शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

९५ शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:00 IST

अजूनही अनेक शेतकऱ्यांना बँकांकडून पीककर्ज देण्यात आलेले नाही. काही शेतकऱ्यांनी उसणवारी आणि सौभाग्यवतीचे दागीने गहाण ठेऊन बियाण्यांची खरेदी करून त्याची लागवड केली; पण तब्बल ९५ शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे बियाणे अंकुरलेच नसल्याचे वास्तव आहे. तशी नोंदही कृषी विभागाने घेतली आहे.

ठळक मुद्देदुबार पेरणीचे संकट। सोयाबीन बियाणे अंकुरलेच नाही, कारवाईसाठी कृषी विभाग सुस्तच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना संकटातही जिल्ह्यातील शेतकरी मोठा धाडस करून विविध पिकांची लागवड करीत आहे. असे असले तरी आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल ९५ सोयाबीन उत्पादकांना बोगस बियाण्यांचा फटका बसल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.प्राप्त माहितीनुसार, यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ७९ हजार २१.२ हेक्टरवर सोयाबीनची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अंकुरलेले पीक करपण्यास सूरूवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे असे शेतकरी पिकांना ओलित करून अंकुरलेले पीक वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत.तर अजूनही अनेक शेतकऱ्यांना बँकांकडून पीककर्ज देण्यात आलेले नाही. काही शेतकऱ्यांनी उसणवारी आणि सौभाग्यवतीचे दागीने गहाण ठेऊन बियाण्यांची खरेदी करून त्याची लागवड केली; पण तब्बल ९५ शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे बियाणे अंकुरलेच नसल्याचे वास्तव आहे. तशी नोंदही कृषी विभागाने घेतली आहे.बियाणेच अंकुरले नसल्याने या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादकांना तातडीने शासकीय मदत कृषी विभागाने मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.नुकसान भरपाईसाठी ग्राहक मंचात मागावी लागेल दादसोयाबीनच्या बोगस बियाण्यांची विक्री करणाºया कंपन्यांवर कठोर कारवाई न करता कुंभकर्णी झोपेचे सोंग घेऊन असलेल्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर सध्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जि.प. कृषी विभागाच्या सूचनेवरून काही बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्या सध्या शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे बदलून देत असले तरी लागवडीसाठी लागलेल्या खर्चाची नुकसान भरपाई मिळविण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ग्राहक मंचात दाद मागावी लागणार आहे.कृषी विभागाचा अहवाल महत्त्वाचानुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाईसाठी ग्राहक मंचात दादमागताना कृषी विभागाकडून त्यांनीकेलेल्या सर्वेक्षणाबाबतचा अहवाल प्राप्त करून तो सदर प्रस्तावाला सलग्नकरावा लागणार आहे.शिवाय बियाणे खरेदी केल्याचे बिल आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जोडावी लागणार आहे.