथा सर्व युनिटचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी, गावातील नागरिक, श्री सद्गुरू विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक नांदे, देशमुख, सावरकर, गिरडकर आदींची उपस्थिती होती.गावातील काही शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांना काही महत्त्वाच्या प्रश्नांबाबत निवेदन सादर केले. यानंतर त्यांना दहा मिनीटांचा वेळ मागून पिकाच्या पैसेवारीबाबत माहिती जाणून घेतली. वर्धमनेरी येथील पिकाची पैसेवारी ७० ते ७२ टक्के लावण्यात आली आहे. यावर मी पुन्हा सर्व्हे करण्याकरिता सूचना देतो, असे नवाल यांनी सांगितले. रिडींग न घेता सरसकट १५ ते २० हजरांपर्यंत देयके देण्यात आली. चालू बिलही दोन ते अडीच हजारापर्यंत देण्यात आल्याची तक्रार शेतकºयांनी नवाल यांना केली. यावर जिल्हाधिकाºयांनी मुख्य अभियंता वर्धा यांच्याशी भ्रमध्वनीवर चर्चा केली. सर्व कृषीपंप धारकांना मिटरचे रिडींग घेवून देयके देण्यात यावीत, अशा सूचनाही त्यांनी केल्या. गावातील नागरिकांनी ग्रामविकास अधिकारी टिपले यांच्या तक्रारी केल्या. याबाबत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाºयांशी चर्चा करून माहिती घेण्याचा प्रयत्न करतो, असेही त्यांनी सांगितले. यावेळी गावातील शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी, तहसीलदार, शासकीय अधिकारी यांच्या ताफ्यामुळे गावात उत्साह दिसून येत होता.माहिती असताना तलाठ्याची गैरहजेरीजिल्हाधिकारी तथा तहसीलदार गावात येणार असल्याची माहिती तलाठ्यांना होती. असे असताना त्या कार्यालयात उपस्थित राहिल्या नाहीत. यामुळे अधिकाºयांसह ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. ग्रामस्थ व प्रशासन यांच्यातील दुवा असलेल्या ग्रामविकास अधिकारी, तलाठी यांना समज देण्याची मागणीही करण्यात आली.