शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
3
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
4
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
5
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
6
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
7
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
8
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
9
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
10
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
11
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
12
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत
13
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
14
पाकिस्तानात भिकाऱ्यांकडे बंगला, स्विमिंग पूल अन् SUV कार...; कसा चालतो हा व्यापार?
15
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदीपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
16
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
17
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
18
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
19
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
20
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं

सात महिन्यात आढळले उच्चरक्तदाबाचे ८,९८५ रुग्ण

By admin | Updated: November 11, 2014 22:45 IST

बदलती जीवनशैली, वाढता तणाव, खाणपानात झालेले बदल याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. अनेकांना यामुळे येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे जीवही

वर्धा : बदलती जीवनशैली, वाढता तणाव, खाणपानात झालेले बदल याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. अनेकांना यामुळे येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे जीवही गमवावा लागला आहे. नागरिकांना या आजाराची माहिती व्हावी, त्यांनी आरोग्याची तपासणी करावी याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने एनपीसीडीसीएस कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यात जिल्हा सामान्य रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात एकूण एक लाख चार हजार ७७८ नागरिकांनी तपासणी केली. त्यापैकी आठ हजार ९८५ रुग्णांना उच्च रक्तदाबाने ग्रासल्याचे समोर आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनुपम हिवलेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी त्यांनी या आजारावर आळा मिळविण्याकरिता काय उपाययोजना कराव्या याची माहिती दिली. सोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने या दृष्टीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देताना सामान्य रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात एनसीडी कार्यक्रमांतर्गत विविध सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात आलेल्या रुग्णांना मधुमेह व इतर असंसर्गजन्य आजार झाल्यास त्यांच्यावर उपचार करून भौतिकोपचारतज्ज्ञाच्या सहायाने मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ए. डवले व एसीडीसी कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ. सी. राऊत यांच्यासह एनपीसीडीसी कार्यक्रम राबविणारे कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)