शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

७५ गावांना भारनियमनाचा फटका

By admin | Updated: June 6, 2014 00:10 IST

यावर्षी सर्वाधिक तापमानाची नोंद झालेला उन्हाळा सर्वांनाच त्रासदायक ठरत आहे. आगीसारखा उन्हाच्या झळा बसत असल्यामुळे नागरिक कुलरच्या आधाराने दिवस काढण्याचा प्रयत्न करीत आहे.

अमोल सोटे - आष्टी(शहीद)यावर्षी सर्वाधिक तापमानाची नोंद झालेला उन्हाळा सर्वांनाच त्रासदायक ठरत आहे. आगीसारखा उन्हाच्या झळा बसत असल्यामुळे नागरिक कुलरच्या आधाराने दिवस काढण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र विद्युत वितरण कंपनीने दररोज आठ ते दहा तास भारनियमन सुरू केले आहे. आष्टी (शहीद) तालुक्यातील ७५ गावातील नागरिकांना याची झळ सोसावी लागत आहे.तालुक्यातील आष्टी, साहूर, तळेगाव, अंतोरा या चारही सर्कलमधून येणार्‍या गावांना दररोज भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. मजूर व शेतकरी मंडळी पहाटे ४.३0 वाजता शेतात जावून कामे करतात. सकाळी ११ वाजल्याबरोबर घराची वाट धरतात. घरी थकून आल्यावर पंखा, कुलर लावून आराम करण्याच्या बेतात असतानाच अचानक वीज पुरवठा खंडित होतो. नंतर तासनंतास वीजेची वाट पहावी लागत आहे. त्यामुळे दिवस उकाळ्यात काढावे लागत आहे. दूषित पाणी, वीज नाही या दोन्ही प्रमुख कारणांमुळे आजारामध्ये वाढ होत आहे. सरसकट भारनियमन असल्यावरही वीज कंपनी भारनियमन नसल्याचा दावा करीत आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी दिशाभूल करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अभियंता मुख्यालयी हजर राहत नाही. कार्यालय दिवसभर बंद असतात. वीज पुरवठा खंडीत झाल्यावर केव्हा येईल हे विचारण्यासाठी भ्रमणध्वनी केला असता कोणीच प्रतिसाद देत नाही. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या दुर्लक्षितपणामुळेच परिस्थिती उद्भवल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. भारनियमनामुळे गावात नियमित पाणीपुरवठा होत नाही. काही गावांमध्ये पाणी उपलब्ध असूनदेखील त्याचा काहीच उपयोग होत नाही.भारनियमनाचा फटका शेतीच्या पिकांना सुद्धा बसला आहे. संत्रा, ऊस, केळी, भाजीपाला पीक उन्हामुळे मार खात आहे. निसर्गाच्या अस्मानी संकटाचा बारमाही सामना केल्यावर हाती आलेले पीक निसटून जाते. त्यामुळे शेतकर्‍यांनी कोणत्या पद्धतीने कारभार करावा, या विवंचनेत शेतकरी आहे. मागील वर्षी नैसर्गिक   आपत्तीची झळ सर्वांनाच बसली. शासन तटपुंजी मदत देत शेतकर्‍यांची मनधरणी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करते.  नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीररित्या समजून शासनाने कारभारात तात्काळ पारदर्शकता आणण्याची गरज आहे. आठवडभरात भारनियमन कमी न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकर्‍यांनी विद्युत वितरण कंपनीला निवेदनाद्वारे केला आहे.