शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

जिल्ह्यातील आठ शहीद स्मारकांसाठी ७७ लाख

By admin | Updated: March 18, 2017 01:05 IST

स्वातंत्र्यलढ्यात आहुती देणाऱ्या शहिदांच्या स्मृती तेवत राहाव्या याकरिता जिल्ह्यात शहीद स्मारक उभारण्यात आले.

निधीतून होणार डागडुजी व रंगरंगोटी वर्धा : स्वातंत्र्यलढ्यात आहुती देणाऱ्या शहिदांच्या स्मृती तेवत राहाव्या याकरिता जिल्ह्यात शहीद स्मारक उभारण्यात आले. शासकीय उदासिनतेमुळे मात्र या शहीद स्मारकांची दैना झाली. त्यांच्या डागडुजीकरिता शासकीय तिजोरीतून रक्कम मिळत नसल्याने शहीद स्मारकेच शहीद होण्याच्या मार्गावर आली होती. याकडे वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधण्यात आले. शहीद स्मारकाची ही दुरवस्था दूर करण्याकरिता अखेर शासनाच्यावतीने निधी देण्यात आला. यात वर्धा जिल्ह्याला तब्बल ७७ लाख रुपये मंजूर झाले असून या निधीतून जिल्ह्यातील आठही शहीद स्मारकांचे रूपडे पालटणार आहे. वर्धा जिल्हा अनेक ऐतिहासिक लढ्याची साक्ष देणारा आहे. शिवाय महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम येथील आश्रमातून अनेक लढ्याची रूपरेषा आखण्यात आली. या काळात येथे अनेक स्वातंत्र्यसंग्राम सेनानी येत होते. त्यातील काही महात्मा गांधी यांच्यासोबत परत गेले तर काहींनी बापुंचा लढा वर्धेतूनच सुरू ठेवला. त्यांच्या निधनानंतर त्यांची आठवण म्हणनूही वर्धेत शहीद स्मारके तयार करण्यात आली. स्वातंत्र्याकरिता आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या या शहिदांना नमन करण्याकरिता असलेल्या या स्मारकाच्या देखभालीकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष झाले. अनेक स्मारके खंडर झाली. या स्मारकाच्या नावावर शहिदांची अवहेलना होत असल्याच्या अनेक तक्रारी झाल्या. या स्मारकांची दुरूस्ती करण्याकरिता अनेकवेळा मागणी झाली. ही मागणी अखेर पूर्णत्त्वास आली असून जिल्ह्याकरिता ७७ लाख रुपये मंजूर झाले आहे. मंजूर रकमेनुसार बांधकाम विभागाच्यावतीने आठही स्मारकांच्या नुतनीकरणाचा आराखडा तयार करणे सुरू आहे. यात स्मारकांची झालेली तुटफूट, तुटलेले छप्पर यासह रंगरंगोटी करण्यात येणार आहे. या कामाकरिता आवश्यक सूचना जिल्हाधिकारी कार्यालयातून रवाना झाल्या आहेत. प्रत्यक्ष कामाला महिन्याभऱ्यात प्रारंभ होणार असल्याची माहिती आहे. वर्धेत सामाजिक संस्थांनी स्वीकारले स्मारकांचे दायित्व वर्धा : वर्धेत असलेल्या शहीद स्मारकांचे दायीत्व काही सामाजिक संस्थांनी स्वीकारले होते. यात डॉ. आंबेडकर चौकातील स्मारक लायन्य क्लब आणि वरूड येथील स्मारकाचे पालकत्व निसर्ग सेवा समितीने स्वीकरीले होते. या दोन्ही सस्थांकडून सध्या या स्मारकांची देखभाल सुरू असल्याने त्यांची स्थिती उत्तम आहे. मात्र, जिल्ह्यातील इतर स्मारकांची स्थिती दयनीय झाली आहे. यामुळे त्यांची दुरूस्ती करून रंगरंगोटी करण्याची गरज निर्माण झाली आहे.(प्रतिनिधी)