शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

७७,०८३ ग्राहकांची होणार बत्ती गूल

By admin | Updated: January 2, 2017 00:04 IST

विजेचा वापर करून आलेले देयक भरण्यास कुचराई करणाऱ्या ग्राहकांवर वीज जोडणी कापण्याचा बडगा महावितरणने उगारला आहे.

१२ कोटी रूपयांची थकबाकी : आतापर्यंत ६८८ जणांची कापली वीज रूपेश खैरी  वर्धा विजेचा वापर करून आलेले देयक भरण्यास कुचराई करणाऱ्या ग्राहकांवर वीज जोडणी कापण्याचा बडगा महावितरणने उगारला आहे. थकबाकी असलेल्या ग्राहकांची वीज कापण्याचा निर्णय झाला असून तशी मोहीम सुरू झाली आहे. यात वर्धा जिल्ह्यात १२ कोटी ६ लाख २८ हजार रुपयांच्या थकबाकीपोटी तब्बल ७७ हजार ८३ ग्राहकांची बत्ती गुल होणार आहे. या मोहिमेत थकबाकीदार असलेल्या घरगुती, व्यावसायिक, कारखानदार व शासकीय कार्यालयाचा समावेश आहे. मोहीम सुरू झाली त्या काळापासून आतापर्यंत ६८८ ग्राहकांची वीज कापण्यात आली आहे. यात ५९७ ग्राहकांची तात्पूरती तर ९१ ग्राहकांची वीज जोडणी कायमस्वरूपी कापण्यात आली आहे. थकबाकी असलेल्या ग्राहकांच्या घरी जात कंपनीच्यावतीने त्यांच्यावर असलेली थकबाकी भरण्याची मागणी करण्यात येते. जर ग्राहकाने थकबाकीची रक्कम भरली तर त्या घरातील वीज कायम ठेवण्यात येत आहे. जोपर्यंत असलेली थकबाकी पूर्ण वसूल होत नाही तोपर्यंत ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे. थकबाकीदार ग्राहकांकरिता अनेक योजना राबविण्यात आल्या. त्या योजनेचा लाभ घेण्याकरिता त्यांना सूचनाही देण्यात आल्या. असलेली थकबाकी भरण्यासंदर्भात विभागाच्यावतीने नोटीसही बजावल्या. असे असतानाही या ग्राहकांकडून वसुली संदर्भात कुठलीही कार्यवाही झाली नाही. उलट त्यांच्याकडील थकबाकी तशीच आहे. या थकबाकीमुळे महावितरणचे नुकसान होत असल्याने अखेर थकबाकी असलेल्या ग्राहकांची वीज कापण्याचा निर्णय झाला. या निर्णयानुसार जिल्ह्यातील तीनही झोन आणि वर्धा सर्कलमध्ये ही कारवाई सुरू झाली आहे. पाणी पुरवठा व स्ट्रीट लाईटच्या देयकापोटी थकले १७.९८ कोटी नागरी सुविधेत मोडत असलेल्या पाणी पुरवठा व स्ट्रीट लाईटचे देयक भरण्याकडे संबंधीत विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एकूण २ हजार २२९ योजनांवर आतापर्यंत देयकापोटी १७.९८ कोटी रुपये थकले आहे. यात १ हजार २७७ ग्राहक स्ट्रीट लाईट योजनेशी तर ९५२ ग्राहक पाणी पुरवठा योजनेशी निगडीत आहे. या दोन्ही बाबी नागरी सुविधेत येत असल्याने त्यांची वीज कापणे विभागाला सहज शक्य होत नाही. या योजनेची थकबाकी थेट राज्यस्तरावरून भरण्यात येत आहे. याची माहिती देताच ही थकबाकी प्राप्त होत असल्याचे वीज कंपनीकडून सांगण्यात आले आहे. या थकबाकीची माहिती त्या विभागाला देण्यात आली आहे. थकबाकीमुक्ती योजनेला अत्यल्प प्रतिसाद गत महिन्यात महावितरणच्यावतीने थकबाकी असलेल्या ग्राहकांकरिता थकबाकी मुक्ती योजना अंमलात आणली होती. या योजनेत ग्राहकांना काही नियमानुसार मूभा देण्यात येत होती. वर्धा जिल्ह्यात सुमारे ५७ हजार ८३८ ग्राहकांकडे २० कोटी ७४ लाख रुपये थकले होते. या ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार होता. यामुळे त्यांच्याकडून ही थकबाकी भरण्यासंदर्भात हालचाली होणे अपेक्षित होते; मात्र तसे झाले नाही. या योजनेला जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे.