शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

७७,०८३ ग्राहकांची होणार बत्ती गूल

By admin | Updated: January 2, 2017 00:04 IST

विजेचा वापर करून आलेले देयक भरण्यास कुचराई करणाऱ्या ग्राहकांवर वीज जोडणी कापण्याचा बडगा महावितरणने उगारला आहे.

१२ कोटी रूपयांची थकबाकी : आतापर्यंत ६८८ जणांची कापली वीज रूपेश खैरी  वर्धा विजेचा वापर करून आलेले देयक भरण्यास कुचराई करणाऱ्या ग्राहकांवर वीज जोडणी कापण्याचा बडगा महावितरणने उगारला आहे. थकबाकी असलेल्या ग्राहकांची वीज कापण्याचा निर्णय झाला असून तशी मोहीम सुरू झाली आहे. यात वर्धा जिल्ह्यात १२ कोटी ६ लाख २८ हजार रुपयांच्या थकबाकीपोटी तब्बल ७७ हजार ८३ ग्राहकांची बत्ती गुल होणार आहे. या मोहिमेत थकबाकीदार असलेल्या घरगुती, व्यावसायिक, कारखानदार व शासकीय कार्यालयाचा समावेश आहे. मोहीम सुरू झाली त्या काळापासून आतापर्यंत ६८८ ग्राहकांची वीज कापण्यात आली आहे. यात ५९७ ग्राहकांची तात्पूरती तर ९१ ग्राहकांची वीज जोडणी कायमस्वरूपी कापण्यात आली आहे. थकबाकी असलेल्या ग्राहकांच्या घरी जात कंपनीच्यावतीने त्यांच्यावर असलेली थकबाकी भरण्याची मागणी करण्यात येते. जर ग्राहकाने थकबाकीची रक्कम भरली तर त्या घरातील वीज कायम ठेवण्यात येत आहे. जोपर्यंत असलेली थकबाकी पूर्ण वसूल होत नाही तोपर्यंत ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे. थकबाकीदार ग्राहकांकरिता अनेक योजना राबविण्यात आल्या. त्या योजनेचा लाभ घेण्याकरिता त्यांना सूचनाही देण्यात आल्या. असलेली थकबाकी भरण्यासंदर्भात विभागाच्यावतीने नोटीसही बजावल्या. असे असतानाही या ग्राहकांकडून वसुली संदर्भात कुठलीही कार्यवाही झाली नाही. उलट त्यांच्याकडील थकबाकी तशीच आहे. या थकबाकीमुळे महावितरणचे नुकसान होत असल्याने अखेर थकबाकी असलेल्या ग्राहकांची वीज कापण्याचा निर्णय झाला. या निर्णयानुसार जिल्ह्यातील तीनही झोन आणि वर्धा सर्कलमध्ये ही कारवाई सुरू झाली आहे. पाणी पुरवठा व स्ट्रीट लाईटच्या देयकापोटी थकले १७.९८ कोटी नागरी सुविधेत मोडत असलेल्या पाणी पुरवठा व स्ट्रीट लाईटचे देयक भरण्याकडे संबंधीत विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एकूण २ हजार २२९ योजनांवर आतापर्यंत देयकापोटी १७.९८ कोटी रुपये थकले आहे. यात १ हजार २७७ ग्राहक स्ट्रीट लाईट योजनेशी तर ९५२ ग्राहक पाणी पुरवठा योजनेशी निगडीत आहे. या दोन्ही बाबी नागरी सुविधेत येत असल्याने त्यांची वीज कापणे विभागाला सहज शक्य होत नाही. या योजनेची थकबाकी थेट राज्यस्तरावरून भरण्यात येत आहे. याची माहिती देताच ही थकबाकी प्राप्त होत असल्याचे वीज कंपनीकडून सांगण्यात आले आहे. या थकबाकीची माहिती त्या विभागाला देण्यात आली आहे. थकबाकीमुक्ती योजनेला अत्यल्प प्रतिसाद गत महिन्यात महावितरणच्यावतीने थकबाकी असलेल्या ग्राहकांकरिता थकबाकी मुक्ती योजना अंमलात आणली होती. या योजनेत ग्राहकांना काही नियमानुसार मूभा देण्यात येत होती. वर्धा जिल्ह्यात सुमारे ५७ हजार ८३८ ग्राहकांकडे २० कोटी ७४ लाख रुपये थकले होते. या ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार होता. यामुळे त्यांच्याकडून ही थकबाकी भरण्यासंदर्भात हालचाली होणे अपेक्षित होते; मात्र तसे झाले नाही. या योजनेला जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे.