शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

९६,६०१ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 11:23 PM

डिसेंबर महिन्यात मुदत संपणार असलेल्या ८६ ग्रामपंचायतीकरिता सोमवारी मतदान होणार आहे.

ठळक मुद्दे८६ ग्रामपंचायतींकरिता मतदान : जिल्हाभरात एकूण २७८ मतदान केंद्र सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : डिसेंबर महिन्यात मुदत संपणार असलेल्या ८६ ग्रामपंचायतीकरिता सोमवारी मतदान होणार आहे. याकरिता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीत एकूण ९६ हजार ६०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात ४४ हजार २०८ महिला आणि ५० हजार ३८९ पुरूष मतदारांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त चार अन्य मतदारांचा समावेश आहे.मतदानाच्या कार्यक्रमाला सकाळी ७ वाजता प्रारंभ होणार आहे. निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीत एकूण २७६ केंद्र तयार करण्यात आले आहे. या केंद्रांवर प्रत्येकी चार म्हणजेच एकूण १ हजार ११२ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून होणाºया प्रत्येक घडामोडीवर लक्ष राहणार आहे. मतदानाच्या काळात कुठलीही गडबड होणार नाही याची दक्षता घेण्याकरिता जिल्हाधिकाºयांनी थेट कलम ३६ जारी केली आहे. शिवाय पोलीस विभागाच्यावतीनेही बंदोबस्त लावण्यात आला आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस आणि एक गृहरक्षक देण्यात आल्याची माहिती पोलीस विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. शिवाय पोलिसांचे एक विशेष पथक फिरत राहणार असून दंगल नियंत्रण पथकासही सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.जिल्ह्यात यापूर्वी ११२ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार होती. मात्र सेलू तालुक्यात काही उमेदवारांना पतंग चिन्ह देण्यात आल्याने गडबड झाली. यामुळे तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीकरिता नवा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या कार्यक्रमानुसार येथे २३ आॅक्टोबर रोजी मतदान होणार असल्याने उमेदवार चिंतेत सापडले आहेत.सरपंचपदाकरिता एकूण ३०२ उमेदवारहोत असलेल्या निवडणुकीत पाच ग्रामपंचायती अविरोध ठरल्या तरी सरपंच पदाच्या निवडणुकीकरिता चांगलीच चुरस असल्याचे दिसून आले आहे. एकूण ३०२ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी कितींच्या गळ्यात विजयाची माळ पडते याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.पाच ग्रामपंचायती ठरल्या अविरोधजिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतीने सरपंच पदासह सदस्याचीही बिनविरोध निवडणूक करून एक आदर्श निर्माण केला आहे. वर्धा तालुक्यातील पांढरकवडा (गणेशपूर) या ग्रामपंचायतीतील सरपंचासह सातही सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जऊळगाव व झाडगाव येथील प्रत्येकी एका सदस्याची बिनविरोध निवड झाली आहे. आष्टी तालुक्यातील १ सरपंच व १३ सदस्य, कारंजा तालुक्यातील २ सरपंच व ४८ सदस्य तर आर्वी तालुक्यातील १ सरपंच व ३५ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. एकंदरीत पाच ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाच्या ५ व १९२ उमेदवारांची निवड बिनविरोध निवड झाली आहे.२७८ बॅलेट कंट्रोल, ५५६ बॅलेट युनिट८६ गावांत होत असलेल्या या निवडणुकीत प्रशासनाची व्यवस्था पूर्ण झाली आहे. मतदानाकरिता २७८ कंट्रोल युनिट आणि ५५६ बॅलेट युनिट सज्ज करण्यात आले आहे. या माध्यमातून ही निवडणूक पार पडणार असल्याची माहिती निवडणूक विभागाच्यावतीने सांगण्यात देण्यात आली आहे.