शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

९५ शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:00 IST

अजूनही अनेक शेतकऱ्यांना बँकांकडून पीककर्ज देण्यात आलेले नाही. काही शेतकऱ्यांनी उसणवारी आणि सौभाग्यवतीचे दागीने गहाण ठेऊन बियाण्यांची खरेदी करून त्याची लागवड केली; पण तब्बल ९५ शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे बियाणे अंकुरलेच नसल्याचे वास्तव आहे. तशी नोंदही कृषी विभागाने घेतली आहे.

ठळक मुद्देदुबार पेरणीचे संकट। सोयाबीन बियाणे अंकुरलेच नाही, कारवाईसाठी कृषी विभाग सुस्तच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना संकटातही जिल्ह्यातील शेतकरी मोठा धाडस करून विविध पिकांची लागवड करीत आहे. असे असले तरी आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल ९५ सोयाबीन उत्पादकांना बोगस बियाण्यांचा फटका बसल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.प्राप्त माहितीनुसार, यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ७९ हजार २१.२ हेक्टरवर सोयाबीनची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अंकुरलेले पीक करपण्यास सूरूवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे असे शेतकरी पिकांना ओलित करून अंकुरलेले पीक वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत.तर अजूनही अनेक शेतकऱ्यांना बँकांकडून पीककर्ज देण्यात आलेले नाही. काही शेतकऱ्यांनी उसणवारी आणि सौभाग्यवतीचे दागीने गहाण ठेऊन बियाण्यांची खरेदी करून त्याची लागवड केली; पण तब्बल ९५ शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे बियाणे अंकुरलेच नसल्याचे वास्तव आहे. तशी नोंदही कृषी विभागाने घेतली आहे.बियाणेच अंकुरले नसल्याने या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादकांना तातडीने शासकीय मदत कृषी विभागाने मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.नुकसान भरपाईसाठी ग्राहक मंचात मागावी लागेल दादसोयाबीनच्या बोगस बियाण्यांची विक्री करणाºया कंपन्यांवर कठोर कारवाई न करता कुंभकर्णी झोपेचे सोंग घेऊन असलेल्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर सध्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जि.प. कृषी विभागाच्या सूचनेवरून काही बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्या सध्या शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे बदलून देत असले तरी लागवडीसाठी लागलेल्या खर्चाची नुकसान भरपाई मिळविण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ग्राहक मंचात दाद मागावी लागणार आहे.कृषी विभागाचा अहवाल महत्त्वाचानुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाईसाठी ग्राहक मंचात दादमागताना कृषी विभागाकडून त्यांनीकेलेल्या सर्वेक्षणाबाबतचा अहवाल प्राप्त करून तो सदर प्रस्तावाला सलग्नकरावा लागणार आहे.शिवाय बियाणे खरेदी केल्याचे बिल आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जोडावी लागणार आहे.