शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

९३,६४८ शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

By admin | Updated: June 13, 2017 01:03 IST

शासनाने अल्पभूधारक व मध्यम शेती असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर संपूर्ण कर्जमाफी तत्त्वत: मान्य केली.

थकबाकी २,८८३.२३ कोटींवर : १ लाख १९ हजार शेतकऱ्यांना मिळाला होता व्याजमाफीचा लाभलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाने अल्पभूधारक व मध्यम शेती असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर संपूर्ण कर्जमाफी तत्त्वत: मान्य केली. या माफीचा विचार केल्यास मार्च २०१७ पर्यंत कर्जाची उचल करणाऱ्या जिल्ह्यातील ९३ हजार ६४८ शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होण्याचे संकेत आहेत. या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरिता जिल्ह्याला २ हजार ८८३.२३ कोटी रुपयांची गरज वर्तविण्यात येत आहे. यातील कितींना लाभ मिळतो हे अंतिम निकषानंतरच कळणार आहे. या कर्जाव्यतिरिक्त मियादी कर्ज आणि शेतीसाहित्य खरेदीकरिता घेतलेल्या कर्जासह कर्जाचे पुनर्गठण करणाऱ्या ६४ हजार ९१६ शेतकऱ्यांवर ३ हजार १७.६४ कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे. या कर्जमाफीत त्यांचेही कर्ज माफ होईल अशी चर्चा जोर धरत आहे. या दोन्ही वर्गातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाल्यास जिल्ह्याला ५ हजार ९००.९७ कोटी रुपयांची गरज आहे. सध्या शासनाने अल्पभूधारक आणि मध्यम शेती असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. तर संपूर्ण कर्जमाफीला तत्वत: मान्यता दिली आहे. शासनाच्यावतीने यापूर्वी सन २००८ मध्ये कर्जमाफी केली होती. त्यानंतर आत्महत्याग्रस्त जिल्हा असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जावरील व्याज माफ करण्यात आले होते. सोबतच शेतकऱ्यांनी कर्ज भरावे म्हणून संपूर्ण कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २० हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णयही झाला होता. या निर्णयानुसार जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला. मात्र निसर्गाची अवकृपा आणि झालेली नापिकी यामुळे शेतकऱ्यांवरील कर्ज वाढतच गेल्याचे दिसून आले आहे. या कर्जाची परतफेड करणे शक्य झाले नसल्याने शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी जोर धरू लागली.याच मागणीवरून शेतकऱ्यांनी संप पुकारला. या संपातून शेतकऱ्यांचा संताप व्यक्त झाला. शेतकऱ्यांच्या या संपापुढे शासनाने माघार घेत कर्जमाफी जाहीर केली आहे. या कर्जमाफीत जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना अधिक होणार असल्याचे दिसून आले आहे. यात वर्धा जिल्ह्यात अशा शेतकऱ्यांची संख्या बरीच असल्याचे दिसून आले आहे. शासनाने या शेतकऱ्यांना कर्ज देत शेतीच्या कामात अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. यामुळे बँकांत शेतकऱ्यांची चांगलीच गर्दी होत आहे. आतापर्यंत कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या माफीचा लाभ मिळणार असल्याचे संकेत आहेत. यामुळे त्यांच्याकडून नव्याने कर्जाची उचल करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सन २००८ मध्ये मिळाला होता ८४ हजार ९०३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ शासनाच्यावतीने यापूर्वी सन २००८ मध्ये कर्जमाफी जाहीर केली होती. याचा लाभ वर्धा जिल्ह्यातील एकूण ८४ हजार ९०३ शेतकऱ्यांना मिळाला होता. या शेतकऱ्यांवर १०२ कोटी ७ लाख ८४ हजार रुपयांचे कर्ज होते. या कर्जमाफीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे अंदाजे ७४ कोटी ६९ लाख ८२ हजार रुपयांचे कर्ज माफ झाले होेते. १६ हजार ५५२ शेतकऱ्यांनी घेतला २० हजारांच्या माफीचा लाभ आत्महत्याग्रस्त जिल्हा असलेल्या वर्धेकरिता शासनाकडून शेतकऱ्यांकरिता संपूर्ण कर्ज भरल्यास २० हजार रुपये माफ करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा लाभ जिल्ह्यातील १६ हजार ५५२ शेतकऱ्यांनी घेतला. त्यांना ३५ कोटी ६६ लाख ९ हजार रुपयांची मदत मिळाली. यावेळी जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी सरसकट कर्जाचा भरणा केला होता. व्याजापोटी झाले होते १२०.३१ कोटी माफ शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याने शासनाच्यावतीने पीक कर्जावरील व्याज माफ करण्यात आले होते. याचा लाभ जिल्ह्यातील १ लाख १९ हजार ३०९ शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. या शेतकऱ्यांवर २७९ कोटी ६० लाख ८९ रुपयांचे कर्ज होते. या कर्जावर चढलेले १२० कोटी २१ लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज माफ झाले होते. या व्याजमाफीकरिता राज्य शासनाकडून ६० कोटी १५ लाख ८६ हजार तर केंद्र शासनाकडून ६० कोटी १५ लाख ८६ हजार रुपयांचे अनुदान जिल्ह्याला प्राप्त झाले होते.