शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

८९६ विहिरी लालफीतशाहीत

By admin | Updated: April 26, 2015 01:26 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी धडक सिंचन विहिरीचा विशेष कार्यक्रम राबविण्यात आला आहे.

वर्धा : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी धडक सिंचन विहिरीचा विशेष कार्यक्रम राबविण्यात आला आहे. जिल्ह्याकरिता १० हजार ४०० विहिरी मंजूर आहेत. सिंचन विहिरी बांधकामाचे उद्दिष्ट मनरेगांतर्गत पूर्ण करावयाचे आहे. यापैकी केवळ १२२ विहिरींची कामे प्रगतीपथावर आहे. तर ८९६ कामे प्रशासकीय यंत्रणेकडून येत असलेल्या अडचणीत अडकल्याची माहिती आहे. या अडचणी सोडवून विहिरींचे बांधकाम लवकर पूर्ण करावे अशा सूचना विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी शुक्रवारी दिल्या. यावेळी अपर आयुक्त हेमंत पवार, उपायुक्त एम.ए.एच. खान, अपर जिल्हाधिकारी संजय भागवत, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, मुख्य कार्यपालन अधिकरी संजय मीना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्यासह सर्व उपविभागीय महसूल अधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यातील विविध विकास योजनांचा आढावा घेतला. यामध्ये जिल्हास्तरीय समितीकडे असलेल्या शेतकरी आत्महत्यासंबंधीची प्रकरणे कुटुंबांच्या वारसांना सानुग्रह अनुदान, नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे नुकसान, धडक सिंचन व जलयुक्त शिवार अभियानाचा आढावा घेतला.शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा आढावा घेताना अनुपकुमार म्हणाले, जिल्हास्तरीय समितीकडे प्रलंबित असलेले सर्व प्रकरणे सात दिवसांत निकाली काढा, तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या वारसांना सानुग्रह अनुदान तत्काळ उपलब्ध करून देतानाच प्रत्येक गावांमध्ये शेतकरी कुटुंबीयांना समुपदेशन करण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी तसेच ग्रामस्तरांवरील अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी नियमित संवाद ठेवावा, शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींसंदर्भात मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही यावेळी त्यांनी दिल्यात.कृषी समृद्धी प्रकल्पांतर्गत ग्रामस्तरावर शेतकऱ्यांना मदत मिळावी यादृष्टीने कार्यक्रमाची आखणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे व त्यांच्या अडचणी सोडविण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी केल्या. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मध्य प्रदेश प्रशासनाने सिंचन विहिरींचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविला आहे. त्याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यासह विभागात हा कार्यक्रम राबवून जास्तीत जास्त सिंचन विहिरी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यावर भर देण्याबाबत अनूप कुमार यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी अपर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी स्वागत करून जिल्ह्यातील विविध योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात माहिती दिली. यावेळी लोअर वर्धा प्रकल्प, अपर वर्धा प्रकल्प, कार नदी प्रकल्पातील प्रलंबित कामांचा आढावा आयुक्तांनी घेतला.(प्रतिनिधी)