शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

सुपर चार्जच्या एक रुपयातून ६१.२३ लाखांची कमाई

By admin | Updated: June 30, 2016 02:21 IST

राज्य परिवहन महामंडळातून प्रवास करताना होणाऱ्या दुर्घटनेत मृत्यू होणाऱ्यांना भरीव मदत देण्याकरिता राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने

राज्य परिवहन महामंडळ : बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेचे अडीच महिने रूपेश खैरी वर्धाराज्य परिवहन महामंडळातून प्रवास करताना होणाऱ्या दुर्घटनेत मृत्यू होणाऱ्यांना भरीव मदत देण्याकरिता राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना सुरू केली. प्रत्येक प्रवाशाकडून तिकीटमागे एक रुपया अतिरिक्त घेण्याच्या या योजनेला अडीच महिन्याचा कालावधी झाला. या अडीच महिन्यात प्रवाशांच्या खिशाला कात्री लावत वर्धा जिल्ह्याने तब्बल ६१ लाख २३ हजार ४३५ रुपयांची कमाई केली. परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला हा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे. प्रवास जवळचा असो वा लांबचा भुर्दंडाची रक्कम एक रुपयाच आहे. राज्यात ही योजना १ एप्रिल २०१६ पासून सुरू झाली आहे. वर्धा जिल्ह्यात असलेल्या पाच आगारातून ३५० बसगाड्या रस्त्याने धावत आहे. यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून कुठलाही नियम नसलेली परिवहन महामंडळाची ही पठाणी वसुली सुरू आहे. योजना सुरू झाल्याच्या अडीच महिन्यात वर्धा जिल्ह्यात सरासरी विचार केल्यास महिन्याकाठी २१ लाख रुपयांची कमाई होत आहे. यात वर्षाचा विचार केल्यास या योजनेतून जिल्ह्याला सुमारे तीन कोटी रुपयांचा लाभ होणार असल्याचे चित्र आहे. गत आर्थिक सत्रात नफा कमविण्यात वर्धा विभागत नागपूर विभागातून अव्वल ठरला तर विदर्भातून दुसऱ्या क्रमांकावर होता. या कमाईमुळे यात आणखीच भर पडणार असल्याचे चित्र असले तरी प्रवाश्यांना सेवा देण्यात मात्र वर्धा विभाग माघारत असल्याचे वास्तव आहे. महामंडळाच्या बसमूधन प्रवास करताना घडलेल्या दुर्घटनेत मृत्यू होणाऱ्याला महामंडळाव्यावतीने ३ लाख रुपयांची मदत देण्यात येत होती. ही मदत वाढविण्याकरिता हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अपघात सहाय विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या परिवाराला ३ ऐवजी १० लाख रुपये देण्याचे ठरले. याकरिता रक्कम उभारण्याकरिता परिवहन महामंडळाने ही शक्कल लढवित तिकीटाचे दर कायम ठेवत केवळ ‘सुपर चार्ज’ म्हणून प्रत्येक तिकिटावर एक रुपया अतिरिक्त घेणे सुरू केले. हम् एक रुपया, असे म्हणत प्रवाशांनीही योजनेला विरोध केला नाही. मात्र याच एक रुपयातून परिवहन महामंडळाची कमाई कोट्यवधीने वाढत आहे.