शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

९५ शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:00 IST

अजूनही अनेक शेतकऱ्यांना बँकांकडून पीककर्ज देण्यात आलेले नाही. काही शेतकऱ्यांनी उसणवारी आणि सौभाग्यवतीचे दागीने गहाण ठेऊन बियाण्यांची खरेदी करून त्याची लागवड केली; पण तब्बल ९५ शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे बियाणे अंकुरलेच नसल्याचे वास्तव आहे. तशी नोंदही कृषी विभागाने घेतली आहे.

ठळक मुद्देदुबार पेरणीचे संकट। सोयाबीन बियाणे अंकुरलेच नाही, कारवाईसाठी कृषी विभाग सुस्तच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना संकटातही जिल्ह्यातील शेतकरी मोठा धाडस करून विविध पिकांची लागवड करीत आहे. असे असले तरी आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल ९५ सोयाबीन उत्पादकांना बोगस बियाण्यांचा फटका बसल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.प्राप्त माहितीनुसार, यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ७९ हजार २१.२ हेक्टरवर सोयाबीनची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अंकुरलेले पीक करपण्यास सूरूवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे असे शेतकरी पिकांना ओलित करून अंकुरलेले पीक वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत.तर अजूनही अनेक शेतकऱ्यांना बँकांकडून पीककर्ज देण्यात आलेले नाही. काही शेतकऱ्यांनी उसणवारी आणि सौभाग्यवतीचे दागीने गहाण ठेऊन बियाण्यांची खरेदी करून त्याची लागवड केली; पण तब्बल ९५ शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे बियाणे अंकुरलेच नसल्याचे वास्तव आहे. तशी नोंदही कृषी विभागाने घेतली आहे.बियाणेच अंकुरले नसल्याने या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादकांना तातडीने शासकीय मदत कृषी विभागाने मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.नुकसान भरपाईसाठी ग्राहक मंचात मागावी लागेल दादसोयाबीनच्या बोगस बियाण्यांची विक्री करणाºया कंपन्यांवर कठोर कारवाई न करता कुंभकर्णी झोपेचे सोंग घेऊन असलेल्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर सध्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जि.प. कृषी विभागाच्या सूचनेवरून काही बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्या सध्या शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे बदलून देत असले तरी लागवडीसाठी लागलेल्या खर्चाची नुकसान भरपाई मिळविण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ग्राहक मंचात दाद मागावी लागणार आहे.कृषी विभागाचा अहवाल महत्त्वाचानुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाईसाठी ग्राहक मंचात दादमागताना कृषी विभागाकडून त्यांनीकेलेल्या सर्वेक्षणाबाबतचा अहवाल प्राप्त करून तो सदर प्रस्तावाला सलग्नकरावा लागणार आहे.शिवाय बियाणे खरेदी केल्याचे बिल आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जोडावी लागणार आहे.