शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

महात्मांचे तत्त्व पाळण्यापेक्षा अंगिकारणे फायद्याचे!

By admin | Updated: September 18, 2014 23:38 IST

महात्मा गांधी यांनी सुखकर आणि सोपे जीवन जगण्याची अनेक तत्त्वे दिली आहेत. तत्त्वे पाळण्यापेक्षा ती आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या या तत्त्वाचा आम्ही अंगिकार केल्याने आमचे जीवन सुकर झाले आहे.

सेवाग्राम : महात्मा गांधी यांनी सुखकर आणि सोपे जीवन जगण्याची अनेक तत्त्वे दिली आहेत. तत्त्वे पाळण्यापेक्षा ती आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या या तत्त्वाचा आम्ही अंगिकार केल्याने आमचे जीवन सुकर झाले आहे. आजच्या धकाधकीच्या व गतीमान झालेल्या जीवनात त्यांची तत्त्वे महत्त्वाची ठरतात, असे विचार राष्ट्रपिता महत्मा गांधी यांची नात ताराबहन भट्टाचार्य यांनी व्यक्त केले. सेवाग्राम आश्रमला दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत बापुंच्या वास्तू व त्यांच्या वापरातील वस्तूंची पाहणी करून आश्रमवासियांशी मुक्त संवाद साधला. ताराबहन ९० वर्षांच्या असून बापुंचे धाकटे पुत्र देवदास यांची मुलगी आहे. सध्या त्यांचे वास्तव्य दिल्ली येथे आहे. आश्रमात आल्यानंतर अध्यक्ष जयवंत मठकर तसेच साधक व कार्यकर्त्यांनी सूतमाळ तथा खादीची शाल देवून त्यांचे स्वागत केले. आदी निवास, बा व बापू कुटी, आखरी निवास तसेच त्यांच्या मोठ्या आई व वडील रामदास तसेच निर्मला गांधी यांच्या निवासस्थानाचीही पाहणी केली. वास्तुंच्या ठिकाणाचे फलकमात्र आवर्जून वाचले. आश्रमवासी आणि कार्यकर्त्यांशी बोलतांना फलकावरील सूचनांचे आमच्या घरात पालन होत होते. बापूंना आम्ही खूप घाबरायचो, तर मोटी बा (कस्तुरबा) मात्र खूप प्रेमळ होत्या. बारीक सारीक गोष्टींकडे बापुंचे लक्ष असायचे. सामान्यपणे आमची कामे आम्ही लहानपणापासून करीत आलो. त्यामुळे कामाचा, श्रमचा कमीपणा वाटला नाही. पागल दौड फलकाबाबत त्या म्हणाल्या बापूंनी त्यावेळी हे सांगितले पण आजचा विचार केला तर खऱ्या अर्थानी आजच त्याची गरज असल्याचे प्रकर्षाने वाटते. बापुंचा आश्रम चांगल्याप्रकारे सांभाळत असल्याबद्दन आनंद व्यक्त केला. परिचय व माहिती जयवंत मठकर यांनी दिली. यावेळी अशोक गिरी, बाबाराव खैरकर, नामदेव ढोक, प्रभाकर आत्राम, सिध्देश्वर, शेरखॉँ पठान, प्रशांत, हिराभाई, ललीता, शोभा, वैशाली आत्राम, प्रभा, अश्विनी, जयश्री पाटील, माया ताकसांडे यांच्यासह आश्रमप्रतिष्ठाणचे सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)