शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

इतर जिल्ह्यातून आलेले ७०.३३ टक्के व्यक्ती निरोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:00 IST

आरोग्य यंत्रणेसह महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम राबवून मुंबई, पुणे या कोरोना बाधित जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यातून आलेल्या तब्बल १४ हजार ९०२ व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना होम क्वारंटाईन केले आहे. यापैकी १० हजार ४८१ व्यक्तींमध्ये आतापर्यंत कोरोनाची कुठलीही लक्षणे न आढळल्याने त्यांची सुटका करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठेवली जातेय पाळत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यानंतर आरोग्य यंत्रणेसह महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम राबवून मुंबई, पुणे या कोरोना बाधित जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यातून आलेल्या तब्बल १४ हजार ९०२ व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना होम क्वारंटाईन केले आहे. यापैकी १० हजार ४८१ व्यक्तींमध्ये आतापर्यंत कोरोनाची कुठलीही लक्षणे न आढळल्याने त्यांची सुटका करण्यात आली आहे. एकूणच इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात आलेले ७०.३३ टक्के व्यक्ती सध्यास्थितीत निरोगी असल्याचे आरोग्य यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे.इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात एकूण १४ हजार ९०२ व्यक्ती आल्याची नोंद घेण्यात आली आहे. वर्धा तालुक्यात ४ हजार २१५, देवळी तालुक्यात १ हजार ६२२, आर्वी तालुक्यात १ हजार ९७९, सेलू तालुक्यात १ हजार ६७४, आष्टी तालुक्यात १ हजार २७९, समुद्रपूर तालुक्यात ९०८, हिंगणघाट तालुक्यात २ हजार १५३ तर कारंजा (घा.) तालुक्यात १ हजार ७२ व्यक्ती आल्याची नोंद घेण्यात आली आहे.या सर्व व्यक्तींना १४ दिवसांकरिता होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सदर १४ दिवसांचा कालावधी पूर्ण होत कोरोनाची कुठलीही लक्षणे न आढळल्याने वर्धा तालुक्यातील २ हजार ७४१, देवळी तालुक्यात १ हजार ४६७, आर्वी तालुक्यात १ हजार ४९२, सेलू तालुक्यात १ हजार २४५, आष्टी तालुक्यात ९३५, समुद्रपूर तालुक्यात ८४८, हिंगणघाट तालुक्यात १ हजार २३३ तर कारंजा (घा.) तालुक्यात ५२० व्यक्तींना होम क्वारंटाईनमधून मुक्त करण्यात आले आहे. तसेच सध्या एकूण ४ हजार ४२१ व्यक्ती गृहविलगिकरणात असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाºयांकडून सांगण्यात आले.५६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्हगृहविलगिकरणात असलेल्या व्यक्तींपैकी ६१ व्यक्तींची प्रकृती बिघडल्याने त्यांच्या रक्तासह घशातील द्रवाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी ५६ व्यक्तींचा अहवाल जिल्ह्यातील आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून हे व्यक्ती कोरोना निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात येते. तर पाच व्यक्तींच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.जिल्ह्यात आलेल्या १४ हजार ९०२ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या हातावर शिक्का मारत त्याच्या घरावर सूचना फलक चिटकविण्यात आले आहे. या १४,९०२ व्यक्तींपैकी १०,४८१ व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षण नसल्याने त्यांना होम क्वारंटाईनमधून मुक्त करण्यात आले आहे.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या