शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

नऊ कोटी रुपयांतून डॉ. आंबेडकर उद्यानाचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:45 IST

शहरातील सिव्हील लाईन परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानावर नगर पंचायतीच्यावतीने प्रारंभी अर्धा कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. एक उत्तम उद्यान म्हणून उदयास आलेल्या या जागेला राजकीय वितुष्टामुळे खिळ बसली.

ठळक मुद्दे१४ वर्षांपासून वाद होता न्यायालयात : शहरवासीयांची अद्ययावत उद्यानाची प्रतीक्षा संपली; वाद मिटविण्यात वर्धा पालिकेला यश

ऑनलाईन लोकमतवर्धा : शहरातील सिव्हील लाईन परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानावर नगर पंचायतीच्यावतीने प्रारंभी अर्धा कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. एक उत्तम उद्यान म्हणून उदयास आलेल्या या जागेला राजकीय वितुष्टामुळे खिळ बसली. नगर परिषदेत भाजपची एक हाती सत्ता आल्याने आता या उद्यानाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला. अमृत योजना व सेवाग्राम विकास आराखड्या अंतर्गत उद्यानाच्या विकासासाठी ९ कोटी रुपये मंजूर झाले आहे. या उद्यानाच्या कामांना लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.सन २००५ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष सुनीता इथापे यांनी ३० लक्ष रुपये खर्च करून या उद्यानाचा विकास साधला होता. यावेळी नागरिकांना २ रुपये शुल्क आकारून उद्यानात जाण्याची सुविधा देण्यात आली होती. दरम्यान एका नगरसेवकाच्या कुटुंबाला शुल्क भरणे कमीपणा वाटल्याने वाद उफाळला. या वादातून पालिकेत ठराव घेत उद्यानाची देखभाल करणाºया महिला बचत गटाकडून कारभार काढण्यात आला होता. त्या काळापासून हा वाद कायमच होता.हा वाद न्यायालयात गेल्याने १४ वर्षांपासून उद्यानाला अवकळा आली होती. तब्बल १४ एकराच्या या परिसरात बेशरमची झुडपे, लव्हाळ, काटेरी झाडे उगवल्याने उद्यान की, झुडपी जंगल असा प्रश्न येथे येणाºयांना पत होता. आता ९ कोटी रुपयांतून त्याचा विकास होणार आहे. वर्धा शहरात राबविण्यात येणाºया अमृत योजनेतून ४ कोटी आणि सेवाग्राम विकास आराखड्यातून ५ कोटी रुपये या कामाकरिता मंजूर करण्यात आले आहे.या विकास कामाचा भूमिपूजन समारंभ रविवारी होणार आहे. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे व इतर नगरसेवक तथा पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.रंगीन कारंजे आणि चिमुकल्यांसाठी खेळणीशहरात सर्व सुविधायुक्त एकही बालोद्यान नसल्याने शहरात येणाºया पर्यटकांना बसण्याची व त्यांच्या पाल्यांना खेळण्यासाठी जागा नव्हती. ही बाब वर्धेकरांना बोचणारी होती. शिवाय येथे घडणाºया अवैद्य प्रकारामुळेही परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. या उद्यानाच्या विकासाची मागणी होत असल्याने नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी ही समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. ही समस्या मार्गी लागली असून या उद्यानात संगीतावर चालणारे रंगीन कारंजे, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाक व फिरण्यासाठी आकर्षक ट्रॅक विविध प्रजातीची झाडे आणि चिमुकल्यांना खेळण्यासाठी विविध खेळणी लावण्यात येणार असल्याची माहिती आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे असलेल्या या उद्यानाला १४ वर्षांपासून अवकळा आली होती. या संदर्भात विविध संघटनांची आणि न्यायालयात गेलेल्या बचत गटाशी चर्चा करून हा वाद निवळण्यात यश आले. दरम्यानच्या काळात अमृत योजनेंतर्गत विकास कामे करताना हिरवळ निर्माण करण्याचा निर्णय असल्याने या उद्यानाचा कायापालट करण्याचे संकल्पना डोक्यात आली. तेथूनच अद्यावत उद्यान निर्माण करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. याला पालकमंत्र्यांनीही पाठबळ दिले.- अतुल तराळे, नगराध्यक्ष, वर्धा