शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाटात ६८ दिवसीय नवकार जप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 22:22 IST

शहरातील श्री जैन श्वेतांबर पार्श्वनाथ मंदिरात साध्वीश्रींच्या उपस्थितीत ६८ दिवसीय नवकार जापचा प्रारंभ ४ आॅगस्टपासून पासून होणार आहे. छत्तीसगडरत्न शिरोमणी महत्तरा पद विभूषिता प. पू. गुरुवर्या मनोहरश्रीजी म.सा. यांच्या सुशिष्या सरलमना प.पू. सुभद्राश्रीजी म.सा. नवकार जपेश्वरी प.पू. शुभंकराश्रीजी म.सा., विद्याभिलाषी प.पू. ज्ञानोदयाश्रीजी म.सा., ज्ञानपिपासू प.पू. सिद्धोदयाश्रीजी म.सा. आदि ठाणा ४ यांचे आगमन झाले आहे.

ठळक मुद्दे४ आॅगस्टपासून जैन मंदिरात आयोजन : सहभागी होण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहरातील श्री जैन श्वेतांबर पार्श्वनाथ मंदिरात साध्वीश्रींच्या उपस्थितीत ६८ दिवसीय नवकार जापचा प्रारंभ ४ आॅगस्टपासून पासून होणार आहे. छत्तीसगडरत्न शिरोमणी महत्तरा पद विभूषिता प. पू. गुरुवर्या मनोहरश्रीजी म.सा. यांच्या सुशिष्या सरलमना प.पू. सुभद्राश्रीजी म.सा. नवकार जपेश्वरी प.पू. शुभंकराश्रीजी म.सा., विद्याभिलाषी प.पू. ज्ञानोदयाश्रीजी म.सा., ज्ञानपिपासू प.पू. सिद्धोदयाश्रीजी म.सा. आदि ठाणा ४ यांचे आगमन झाले आहे.दरवर्षी चातुर्मासादरम्यान हा दरबार आयोजित केला जातो. जैनेतर शुद्धशाकाहारी इच्छुक व्यक्ती कालसर्पयोग दोष निवारण व नवग्रह दोष निवारणार्थ यात सहभागी होऊ शकतात. ४ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजता कालसर्पयोग दोष निवारण व नवग्रह दोष निवारण अनुष्ठान, ५ ला सकाळी ९ वाजता अठरा अभिषेक व श्री नवकार दरबारात पार्श्वप्रभूंची स्थापना, ६ ला सकाळी ९ वाजता कुंभकलश व अखंड दीप स्थापना, नवग्रह दहा दिक्पाल अष्टमंगल स्थापना आणि त्यानंतर ६८ दिवसीय नवकार जापास प्रारंभ होणार आहे. नवकार दरबारात नवकार मंत्राचा सातत्याने जाप चालणार असून दरदिवशी सकाळी ८.१५ ते ९.१५ पर्यंत सामूहिकरीत्या जाप केला जाणार आहे. या दरम्यान प्रतिव्यक्ती कूपन दिले जाणार असून त्याची सोडत दरदिवशी सकाळी प्रवचनानंतर काढली जाणार आहे. सकाळी प्रवचनानंतर आणि सायंकाळी सामूहिक जापानंतर आरती होईल. याचा लाभ सोडतीनुसार दिला जाणार आहे, असे आयोजक अध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी, उपाध्यक्ष अनिल कोठारी, व्यवस्थापकीय विश्वस्त दिनेशकुमार कोचर, शिखरचंद मुनोत, शांतिलाल कोचर, प्रदीप कोठारी, अरूण कोचर, अशोक गांधी, हरीश कासवा यांनी कळविले आहे. श्री जैन श्वेतांबर पार्श्वनाथ मंदिर ट्रस्टद्वारे आयोजित या कार्यक्रमात जैन समाजातील श्रावकांनी कुटुंबासह उपस्थित राहण्याचे आवाहन राजेश कोचर यांनी केले आहे.हिंगणघाटातील तेविसावा नवकार दरबारसाध्वी मंडळाद्वारे चातुर्मासाच्या प्रत्येक ठिकाणी नवकार दरबाराचे आयोजन केले होते. भाविक दरबारात तासन्तास बसत नवकार मंत्राचा जाप करतात. हा नवकार दरबार तब्बल ६८ दिवस चालतो. मागील २२ वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. दरबारात साध्वीजींनी सोबत आणलेली भगवान पार्श्वनाथ आणि अन्य देवता व गुरूदेवाची प्रतिमा स्थापित केली जाते. आतापावेतो २२ ठिकाणी हा दरबार घेण्यात आला. हिंगणघाट शहरातील हा २३ वा दरबार आहे.