शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

७२ वर्षांत १६ जणांनी भूषविले सरपंचपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 22:30 IST

तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोराड ग्रामपंचायतीची निवडणूक २३ जूनला होत आहे. ७२ वर्षांत अनेक राजकीय स्थित्यंतरे पाहणाऱ्या गावाने १६ सरपंच दिले, जिल्हा परिषदेचे सभागृह गाजविले. या निवडणुकीत थेट सरपंच निवडल्या जाणार असल्याने ही निवडणूक विविध मुद्यांवर गाजण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याच्या राजकारणात होता घोराडचा दबदबा : यावेळच्या निवडणुकीत तिहेरी सामना

विजय माहुरे।लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोराड ग्रामपंचायतीची निवडणूक २३ जूनला होत आहे. ७२ वर्षांत अनेक राजकीय स्थित्यंतरे पाहणाऱ्या गावाने १६ सरपंच दिले, जिल्हा परिषदेचे सभागृह गाजविले. या निवडणुकीत थेट सरपंच निवडल्या जाणार असल्याने ही निवडणूक विविध मुद्यांवर गाजण्याची शक्यता आहे.२७ डिसेंबर १९४७ ला घोराड ग्रामपंचायत अस्तित्वात आली. शासन नियुक्त सरपंच म्हणून नारायण भिवाजी वाघे यांनी पदभार सांभाळला. सलग १३ वर्षे ते सरपंच होते. तर सर्वाधिक १४ वर्षे शंकर विठोबाजी खोपडे यांनी सरपंचपद भूषविले. १६ सरपंचात २००४ ते २०१९ या कालावधीत सलग तीन महिलांना सरपंचपदाचा मान मिळाला. तर आता चौथ्यांदाही महिलाकरिता सरपंचपद राखीव असल्याने घोराडच्या १७ व्या सरपंच कोण यासाठी मतदार २३ जूनला मतदान करणार आहे.शंकरराव खोपडे यांचा १९६६-१९७८ या कालावधीत सरपंच असताना तालुक्यात पहिली नळयोजना गावात आणण्यात सिंहाचा वाटा आहे. गावाच्या विकासातील हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अधिकाअधिक काळ गावावर खोपडे गटाचा वरचष्मा राहिला आहे.१९६१ ते १९७८ सलग १७ वर्षांची सत्ता १९७८ ला खोपडे गटाच्या हातून विरोधकांनी हिसकावून घेतली व अशोक केशवराव तेलरांधे हे सरपंच झाले. मात्र, पुन्हा ५ वर्षांतच १९८४ ला मतदारांनी खोपडे गटाच्या हातात सत्ता दिली. तर १९८९ ला झालेल्या निवडणुकीत जनतेने विरोधकांना कौल देत देवराव नथ्थुजी राऊत (पाटील) गटाची सत्ता आली. पण, सरपंच पदासाठी दुफळी निर्माण झाल्याने खोपडे गटाने सहकार्याचा हात देत विरोधी गटातील ४ सदस्य आपल्याकडे आणत बाबाराव सुरकार यांची सरपंचपदी निवड केली. येथूनच घोराडचे राजकारण बदलले. १९९४ ते ९९ मध्ये खोपडे गटाचे दोन गट झाले आणि वसंतराव तेलरांधे सरपंच झाले. १९९९ मधील निवडणुकीत गोपाळराव माहुरे सरपंचपदी निवडून आले व २००४ पर्यंत पुन्हा खोपडे गटाची सत्ता राहिली. २००४-०९ जयस्वाल गटाकडे, २००९ ते २०१४ मध्ये जयस्वाल गटाचा पराभव करीत गावातील सर्वपक्षीय गटाची सत्ता आली.२०१४ पासून रणनवरे गटाची सत्ता आहे. तर २०१९ मध्ये सुरू असलेली निवडणुकीची रणधुमाळी पाहता रणनवरे, जयस्वाल व आमदार गट असा तिहेरी सामना होत असल्याने मतदार कोणत्या गटाला झुकते माप देतात, हे २३ जूनला होणाऱ्या मतदारानंतरच कळणार आहे.सरपंचपदाची हॅट्ट्रिकनारायणराव वाघे, दादाजी ढोले, श्यामराव बालपांडे, शंकरराव खोपडे, अशोक तेलरांधे, बाबाराव सुरकार, देवराव राऊत, रमेश राऊत, वसंत तेलरांधे, गोपाळ माहुरे, तारा तेलरांधे, मंदा तडस, ज्योती घंगारे, यात शंकरराव खोपडे तीनवेळा तर दादाजी ढोले यांनी दोनवेळा सरपंचपद भूषविले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत