शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

अभिमन्यू कुटेमाटे जिल्ह्यातून प्रथम

By admin | Updated: June 14, 2017 00:49 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला.

दहावीचा निकाल ८०.१२ टक्के : २७४ शाळांतून १५ हजार १३१ विद्यार्थी उत्तीर्ण लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान वर्धेच्या अग्रगामी हायस्कूल येथील अभिमन्यू सुनील कुटेमाटे याने पटकाविला. त्याला ९८.२० (४९१ गुण) टक्के मिळाले. तर जिल्ह्यातून दुसरा येण्याचा मान तीन विद्यार्थ्यांनी संयुक्तरित्या पटकाविला आहे. यात हिंगणघाट येथील एसएसएम विद्यालयाची तेजस्विनी भास्कर नवघरे हिच्यासह अग्रगामी हास्कूलची श्रेया कमलेश आकरे व सुशील हिंमतसिंगका येथील मोहित देवेंद्र चांदोरे या तीन विद्यार्थ्यांनी ९७.६० टक्के घेतले आहे. यंदाच्या सत्रात एकूण १५ हजार १३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याची टक्केवारी ८०.१२ एवढी आहे. उत्तीर्ण झालेल्यांत ७ हजार ७०४ मुले असून त्यांची टक्केवारी ७४.६७ टक्के आहे. तर ७ हजार ७२४ मुली असून त्यांची टक्केवारी ८६.१५ एवढी आहे. या निकालातही मुलींनीच आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील २७४ शाळांमधून एकूण १८ हजार ९४८ विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरला होता. यात ९ हजार ९५९ मुले आणि ८ हजार ९८९ मुलींचा समावेश होता. यातील १८ हजार ८८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ९,९२० मुले आणि ९,९६६ मुलींनी परीक्षा दिली. सर्वाधिक निकाल ८३.४२ टक्के निकाल वर्धा तालुक्याचा आहे. तर सर्वात कमी ७५.८५ टक्के निकाल सेलू तालुक्याचा आहे. या व्यतिरिक्त आर्वी ७८.१२, आष्टी (शहीद) ७६.९५, देवळी ८०.३२, हिंगणघाट ८१.३५, कारंजा (घाडगे) ७४.७८ तर समुद्रपूर तालुक्याचा निकाल ७९.७९ टक्के आहे. जिल्ह्यातील १९ शाळांचा निकाल १०० तर आठ शाळांचा निकाल ३६ टक्क्यांच्या आत आहे.