शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

८९६ विहिरी लालफीतशाहीत

By admin | Updated: April 26, 2015 01:26 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी धडक सिंचन विहिरीचा विशेष कार्यक्रम राबविण्यात आला आहे.

वर्धा : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी धडक सिंचन विहिरीचा विशेष कार्यक्रम राबविण्यात आला आहे. जिल्ह्याकरिता १० हजार ४०० विहिरी मंजूर आहेत. सिंचन विहिरी बांधकामाचे उद्दिष्ट मनरेगांतर्गत पूर्ण करावयाचे आहे. यापैकी केवळ १२२ विहिरींची कामे प्रगतीपथावर आहे. तर ८९६ कामे प्रशासकीय यंत्रणेकडून येत असलेल्या अडचणीत अडकल्याची माहिती आहे. या अडचणी सोडवून विहिरींचे बांधकाम लवकर पूर्ण करावे अशा सूचना विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी शुक्रवारी दिल्या. यावेळी अपर आयुक्त हेमंत पवार, उपायुक्त एम.ए.एच. खान, अपर जिल्हाधिकारी संजय भागवत, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, मुख्य कार्यपालन अधिकरी संजय मीना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्यासह सर्व उपविभागीय महसूल अधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यातील विविध विकास योजनांचा आढावा घेतला. यामध्ये जिल्हास्तरीय समितीकडे असलेल्या शेतकरी आत्महत्यासंबंधीची प्रकरणे कुटुंबांच्या वारसांना सानुग्रह अनुदान, नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे नुकसान, धडक सिंचन व जलयुक्त शिवार अभियानाचा आढावा घेतला.शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा आढावा घेताना अनुपकुमार म्हणाले, जिल्हास्तरीय समितीकडे प्रलंबित असलेले सर्व प्रकरणे सात दिवसांत निकाली काढा, तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या वारसांना सानुग्रह अनुदान तत्काळ उपलब्ध करून देतानाच प्रत्येक गावांमध्ये शेतकरी कुटुंबीयांना समुपदेशन करण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी तसेच ग्रामस्तरांवरील अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी नियमित संवाद ठेवावा, शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींसंदर्भात मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही यावेळी त्यांनी दिल्यात.कृषी समृद्धी प्रकल्पांतर्गत ग्रामस्तरावर शेतकऱ्यांना मदत मिळावी यादृष्टीने कार्यक्रमाची आखणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे व त्यांच्या अडचणी सोडविण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी केल्या. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मध्य प्रदेश प्रशासनाने सिंचन विहिरींचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविला आहे. त्याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यासह विभागात हा कार्यक्रम राबवून जास्तीत जास्त सिंचन विहिरी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यावर भर देण्याबाबत अनूप कुमार यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी अपर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी स्वागत करून जिल्ह्यातील विविध योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात माहिती दिली. यावेळी लोअर वर्धा प्रकल्प, अपर वर्धा प्रकल्प, कार नदी प्रकल्पातील प्रलंबित कामांचा आढावा आयुक्तांनी घेतला.(प्रतिनिधी)