शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

जिल्ह्यातील ६० हजार शेतकऱ्यांनी घेतले पीककर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 05:00 IST

कर्ज वाटपाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून नियमित आढावा घेतला जातो. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नयेत, अशी भूमिका घेतल्याने यावर्षी नोव्हेंबरअखेरपर्यंत ६० हजार शेतकऱ्यांना ५८४ कोटींच्या खरीप व रब्बी पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी पिके चांगल्या पद्धतीने घेता यावीत यासाठी पीककर्जाचे वाटप केले जाते. यावर्षी आठही तालुक्यांमध्ये नोव्हेंबरअखेर ६० हजार शेतकऱ्यांना ५८४ कोटींच्या पीककर्जाचे वितरण करण्यात आले. बँकांकडून वेळीच पीककर्ज उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. ज्या बँकांनी कर्जवाटपाकडे दुर्लक्ष केले त्यांना तत्काळ कर्ज वाटप करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केल्या.दरवर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीस शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू केली जाते. पीककर्ज सहज उपलब्ध व्हावेत म्हणून नजीकच्या बँकांना शेतकऱ्यांना जोडून देण्यात आले आहे. बँकांना पीककर्ज वाटपाचे शाखानिहाय उद्दिष्ट दिले जाते. कर्ज वाटपाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून नियमित आढावा घेतला जातो. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नयेत, अशी भूमिका घेतल्याने यावर्षी नोव्हेंबरअखेरपर्यंत ६० हजार शेतकऱ्यांना ५८४ कोटींच्या खरीप व रब्बी पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. पीककर्ज वाटपामध्ये बँक ऑफ इंडिया आघाडीवर असून त्यापाठोपाठ इतरही बँकांनी पीककर्ज वाटप केले आहे, तर काही बँका दिलेल्या पीककर्जाच्या लक्ष्यापासून बऱ्याच दूर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकावर कारवाईची गरज आहे. 

रब्बीसाठी ८२ कोटींच्या पीककर्जाची उचलजिल्ह्यात रब्बी हंगामही मोठ्या प्रमाणात घेतला जातो. जिल्ह्यातील ७२ हजार शेतकऱ्यांनी रब्बी पिकांसाठी ८२ कोटींच्या पीककर्जाची उचल केली आहे. जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे कृषी विभागाने नियोजन केले असून त्यासाठी पीककर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने ते उपलब्ध करून दिले पाहिजे, असे निर्देशही जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले आहेत.

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जagricultureशेती