शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

एकट्या अध्यक्षांच्या फंडात ७५ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:32 IST

मिनी मंत्रालयात आतापर्यंत जे घडले नाही ते आता घडणार आहे. जिल्ह्यात विकास कामांना चालना देण्याचे कारण देत पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाने स्वत:करिता थोडे थोडके नव्हे तर ७५ लाख रुपये ठेवले आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच नियोजन : मंजुरीअंती रक्कम कोटींच्यावर जाण्याची शक्यता

रूपेश खैरी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मिनी मंत्रालयात आतापर्यंत जे घडले नाही ते आता घडणार आहे. जिल्ह्यात विकास कामांना चालना देण्याचे कारण देत पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाने स्वत:करिता थोडे थोडके नव्हे तर ७५ लाख रुपये ठेवले आहे. याला शनिवारी होणाºया बैठकीत मंजुरी देण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर करताना होणाºया चर्चेत ही रक्कम वाढून १ कोटी ४ लाख रुपये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलकरिता २ लाख रुपये राखीव ठेवण्याचा अध्यक्ष नितीन मडावी यांनी प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे. ही रक्कम नेमकी कोणत्या फंडातून उभी राहणार याचा खुलासा झाला नसल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष प्रत्येक सदस्यांना मिळणाºया १७ व्या सामूहिक विकास फंडाच्या निधीत कपात करणार असल्याची शंका निर्माण झाली आहे. तशी चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात सुरू झाली असून सदस्यांत भीतीचे वातावरण आहे. असे झाल्यास हा सदस्यांच्या अधिकारावर घालाच ठरणार असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.ही रक्कम कोणत्या सदस्याच्या हक्कातून नाही तर जिल्हा परिषदेत होत असलेल्या इतर खर्चात कपात करून उभारण्यात येणार असल्याचे अध्यक्ष मडावी यांनी सांगितले.केवळ स्वत:चा नाही तर इतर सदस्यांच्या विकास निधीतही वाढ करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.या विषयावर उद्या होणाºया अर्थसंकल्पीय सभेत चांगलीच चर्चा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.७ कोटी २४ लाखांची वाढीव तरतूदसुधारित अर्थसंकल्प मंजुरीकरिता शनिवारी सभा आयोजित आहे. या सभेत जिल्हा परिषदेच्या २८ कोटी ७५ लाख ५ हजार ६४८ रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता असल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाºयांनी अर्थसंकल्प तयार केला होता. हा अर्थसंकल्प २१ कोटी ७५ लाख ७२ हजार ३१२ रुपयांचा होता. हा निधी जिल्ह्याच्या विकासाकरिता कमी पडत असल्याने त्यात वाढ करणे अपेक्षित होते. तसे झालेही. यात सात कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.सुधारित अर्थसंकल्पात मूळ अर्थसकल्पाच्या तुलनेत महसुली खर्च वाढविण्यात आला आहे. मूळ अर्थसंकल्पात १८ कोटी ११ लाख २३ हजार २०० रुपये यावर खर्च करण्यात येणार होते. ही रक्कम वाढवून २५ कोटी ३६ लाख ६८ हजार ४८६ रुपये करण्यात आला आहे. तर भांडवली खर्च कमी करण्यात आला आहे. पूर्वी असलेला २३ कोटी ७० लाखांचा खर्च कपात करून तो १३ कोटींवर आणण्यात आला आहे. हा सर्व खर्च वजा जाता २ कोटी ८ लाख रुपये शिल्लकीचा हा अर्थसंकल्प आहे.