शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

६४ रेतीघाटांचे होणार लिलाव

By admin | Updated: October 19, 2015 02:24 IST

रेती, गौण खनिज यांच्या माध्यमातून शासन, प्रशासनाला महसूल मिळत असतो; पण यात चोरटेही डल्ला मारतात.

चोरीवर अंकुश गरजेचा : ३५.६३ कोटी रुपयांचा मिळणार महसूलवर्धा : रेती, गौण खनिज यांच्या माध्यमातून शासन, प्रशासनाला महसूल मिळत असतो; पण यात चोरटेही डल्ला मारतात. यामुळे महसूल बुडत असल्याचे दिसते. यावर आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येतात; पण त्याही फोल ठरत असल्याचे दिसते. सध्या रेती घाटांच्या लिलावाचा मुहूर्त साधण्यात आला आहे. यात ६४ घाटांचे लिलाव करण्यात येत आहे. यातून शासनाला ३५.६३ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होणार आहे.जिल्ह्यात रेती चोरीला उधान आले आहे. लिलावामध्ये एक घाट घेतल्यानंतर लगतच्या दुसऱ्या घाटातूनही रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जातो. हा प्रकार संपूर्ण जिल्ह्यात आढळून येतात. तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीमध्ये बोटींद्वारे रेतीचा उपसा केला जात असल्याचे समोर आले होते. आष्टी तालुक्यातील काही घाटांतून सर्रास बोटींद्वारे रेतीचा उपसा केला जातो. रेतीचा उपसा करण्यासाठी काही अटी घालून देण्यात आलेल्या आहेत; पण त्या अटींचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जातो. यामुळे नदीपात्र धोक्यात आले असून पर्यावरणाचीही अपरिमित हानी होत आहे. एखाद्या घाटातून २५० ब्रास रेतीचा उपसा करण्यास अनुमती दिली असल्यास त्या घाटातून तिप्पट-चौपट रेतीचा उपसा केला जातो. या प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा प्रकार महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीमध्येही उघड झाला आहे; पण त्यावर आळा घालण्यासाठी केलेल्या उपाययोजना कुचकामी ठरत असल्याचेच दिसते. गतवर्षीपासून ‘एसएमएस’ पद्धती सुरू करण्यात आली; पण यातूनही पळवाट शोधली गेली. यामुळे खनिकर्म विभागात अल्प रेती वाहतुकीची नोंद होते. प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात रेतीची उचल व वाहतूक केली जाते. यामुळे रेतीघाटांतून शासन, प्रशासनाला लिलावादरम्यान मिळणारा महसूलच महत्त्वाचा ठरत असल्याचे दिसते. बुधवारी जिल्ह्यातील ६४ रेती घाटांचे लिलाव करण्यात येणार आहेत. यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. असे असले तरी यावर्षी रेती चोरीवर आळा घालण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले नसल्याचेच दिसते.(कार्यालय प्रतिनिधी)सर्वाधिक घाट वणा नदीवरजिल्ह्यातील ६४ घाटांच्या लिलावाकरिता परवानगी देण्यात आलेली आहेत. यात आर्वी, आष्टी, देवळी, हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यातील घाटांचा समावेश आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या वणा, वर्धा, यशोदा या नद्यांवर सर्वाधिक घाट आहेत. यात वणा नदीवरील ३१ रेतीघाट लिलावाकरिता पात्र ठरविण्यात आले आहेत. या खालोखाल वर्धा नदीवरील २२ घाटांचे लिलाव होत आहेत. यशोदा नदीवरील ५ तर पोथरा प्रकल्पातील चार रेतीघाटांतून रेतीच्या उपस्याला परवानगी देण्यात आलेली आहे. शिवाय वणी लहान आणि टेंभा येथील नाल्यांमधील रेती घाटांनाही लिलावाची परवानगी देण्यात आलेली आहे. आष्टी तालुक्यातील पाच, आर्वी तालुक्यात तीन, देवळी अकरा, हिंगणघाट तालुक्यात २८ तर समुद्रपूर तालुक्यातील १७ घाटांचे लिलाव करण्यात येत आहेत. मागील वर्षी देवळी तालुक्यातील केवळ दोन घाटांना लिलावाची परवानगी देण्यात आली होती. यंदा त्यात वाढ करण्यातआली असून तब्बल ११ घाटांचे लिलाव होत आहेत. शिवाय हिंगणघाट तालुक्यातील घाटांतही वाढ करण्यात आली आहे. गतवर्षीच्या लिलावात परवानगी न मिळाल्याने यातील बहुतांश घाटांचे लिलाव करण्यात आलेले नव्हते.गोदावरी घाटाचा लिलाव; पण गावाच्या विकासाकडे दुर्लक्षरेती घाटांचे लिलाव करताना तेथील ग्रामपंचायतीची परवानगी घेणे गरजेचे असते. यासाठी ग्रा.पं. प्रशासनाकडून ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते. आष्टी तालुक्यातील गोदावरी गावात वर्धा नदीवर रेतीघाट आहे. या रेतीघाटाच्या लिलावावर तेथील ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप नोंदविला होता. गावाचा विकास केला जात नाही, रस्त्यांची दुरवस्था होत आहे आणि घाटातून रेतीची चोरीही केली जात असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले होते. यंदा गोदावरी घाटाचा लिलाव केला जात आहे. यामुळे पुन्हा एकदा गावातील विकास कामांचा प्रश्न चव्हाट्यावर येणार आहे. शिवाय देवळी तालुक्यातील गतवर्षी वगळलेल्या घाटांचा लिलाव केला जात आहे. असे असले तरी त्या घाटांतून मागील वर्षी मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने रेतीचा उपसा झाला.