शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

जिल्ह्यात ८०९ विहिरींचे काम रखडले

By admin | Updated: March 16, 2015 01:36 IST

नरेगाअंतर्गत जिल्ह्यात १ हजार ८४१ सिंचन विहिरींचे कामे असून धडक सिंचन विहिरी अंतर्गत ८६० विहिरी घेण्यात आल्या आहेत.

वर्धा : नरेगाअंतर्गत जिल्ह्यात १ हजार ८४१ सिंचन विहिरींचे कामे असून धडक सिंचन विहिरी अंतर्गत ८६० विहिरी घेण्यात आल्या आहेत. अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरी संदर्भात संबंधित यंत्रणेने प्रत्यक्ष पाहणी करून कामांचे अदांजपत्रक तयार करावे व प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्या सूचना मनरेगा आयुक्त मुध्युकृष्णन संकरनारायण यांनी दिल्यात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरींचे कामे प्राधान्यांने पूर्ण करण्यासोबतच धडक व जवाहर योजनेतील मंजूर विहिरी मनरेगा अंतर्गत ३० जून पूर्वी पूर्ण करण्यासंदर्भात नियोजन करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. बचत भवन येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींच्या कामांचा आढावा तसेच प्रत्यक्ष अमलबजावणी करतांना येणाऱ्या अडचणी संदर्भात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी संजय मीना, अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत, सहआयुक्त शरद भगत, रोहयो उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे, रोहेयोचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र भुयार यांच्यासह संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील अपूर्ण विहिरी संदर्भात क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणी सोडविण्यात आल्या असल्याचे सांगताना आयुक्त एम. संकरनारायण म्हणाले की विहिरीचे बांधकाम करतांना क्रेनच्या वापरासोबतच बांधकामासंदर्भात शासनाने नव्याने सूचना दिल्या असल्यामुळे सिंचन विहिरी पूर्ण करण्यासाठीच्या अडचणी राहणार नाहीत. नवीन सिंचन विहिरी मंजूर करतांना इतर अकुशल कामे प्राधान्याने घेतांना संबंधित लाभार्थ्यांच्या जमिनीवर वृक्ष अथवा फळझाड लागवड, शेततळे भुसुधारणेची कामे प्राधान्याने घेण्याचेही ते यावेळी म्हणाले. जिल्ह्यातील सिंचन विहिरी संदर्भात तसेच मनरेगा अंतर्गत येणाऱ्या अडचणी बाबत मुख्यकार्यपालन अधिकारी संजय मीणा यांनी माहिती दिली. मनरेगाचे सहआयुकत शरद भगत यांनी अंमलबजावणी यंत्रणांना येणाऱ्या अडचणी सोडवतांना अपूर्ण सिंचन विहिरी प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात. अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी स्वागत केले. यावेळी जिल्ह्यातील खंडविकास अधिकारी, सिंचन, बाधकाम, सामाजिक वनीकरण तसेच पाणी पुरवठा आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)