शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

सुपर चार्जच्या एक रुपयातून ६१.२३ लाखांची कमाई

By admin | Updated: June 30, 2016 02:21 IST

राज्य परिवहन महामंडळातून प्रवास करताना होणाऱ्या दुर्घटनेत मृत्यू होणाऱ्यांना भरीव मदत देण्याकरिता राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने

राज्य परिवहन महामंडळ : बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेचे अडीच महिने रूपेश खैरी वर्धाराज्य परिवहन महामंडळातून प्रवास करताना होणाऱ्या दुर्घटनेत मृत्यू होणाऱ्यांना भरीव मदत देण्याकरिता राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना सुरू केली. प्रत्येक प्रवाशाकडून तिकीटमागे एक रुपया अतिरिक्त घेण्याच्या या योजनेला अडीच महिन्याचा कालावधी झाला. या अडीच महिन्यात प्रवाशांच्या खिशाला कात्री लावत वर्धा जिल्ह्याने तब्बल ६१ लाख २३ हजार ४३५ रुपयांची कमाई केली. परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला हा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे. प्रवास जवळचा असो वा लांबचा भुर्दंडाची रक्कम एक रुपयाच आहे. राज्यात ही योजना १ एप्रिल २०१६ पासून सुरू झाली आहे. वर्धा जिल्ह्यात असलेल्या पाच आगारातून ३५० बसगाड्या रस्त्याने धावत आहे. यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून कुठलाही नियम नसलेली परिवहन महामंडळाची ही पठाणी वसुली सुरू आहे. योजना सुरू झाल्याच्या अडीच महिन्यात वर्धा जिल्ह्यात सरासरी विचार केल्यास महिन्याकाठी २१ लाख रुपयांची कमाई होत आहे. यात वर्षाचा विचार केल्यास या योजनेतून जिल्ह्याला सुमारे तीन कोटी रुपयांचा लाभ होणार असल्याचे चित्र आहे. गत आर्थिक सत्रात नफा कमविण्यात वर्धा विभागत नागपूर विभागातून अव्वल ठरला तर विदर्भातून दुसऱ्या क्रमांकावर होता. या कमाईमुळे यात आणखीच भर पडणार असल्याचे चित्र असले तरी प्रवाश्यांना सेवा देण्यात मात्र वर्धा विभाग माघारत असल्याचे वास्तव आहे. महामंडळाच्या बसमूधन प्रवास करताना घडलेल्या दुर्घटनेत मृत्यू होणाऱ्याला महामंडळाव्यावतीने ३ लाख रुपयांची मदत देण्यात येत होती. ही मदत वाढविण्याकरिता हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अपघात सहाय विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या परिवाराला ३ ऐवजी १० लाख रुपये देण्याचे ठरले. याकरिता रक्कम उभारण्याकरिता परिवहन महामंडळाने ही शक्कल लढवित तिकीटाचे दर कायम ठेवत केवळ ‘सुपर चार्ज’ म्हणून प्रत्येक तिकिटावर एक रुपया अतिरिक्त घेणे सुरू केले. हम् एक रुपया, असे म्हणत प्रवाशांनीही योजनेला विरोध केला नाही. मात्र याच एक रुपयातून परिवहन महामंडळाची कमाई कोट्यवधीने वाढत आहे.