शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

इतर जिल्ह्यातून आलेले ७०.३३ टक्के व्यक्ती निरोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:00 IST

आरोग्य यंत्रणेसह महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम राबवून मुंबई, पुणे या कोरोना बाधित जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यातून आलेल्या तब्बल १४ हजार ९०२ व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना होम क्वारंटाईन केले आहे. यापैकी १० हजार ४८१ व्यक्तींमध्ये आतापर्यंत कोरोनाची कुठलीही लक्षणे न आढळल्याने त्यांची सुटका करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठेवली जातेय पाळत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यानंतर आरोग्य यंत्रणेसह महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम राबवून मुंबई, पुणे या कोरोना बाधित जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यातून आलेल्या तब्बल १४ हजार ९०२ व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना होम क्वारंटाईन केले आहे. यापैकी १० हजार ४८१ व्यक्तींमध्ये आतापर्यंत कोरोनाची कुठलीही लक्षणे न आढळल्याने त्यांची सुटका करण्यात आली आहे. एकूणच इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात आलेले ७०.३३ टक्के व्यक्ती सध्यास्थितीत निरोगी असल्याचे आरोग्य यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे.इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात एकूण १४ हजार ९०२ व्यक्ती आल्याची नोंद घेण्यात आली आहे. वर्धा तालुक्यात ४ हजार २१५, देवळी तालुक्यात १ हजार ६२२, आर्वी तालुक्यात १ हजार ९७९, सेलू तालुक्यात १ हजार ६७४, आष्टी तालुक्यात १ हजार २७९, समुद्रपूर तालुक्यात ९०८, हिंगणघाट तालुक्यात २ हजार १५३ तर कारंजा (घा.) तालुक्यात १ हजार ७२ व्यक्ती आल्याची नोंद घेण्यात आली आहे.या सर्व व्यक्तींना १४ दिवसांकरिता होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सदर १४ दिवसांचा कालावधी पूर्ण होत कोरोनाची कुठलीही लक्षणे न आढळल्याने वर्धा तालुक्यातील २ हजार ७४१, देवळी तालुक्यात १ हजार ४६७, आर्वी तालुक्यात १ हजार ४९२, सेलू तालुक्यात १ हजार २४५, आष्टी तालुक्यात ९३५, समुद्रपूर तालुक्यात ८४८, हिंगणघाट तालुक्यात १ हजार २३३ तर कारंजा (घा.) तालुक्यात ५२० व्यक्तींना होम क्वारंटाईनमधून मुक्त करण्यात आले आहे. तसेच सध्या एकूण ४ हजार ४२१ व्यक्ती गृहविलगिकरणात असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाºयांकडून सांगण्यात आले.५६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्हगृहविलगिकरणात असलेल्या व्यक्तींपैकी ६१ व्यक्तींची प्रकृती बिघडल्याने त्यांच्या रक्तासह घशातील द्रवाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी ५६ व्यक्तींचा अहवाल जिल्ह्यातील आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून हे व्यक्ती कोरोना निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात येते. तर पाच व्यक्तींच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.जिल्ह्यात आलेल्या १४ हजार ९०२ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या हातावर शिक्का मारत त्याच्या घरावर सूचना फलक चिटकविण्यात आले आहे. या १४,९०२ व्यक्तींपैकी १०,४८१ व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षण नसल्याने त्यांना होम क्वारंटाईनमधून मुक्त करण्यात आले आहे.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या