शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

७२ वर्षांत १६ जणांनी भूषविले सरपंचपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 22:30 IST

तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोराड ग्रामपंचायतीची निवडणूक २३ जूनला होत आहे. ७२ वर्षांत अनेक राजकीय स्थित्यंतरे पाहणाऱ्या गावाने १६ सरपंच दिले, जिल्हा परिषदेचे सभागृह गाजविले. या निवडणुकीत थेट सरपंच निवडल्या जाणार असल्याने ही निवडणूक विविध मुद्यांवर गाजण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याच्या राजकारणात होता घोराडचा दबदबा : यावेळच्या निवडणुकीत तिहेरी सामना

विजय माहुरे।लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोराड ग्रामपंचायतीची निवडणूक २३ जूनला होत आहे. ७२ वर्षांत अनेक राजकीय स्थित्यंतरे पाहणाऱ्या गावाने १६ सरपंच दिले, जिल्हा परिषदेचे सभागृह गाजविले. या निवडणुकीत थेट सरपंच निवडल्या जाणार असल्याने ही निवडणूक विविध मुद्यांवर गाजण्याची शक्यता आहे.२७ डिसेंबर १९४७ ला घोराड ग्रामपंचायत अस्तित्वात आली. शासन नियुक्त सरपंच म्हणून नारायण भिवाजी वाघे यांनी पदभार सांभाळला. सलग १३ वर्षे ते सरपंच होते. तर सर्वाधिक १४ वर्षे शंकर विठोबाजी खोपडे यांनी सरपंचपद भूषविले. १६ सरपंचात २००४ ते २०१९ या कालावधीत सलग तीन महिलांना सरपंचपदाचा मान मिळाला. तर आता चौथ्यांदाही महिलाकरिता सरपंचपद राखीव असल्याने घोराडच्या १७ व्या सरपंच कोण यासाठी मतदार २३ जूनला मतदान करणार आहे.शंकरराव खोपडे यांचा १९६६-१९७८ या कालावधीत सरपंच असताना तालुक्यात पहिली नळयोजना गावात आणण्यात सिंहाचा वाटा आहे. गावाच्या विकासातील हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अधिकाअधिक काळ गावावर खोपडे गटाचा वरचष्मा राहिला आहे.१९६१ ते १९७८ सलग १७ वर्षांची सत्ता १९७८ ला खोपडे गटाच्या हातून विरोधकांनी हिसकावून घेतली व अशोक केशवराव तेलरांधे हे सरपंच झाले. मात्र, पुन्हा ५ वर्षांतच १९८४ ला मतदारांनी खोपडे गटाच्या हातात सत्ता दिली. तर १९८९ ला झालेल्या निवडणुकीत जनतेने विरोधकांना कौल देत देवराव नथ्थुजी राऊत (पाटील) गटाची सत्ता आली. पण, सरपंच पदासाठी दुफळी निर्माण झाल्याने खोपडे गटाने सहकार्याचा हात देत विरोधी गटातील ४ सदस्य आपल्याकडे आणत बाबाराव सुरकार यांची सरपंचपदी निवड केली. येथूनच घोराडचे राजकारण बदलले. १९९४ ते ९९ मध्ये खोपडे गटाचे दोन गट झाले आणि वसंतराव तेलरांधे सरपंच झाले. १९९९ मधील निवडणुकीत गोपाळराव माहुरे सरपंचपदी निवडून आले व २००४ पर्यंत पुन्हा खोपडे गटाची सत्ता राहिली. २००४-०९ जयस्वाल गटाकडे, २००९ ते २०१४ मध्ये जयस्वाल गटाचा पराभव करीत गावातील सर्वपक्षीय गटाची सत्ता आली.२०१४ पासून रणनवरे गटाची सत्ता आहे. तर २०१९ मध्ये सुरू असलेली निवडणुकीची रणधुमाळी पाहता रणनवरे, जयस्वाल व आमदार गट असा तिहेरी सामना होत असल्याने मतदार कोणत्या गटाला झुकते माप देतात, हे २३ जूनला होणाऱ्या मतदारानंतरच कळणार आहे.सरपंचपदाची हॅट्ट्रिकनारायणराव वाघे, दादाजी ढोले, श्यामराव बालपांडे, शंकरराव खोपडे, अशोक तेलरांधे, बाबाराव सुरकार, देवराव राऊत, रमेश राऊत, वसंत तेलरांधे, गोपाळ माहुरे, तारा तेलरांधे, मंदा तडस, ज्योती घंगारे, यात शंकरराव खोपडे तीनवेळा तर दादाजी ढोले यांनी दोनवेळा सरपंचपद भूषविले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत