शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

वन्यजीवांसाठी बोर व्याघ्रप्रकल्पात ७५ पाणवठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 22:05 IST

बोर व्याघ्रप्रकल्पात वन्य प्राण्यांची संख्या मोठी आहे. या प्राण्यांची उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी होणारी भटकंती थांबावी या उद्देशाने सदर प्रकल्पात एकूण ७५ कृत्रिम पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी २८ पाणवठ्यांमध्ये सौरऊर्जेचा वापर करून तर उर्वरित पाणवठ्यांमध्ये चार टँकरद्वारे पाणी भरले जात आहे.

ठळक मुद्दे२८ ठिकाणी सौरऊर्जेचा वापर करून, तर उर्वरित ठिकाणी टँकरने होतो पाणीपुरवठा

रितेश वालदे ।लोकमत न्यूज नेटवर्कबोरधरण : बोर व्याघ्रप्रकल्पात वन्य प्राण्यांची संख्या मोठी आहे. या प्राण्यांची उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी होणारी भटकंती थांबावी या उद्देशाने सदर प्रकल्पात एकूण ७५ कृत्रिम पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी २८ पाणवठ्यांमध्ये सौरऊर्जेचा वापर करून तर उर्वरित पाणवठ्यांमध्ये चार टँकरद्वारे पाणी भरले जात आहे. जंगलातच पाणी मिळत असल्याने बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांची पाण्यासाठीची होणारी भटकंती थांबली आहे.प्राप्त माहितीनुसार, ८१२.३२ हेक्टर क्षेत्रात तसेच १३८.१२ चौरस किमीमध्ये बोर व्याघ्र प्रकल्प पसरलेला आहे. यात बोर व न्युबोर असे दोन भाग आहेत. वर्धा व नागपूर जिल्ह्यात त्यांची सीमा आहे. राज्यातील जैविक विविधता आणि विपुलप्रमाणात वनसपदा यामुळे वन्यप्राण्यांची संख्याही येथे मोठी आहे. उन्हाळ्यात प्राण्यांना जंगल क्षेत्रातच पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे या हेतूने बोर व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम हाती घेतली. वनपरिक्षेत्र अधिकारी के. वाय. तळवेकर, जी. एफ. लुचे यांच्या नेतृत्वात राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान ७५ पाणवठ्यांची स्वच्छता करून त्यात वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यापैकी तीन पाणवठ्यात नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करून, २८ पाणवठ्यांमध्ये सौरउर्जेचा वापर करून तर ४४ पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी भरले जात आहे. या सर्व पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी टाकले जात असल्याने संभाव्य मनुष्य व वन्य जीव संघर्ष टाळण्यास मदत होत आहे. पाणवठ्यांमध्ये पाणी भरण्यासाठी तीन शासकीय तर एक खासगी टँकरचा वापर केल्या जात आहे. विशेष म्हणजे देशातील सर्वात छोटा व्याघ्रप्रकल्प म्हणून बोरची ओळख. परंतु, येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याने, शिवाय सदर पाणवठ्यांवर अनेक वन्यप्रेमींसह पर्यटकांना सध्या वन्यप्राण्यांचे सहज दर्शन होत आहे.वन्यप्राण्यांसह पक्ष्यांनाही आधार१३८.३२ चौरस किमी परिसरात पसरलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्याना सदर पाणवठे आधार देणारे ठरत आहे. बोर व्याघ्र मध्ये चितळ, सांबर, अस्वल, चिकारा, चौसिगा, रानकुत्रे, निलगाय, रानडुकरे, यासह वाघ, बिबट आदी वन्य प्राणी आहेत. सदर वन्यप्राण्यासोबत व्याघ्र प्रकल्पातील विविध प्रजातींच्या पक्ष्यांसाठीही हे पाणवठे फायद्याचे ठरत आहे.जंगल सफारी करणाऱ्यांच्या संख्येत होतेय दिवसेंदिवस वाढबोर व्याघ्र प्रकल्पातील जंगल क्षेत्रात वन्यप्राण्यांच्या अधिवासाजवळच पाणवठ्यांद्वारे पाणी उपलब्ध करून दिल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वन्य प्राण्यांची भटकंती थांबली आहे. असे असले तरी या व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीसाठी येणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.१९ पाणवठे वाढविलेबोर व्याघ्र प्रकल्पात २०१८ मध्ये ५६ पाणवठे होते. तर यंदा पाण्याची कमतरता भासत असल्याने आणि जंगलातच वन्य प्राण्यांना पाणी मिळावे या उद्देशाने १९ नवीन पाणवठे तयार करण्यात आले आहे. परिणामी, सध्या पाणवठ्यांची संख्या ७५ झाली आहे.

टॅग्स :Bor Tiger Projectबोर व्याघ्र प्रकल्प