शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

१० वर्षांत जिल्ह्यात ९१५ कि.मी. रस्तेकाम

By admin | Updated: December 30, 2014 23:39 IST

महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेंतर्गत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात २००१ ते २०१४ पर्यंत तब्बल २२६ कोटी ९९ हजार रुपयांचा निधी रस्ते बांधकामावर खर्च करण्यात आला.

२२६ कोटींचा निधी खर्च : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून १३१ कामे पूर्णवर्धा : महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेंतर्गत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात २००१ ते २०१४ पर्यंत तब्बल २२६ कोटी ९९ हजार रुपयांचा निधी रस्ते बांधकामावर खर्च करण्यात आला. यामध्ये १३१ कामांचा समावेश आहे. यामाध्यमातून ९१५.२६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले. सोमवारपासून जिल्ह्यात सदर योजनेतील रस्त्यांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय समिती दाखल झाल्यामळे या रस्त्यांच्या बांधकामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह लागले आहे. सदर योजनेंत २०११-१२ पर्यंतची कामे पूर्णत्वास आल्याचे सदर बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. यानंतरच्या अकराव्या टप्प्यातील कामे प्रगतीपथावर असल्याचे म्हटले जात आहे; मात्र जिल्ह्यातील एकूणच पूर्णत्वास आलेल्या रस्त्यांचा ओझरता आढवा घेतला तर कुठेही रस्ते सुस्थितीत नसल्याचे चित्र आहे. सोमवारपासून जिल्ह्यात मुक्कामी असलेली समिती चौकशीतून काय सत्य बाहेर काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)केंद्रीय समिती प्रत्येक तालुक्यांतील रस्त्यांची कामे बघत आहे. पहिल्या दिवशी हिंगणघाट तालुक्यातील रस्त्यांची चौकशी केली.मंगळवारी ही समिती सकाळी सेलू तालुक्यात गेली होती. दरम्यान, झडशी, आमगाव, दहेगाव, बोंडसुला, वासी, गिरगाव येथील कामे तपासण्यात आली. समिती दुपारी झडशी परिसरात रस्त्याच्या चौकशीकरिता गेली होती; मात्र येथे या समितीतील एकही सदस्य वाहनातून खाली उतरुन नेमकी स्थिती जाणून घेण्याच्या भानगडीत पडला नाही. केवळ गाडीचे दार उघडून या समितीने काढता पाय घेतल्याची माहिती आहे.