शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

६३,५९५ शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:50 IST

कृषीपंपाची रक्कम थकीत असलेल्या शेतकऱ्यांची जोडणी कापण्याचा निर्णय महावितरणच्यावतीने घेण्यात आला. सध्या असलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना देयकांचा भरणा शक्य नसल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देमुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना : उर्जामंत्र्यांची घोषणा; शेतकऱ्यांना दिलासा

ऑनलाईन लोकमत वर्धा : कृषीपंपाची रक्कम थकीत असलेल्या शेतकऱ्यांची जोडणी कापण्याचा निर्णय महावितरणच्यावतीने घेण्यात आला. सध्या असलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना देयकांचा भरणा शक्य नसल्याचे दिसून आले. यामुळे जोडणी कपातीच्या संकटातून बचावाकरिता उर्जामंत्र्यांनी नवी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार तीन ते पाच हजार रुपये भरून जोडणी कायम ठेवण्यात येत आहे. या घोषणेचा लाभ जिल्ह्यातील ६३ हजार ५९५ शेतकºयांना होणार आहे.शेतकºयांची थकबाकी ३० हजारांच्या आत असल्यास ३ हजार रुपये आणि ३० हजारांच्या वर थकबाकी असल्यास ५ हजार रुपये भरून या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. योजना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. शिवाय बºयाच शेतकऱ्यांना त्यांच्या देयकाची दुरूस्ती करावयाची आहे. त्याकरिता १ ते ३० डिसेंबरपर्यंत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून कळविण्यात आले आहे. हा निर्णय होण्यापूर्वी बऱ्याच शेतकऱ्यांच्या जोडण्या कापण्यात आल्या आहेत. यापैकी जे शेतकरी रक्कम भरतील त्यांची कापलेली वीज तत्काळ जोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांना त्यांची देयके वाढीव आली आहे असे वाटत असेल त्यांनी फिडरनिहाय होणार असलेल्या शिबिरात आपली तक्रार करावी, असे कळविण्यात आले आहे. या तक्रारीवर कारवाई करण्याकरिता विभाग सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे.वर्धा जिल्ह्यात एकूण ६८ हजार १८० शेतकऱ्यांकडे कृषी पंप आहे. त्यांच्याकडे ६३ कोटी ८६ लाख ७१ हजार ८७३ रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी जून आणि मार्च महिन्यातील आहे. या दोन महिन्याच्या थकबाकीदारांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे महावितरणकडून मिळालेल्या माहितीवरून दिसत आहे. सध्या शेतकºयांच्या असलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे ही रक्कमही भरणे शक्य नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे महावितरणने यातूनही शेतकºयांना सूट द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.