शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जागा मुबलक; पण विद्यार्थी संख्या अल्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 05:00 IST

कोविड-१९ च्या प्रकोपामुळे यावर्षी दहावीचा निकाल चांगलाच लांबला होता. अखेर आठवड्याभरापूर्वी दहावीचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना भरमसाठी गुण प्राप्त झाले. यावर्षी जिल्ह्याचा निकाल तब्बल ९२.१० टक्के लागला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत २६.६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जिल्ह्याच्या आठही तालुक्यातून १६ हजार ८७१ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेकरिता अर्ज केले होते.

ठळक मुद्दे अकरावी प्रवेश प्रक्रिया : कनिष्ठ महाविद्यालयातील जागा राहणार रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या वाढत असल्याने जागाही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. मात्र, उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या त्या तुलनेने कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील १३६ कनिष्ठ महाविद्यालयात विविध शाखेच्या २३ हजार ३०० जागा असताना यावर्षी १५ हजार ४१९ विद्यार्थीच उत्तीर्ण झाले आहे. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयातील तब्बल ७ हजार ८८१ जागांवर पाणी सोडावे लागणार आहेत.कोविड-१९ च्या प्रकोपामुळे यावर्षी दहावीचा निकाल चांगलाच लांबला होता. अखेर आठवड्याभरापूर्वी दहावीचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना भरमसाठी गुण प्राप्त झाले. यावर्षी जिल्ह्याचा निकाल तब्बल ९२.१० टक्के लागला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत २६.६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जिल्ह्याच्या आठही तालुक्यातून १६ हजार ८७१ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेकरिता अर्ज केले होते. त्यापैकी १६ हजार ७४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १५ हजार ४१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालयात कला, विज्ञान, वाणिज्य व संयुक्त अभ्यासक्रमाच्या २३ हजार ३०० जागा आहेत.पण, उत्तीर्ण झालेल्यांची संख्या केवळ १५ हजार ४१९ आहेत. यापैकी बरेच विद्यार्थी एमसीव्हीसी व्होकेशनल, पॉलिटेक्निक, आयटीया किंवा इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार आहेत.परिणामी यावर्षीही कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेश मिळविण्याची मोठी कसरत करावी लागणार आहेत. तरीही कनिष्ठ महाविद्यालयातील बऱ्याच जागा रिक्त राहणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहेत.अशी आहे प्रवेश प्रक्रियादहावीचा निकाल लागला असून अद्याप नागपूर विभागीय मंडळाकडून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका प्राप्त झाल्या नाहीत. पण, निकाल जाहीर झाल्यानंतर कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी व्होकेशनल, तंत्रनिकेतन यासह इतरही विभागाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. शासनाने यावर्षी अकरावीच्या प्रवेशाकरिता आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया 11३ँंे्रि२२्रङ्मल्ल.ङ्म१ॅ.्रल्ल या संकेतस्थळावर सुरु करण्यात आली आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता काही महाविद्यालयातही प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.जिल्ह्यामध्ये ८० अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयेजिल्ह्यातील आठही तालुक्यामध्ये एकूण १३६ कनिष्ठ महाविद्यालये असून यामध्ये ८० कनिष्ठ महाविद्यालये अनुदानित आहे. तर २१ कनिष्ठ महाविद्यालये विना अनुदानित, ०८ कायम विनाअनुदानित आणि २७ कनिष्ठ महाविद्याये स्वयं अर्थसहाय्यित आहेत. सर्वाधिक ४१ कनिष्ठ महाविद्यालये एकट्या वर्धा तालुक्यात आहे. त्यानंतर हिंगणघाट तालुक्यात २३ तर देवळी तालुक्यामध्ये २१ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. सर्वात कमी आष्टी आणि कारंजा तालुक्यात कनिष्ठ महाविद्यालये आहेत.विज्ञान शाखेकडे कलविज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याने प्रवेशासाठी जाती सवर्गनिहाय निकष लावण्यात आले आहे. यामध्ये एससी प्रवर्गाकरिता १३ टक्के, एसटी प्रवर्गाकरिता ७ टक्के, व्हीजेएनटीकरिता ११ टक्के (व्हीजे-अ ३ टक्के, एनटी-बी २.५० टक्के, एनटी-सी ३.५० टक्के, एनटी-डी २ टक्के), एसबीसी २ टक्के, ओबीसी १९ टक्के तर ओपनकरिता ४८ जागा आरक्षित करण्यात आल्या आहे. एमसीव्हीसी व्होकेशनलसाठीही हेच निकष लावण्यात आले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय