शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
3
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
4
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
5
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
6
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
7
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
8
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
9
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
10
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
11
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
12
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
13
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
14
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
15
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
16
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
17
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
18
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
19
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
20
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!

मागणी नसतानाही गावालगत शेतजमिनी करणार अकृषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 14:31 IST

शेतकऱ्यांची कोणतीही मागणी नसताना राज्य शासनाने प्रत्येक गावच्या नगराच्या किंवा शहराच्या हद्दीपासून २०० मीटरच्या आतील क्षेत्रात येणारी शेतजमीन अकृषक रूपांतरीत करण्याचा शासन निर्णय घेतला.

ठळक मुद्देशासनाचा अफलातून निर्णय शेतकरी होणार दिवाळखोर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांची कोणतीही मागणी नसताना राज्य शासनाने प्रत्येक गावच्या नगराच्या किंवा शहराच्या हद्दीपासून २०० मीटरच्या आतील क्षेत्रात येणारी शेतजमीन अकृषक रूपांतरीत करण्याचा शासन निर्णय घेतला. त्यासाठी लागणारा कर शेतकऱ्यांनी भरावा असे लेखी पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठ्यामार्फत शेतकऱ्यांना दिले आहे. हे लेखी पत्र पाहून धास्तावले आहेत.शासनाने राज्यातील सर्व गाव नगर व शहराच्या हद्दीपासून २०० मीटरच्या आत जी शेतजमीन आहे. ती शासन स्वत:हून अकृषक रूपांतरण करणार आहे. त्यासाठी शासनाच्या महसूल विभागाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अशा शेतजमिनीच्या भोगवटदार शेतकऱ्यांची माहिती गोळा केली. अशा सर्व शेतकऱ्यांना तलाठ्यांनी प्रति आर १४० रुपये दराने जमीन रूपांतरण कर आकारून हजारो रुपयांच्या लेखी नोटीसा दिल्या आहे. सदर नोटीसा प्राप्त होताच शेतकरी अंचब्यात पडले आहेत आमची कोणतीही मागणी नसताना हा आर्थिक भुर्दंड आम्ही का भरावा असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे. खेड्यात निवासी वस्ती वाढण्याची कोणतीच शक्यता नाही. आहे तीच घरे सोडून खेड्यातील अनेकजण रोजी रोटीच्या शोधात शहरात जातात. दिवसेंदिवस खेडी ओस पडत आहे.शेतसाऱ्याएैवजी भरावा लागणारा निवासी वाढीव करगौरखेडा येथील एका शेतकऱ्याला सिलींगमध्ये जमीन प्राप्त झाली होती. ती मिळाल्यापासून ती पडीतच आहे. पण आता त्याला ११ हजार रुपये भरण्याची नोटीस मिळाली. या जमिनी एकदा अकृषक रूपांतरीत झाल्या की मग पुढे शेतकऱ्यांना शेतसाऱ्याऐवजी निवासी उद्देशाने वापरात येणाऱ्या जमिनीवर लागणारा वाढीव कर दरवर्षी भरावा लागणार आहे.सक्तीने जमिनी अकृषक करून शेतकऱ्यांजवळून हजारो रुपये वसुल करण्याचा हा शासन निर्णय म्हणजे आधुनिक पेशवाईतील सिझीया कर आहे.शिरीष वाघ, शेतकरी, रोहणा

टॅग्स :agricultureशेतीGovernmentसरकार