शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

६०० किलो प्लास्टिक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 23:51 IST

स्थानिक नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने रविवारी शासकीय सुटीचा दिवस असताना दुपारी २ वाजेपर्यंत वर्धा शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या तथा शासन आदेशाचा अंमल करण्याच्या उद्देशाने विशेष मोहीम राबविली.

ठळक मुद्देथर्माकोलही हस्तगत : चौघांकडून २० हजारांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने रविवारी शासकीय सुटीचा दिवस असताना दुपारी २ वाजेपर्यंत वर्धा शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या तथा शासन आदेशाचा अंमल करण्याच्या उद्देशाने विशेष मोहीम राबविली. यात पालिका कर्मचाऱ्यांनी तब्बल ६०० किलो थर्माकोल व कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. शिवाय चार व्यावसायिकांना २० हजारांचा दंड ठोठावून त्याची वसूली करण्यत आली.स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या निमित्ताने वर्धा शहरातील बेशिस्तांना शिस्त लावण्याचा प्रयत्न पालिकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी केला. यावेळी रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली होती. कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही त्याचा वापर वर्धा शहरात होत आहे. सदर प्लास्टिक पर्यावरणासाठी व सुंदर वर्धेसाठी घातक ठरत असल्याने शनिवारपासून वर्धा नगर पालिकेने विशेष मोहीम राबविण्याच्या निर्णय घेतला आहे. शनिवारी अनेक व्यावसायिकांना सूचना देऊनही २५ किलो कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केल्यानंतर रविवारी सुट्टीच्या दिवशी या पथकाने दुपारी २ वाजेपर्यंत शहरातील भाजी बाजार, पत्रावळी चौक, अंबीका चौक, बसस्थानक, सिंधी मार्केट, पटेल चौक, दत्तमंदिर चौक आदी भागातील छोट्या व मोठ्या व्यावसायिकांना विशेष मोहिमेदरम्यान मार्गदर्शनात्मक सूचना दिल्या. इतकेच नव्हे तर शनिवारी सूचना देऊनही कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना चार व्यावसायिक आढळून आल्याने त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावून २० हजारांचा दंड वसूल केला.ही कारवाई न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, न.प. प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर, न.प. आरोग्य विभाग प्रमुख प्रविण बोरकर यांच्या मार्गदर्शनात अशोक ठाकूर, विशाल सोमवंशी, निखील लोहवे, गजानन पेटकर, लंकेश गोंडेकर, नवीन गोनाडे, आशीष गायकवाड, गुरूदेव हटवार, सतीश पडोळे, स्रेहा मेश्राम आदींनी केली.शासन आदेशावर अंमलशासनाने प्लास्टिक व थर्माकोलवर पूर्णत: बंदी आणली आहे. प्लास्टिक पिशवी घेऊन दिसणाºया व्यक्तीवर दंडात्मक कार्यवाही केली जाणार आहे. शिवाय व्यापाऱ्यांवरही ही कार्यवाही केली जात आहे. यात दंडही थोडा थोडका नसून ५००० रुपये आहे. शासनाच्या या निर्णयावर जिल्ह्यातील नगर परिषद, नगर पंचायती, ग्रामपंचायतींनी कार्यवाहीला प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे. अन्य ठिकाणी जनजागृती तर वर्धेत पालिकेकडून जागृतीसह प्रत्यक्ष कारवाई केली जात आहे. शहरातून प्लास्टिक हद्दपार करून शहर सुंदर व स्वच्छ करण्याच्या उद्देशाने पालिका प्रशासन कामाला लागले आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी