शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

पीक नुकसान पाहणीसाठी येणारी तक्रार निवारण समितीच अनुपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2015 00:26 IST

येथील मोहम्मद हुसेन भुरूमिया यांच्या शेतातील सोयाबीन पिकाला फुले व शेंगा न आल्यामुळे त्यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे केली.

सोयाबीनला शेंगाच आल्या नाहीरोहणा : येथील मोहम्मद हुसेन भुरूमिया यांच्या शेतातील सोयाबीन पिकाला फुले व शेंगा न आल्यामुळे त्यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे केली. कृषी विभागाने मंगळवारी शेतावर प्रत्यक्ष पीक पाहणीसाठी पीडित शेतकऱ्यास लेखी कळविले, असे असतानाही कृषी विभागातर्फे कोणीच न आल्याने पीक पाहणी झाली नसल्याची बाब उघडकीस आली. यामुळे शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सविस्तर वृत्त असे की, शेतकरी मोहम्मद हुसेन भुरूमिया यांनी पुलगाव येथील कृषी केंद्रातून एका कंपनीच्या सोयाबीनच्या दोन बॅग १७ जून २०१५ रोजी खरेदी करून शेतात पेरा केला. पेरणीनंतर शेतकऱ्याने सर्व सोपस्कार केले. पिकाची वाढ देखील पर्याप्त प्रमाणात झाली. इतरांच्या शेतातील सोयाबीनला फुले व शेंगाही भरल्या; पण सदर शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीनला फुलेही आली नाही. परिणामी शेतकऱ्याचे नुकसान झाले. सदर पीडित शेतकऱ्याने याबाबतची तक्रार आर्वी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे केली. ३ सप्टेंबर २०१५ ला कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी केली तरी कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यानंतर पं.स.च्या कृषी विभागातर्फे जा.क्र.६४१५/पंसआ/कृषी/ गुवि/तक्रार/वशी-दि. ३०/९/१५ अन्वये सदर शेतकऱ्याला ६ आॅक्टोबरला तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीमार्फत पूर्व तपासणी करणार असल्याचे कळविले. यावेळी स्वत: शेतावर उपस्थित राहावे, असेही सांगितले. पत्रानुसार पीडित शेतकरी दिवसभर शेतात उपस्थित होता; पण तक्रार निवारण समितीचे कोणीही आले नाही. परिणामी शेतकऱ्याला मनस्ताप झाला. यामुळे पीक कापणी करून रब्बीच्या पिकासाठी शेत केव्हा तयार करावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.(वार्ताहर)