शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मागणी नसतानाही गावालगत शेतजमिनी करणार अकृषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 14:31 IST

शेतकऱ्यांची कोणतीही मागणी नसताना राज्य शासनाने प्रत्येक गावच्या नगराच्या किंवा शहराच्या हद्दीपासून २०० मीटरच्या आतील क्षेत्रात येणारी शेतजमीन अकृषक रूपांतरीत करण्याचा शासन निर्णय घेतला.

ठळक मुद्देशासनाचा अफलातून निर्णय शेतकरी होणार दिवाळखोर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांची कोणतीही मागणी नसताना राज्य शासनाने प्रत्येक गावच्या नगराच्या किंवा शहराच्या हद्दीपासून २०० मीटरच्या आतील क्षेत्रात येणारी शेतजमीन अकृषक रूपांतरीत करण्याचा शासन निर्णय घेतला. त्यासाठी लागणारा कर शेतकऱ्यांनी भरावा असे लेखी पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठ्यामार्फत शेतकऱ्यांना दिले आहे. हे लेखी पत्र पाहून धास्तावले आहेत.शासनाने राज्यातील सर्व गाव नगर व शहराच्या हद्दीपासून २०० मीटरच्या आत जी शेतजमीन आहे. ती शासन स्वत:हून अकृषक रूपांतरण करणार आहे. त्यासाठी शासनाच्या महसूल विभागाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अशा शेतजमिनीच्या भोगवटदार शेतकऱ्यांची माहिती गोळा केली. अशा सर्व शेतकऱ्यांना तलाठ्यांनी प्रति आर १४० रुपये दराने जमीन रूपांतरण कर आकारून हजारो रुपयांच्या लेखी नोटीसा दिल्या आहे. सदर नोटीसा प्राप्त होताच शेतकरी अंचब्यात पडले आहेत आमची कोणतीही मागणी नसताना हा आर्थिक भुर्दंड आम्ही का भरावा असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे. खेड्यात निवासी वस्ती वाढण्याची कोणतीच शक्यता नाही. आहे तीच घरे सोडून खेड्यातील अनेकजण रोजी रोटीच्या शोधात शहरात जातात. दिवसेंदिवस खेडी ओस पडत आहे.शेतसाऱ्याएैवजी भरावा लागणारा निवासी वाढीव करगौरखेडा येथील एका शेतकऱ्याला सिलींगमध्ये जमीन प्राप्त झाली होती. ती मिळाल्यापासून ती पडीतच आहे. पण आता त्याला ११ हजार रुपये भरण्याची नोटीस मिळाली. या जमिनी एकदा अकृषक रूपांतरीत झाल्या की मग पुढे शेतकऱ्यांना शेतसाऱ्याऐवजी निवासी उद्देशाने वापरात येणाऱ्या जमिनीवर लागणारा वाढीव कर दरवर्षी भरावा लागणार आहे.सक्तीने जमिनी अकृषक करून शेतकऱ्यांजवळून हजारो रुपये वसुल करण्याचा हा शासन निर्णय म्हणजे आधुनिक पेशवाईतील सिझीया कर आहे.शिरीष वाघ, शेतकरी, रोहणा

टॅग्स :agricultureशेतीGovernmentसरकार