शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

७२ वर्षांत १६ जणांनी भूषविले सरपंचपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 22:30 IST

तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोराड ग्रामपंचायतीची निवडणूक २३ जूनला होत आहे. ७२ वर्षांत अनेक राजकीय स्थित्यंतरे पाहणाऱ्या गावाने १६ सरपंच दिले, जिल्हा परिषदेचे सभागृह गाजविले. या निवडणुकीत थेट सरपंच निवडल्या जाणार असल्याने ही निवडणूक विविध मुद्यांवर गाजण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याच्या राजकारणात होता घोराडचा दबदबा : यावेळच्या निवडणुकीत तिहेरी सामना

विजय माहुरे।लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोराड ग्रामपंचायतीची निवडणूक २३ जूनला होत आहे. ७२ वर्षांत अनेक राजकीय स्थित्यंतरे पाहणाऱ्या गावाने १६ सरपंच दिले, जिल्हा परिषदेचे सभागृह गाजविले. या निवडणुकीत थेट सरपंच निवडल्या जाणार असल्याने ही निवडणूक विविध मुद्यांवर गाजण्याची शक्यता आहे.२७ डिसेंबर १९४७ ला घोराड ग्रामपंचायत अस्तित्वात आली. शासन नियुक्त सरपंच म्हणून नारायण भिवाजी वाघे यांनी पदभार सांभाळला. सलग १३ वर्षे ते सरपंच होते. तर सर्वाधिक १४ वर्षे शंकर विठोबाजी खोपडे यांनी सरपंचपद भूषविले. १६ सरपंचात २००४ ते २०१९ या कालावधीत सलग तीन महिलांना सरपंचपदाचा मान मिळाला. तर आता चौथ्यांदाही महिलाकरिता सरपंचपद राखीव असल्याने घोराडच्या १७ व्या सरपंच कोण यासाठी मतदार २३ जूनला मतदान करणार आहे.शंकरराव खोपडे यांचा १९६६-१९७८ या कालावधीत सरपंच असताना तालुक्यात पहिली नळयोजना गावात आणण्यात सिंहाचा वाटा आहे. गावाच्या विकासातील हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अधिकाअधिक काळ गावावर खोपडे गटाचा वरचष्मा राहिला आहे.१९६१ ते १९७८ सलग १७ वर्षांची सत्ता १९७८ ला खोपडे गटाच्या हातून विरोधकांनी हिसकावून घेतली व अशोक केशवराव तेलरांधे हे सरपंच झाले. मात्र, पुन्हा ५ वर्षांतच १९८४ ला मतदारांनी खोपडे गटाच्या हातात सत्ता दिली. तर १९८९ ला झालेल्या निवडणुकीत जनतेने विरोधकांना कौल देत देवराव नथ्थुजी राऊत (पाटील) गटाची सत्ता आली. पण, सरपंच पदासाठी दुफळी निर्माण झाल्याने खोपडे गटाने सहकार्याचा हात देत विरोधी गटातील ४ सदस्य आपल्याकडे आणत बाबाराव सुरकार यांची सरपंचपदी निवड केली. येथूनच घोराडचे राजकारण बदलले. १९९४ ते ९९ मध्ये खोपडे गटाचे दोन गट झाले आणि वसंतराव तेलरांधे सरपंच झाले. १९९९ मधील निवडणुकीत गोपाळराव माहुरे सरपंचपदी निवडून आले व २००४ पर्यंत पुन्हा खोपडे गटाची सत्ता राहिली. २००४-०९ जयस्वाल गटाकडे, २००९ ते २०१४ मध्ये जयस्वाल गटाचा पराभव करीत गावातील सर्वपक्षीय गटाची सत्ता आली.२०१४ पासून रणनवरे गटाची सत्ता आहे. तर २०१९ मध्ये सुरू असलेली निवडणुकीची रणधुमाळी पाहता रणनवरे, जयस्वाल व आमदार गट असा तिहेरी सामना होत असल्याने मतदार कोणत्या गटाला झुकते माप देतात, हे २३ जूनला होणाऱ्या मतदारानंतरच कळणार आहे.सरपंचपदाची हॅट्ट्रिकनारायणराव वाघे, दादाजी ढोले, श्यामराव बालपांडे, शंकरराव खोपडे, अशोक तेलरांधे, बाबाराव सुरकार, देवराव राऊत, रमेश राऊत, वसंत तेलरांधे, गोपाळ माहुरे, तारा तेलरांधे, मंदा तडस, ज्योती घंगारे, यात शंकरराव खोपडे तीनवेळा तर दादाजी ढोले यांनी दोनवेळा सरपंचपद भूषविले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत