शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

६०० किलो प्लास्टिक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 23:51 IST

स्थानिक नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने रविवारी शासकीय सुटीचा दिवस असताना दुपारी २ वाजेपर्यंत वर्धा शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या तथा शासन आदेशाचा अंमल करण्याच्या उद्देशाने विशेष मोहीम राबविली.

ठळक मुद्देथर्माकोलही हस्तगत : चौघांकडून २० हजारांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने रविवारी शासकीय सुटीचा दिवस असताना दुपारी २ वाजेपर्यंत वर्धा शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या तथा शासन आदेशाचा अंमल करण्याच्या उद्देशाने विशेष मोहीम राबविली. यात पालिका कर्मचाऱ्यांनी तब्बल ६०० किलो थर्माकोल व कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. शिवाय चार व्यावसायिकांना २० हजारांचा दंड ठोठावून त्याची वसूली करण्यत आली.स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या निमित्ताने वर्धा शहरातील बेशिस्तांना शिस्त लावण्याचा प्रयत्न पालिकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी केला. यावेळी रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली होती. कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही त्याचा वापर वर्धा शहरात होत आहे. सदर प्लास्टिक पर्यावरणासाठी व सुंदर वर्धेसाठी घातक ठरत असल्याने शनिवारपासून वर्धा नगर पालिकेने विशेष मोहीम राबविण्याच्या निर्णय घेतला आहे. शनिवारी अनेक व्यावसायिकांना सूचना देऊनही २५ किलो कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केल्यानंतर रविवारी सुट्टीच्या दिवशी या पथकाने दुपारी २ वाजेपर्यंत शहरातील भाजी बाजार, पत्रावळी चौक, अंबीका चौक, बसस्थानक, सिंधी मार्केट, पटेल चौक, दत्तमंदिर चौक आदी भागातील छोट्या व मोठ्या व्यावसायिकांना विशेष मोहिमेदरम्यान मार्गदर्शनात्मक सूचना दिल्या. इतकेच नव्हे तर शनिवारी सूचना देऊनही कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना चार व्यावसायिक आढळून आल्याने त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावून २० हजारांचा दंड वसूल केला.ही कारवाई न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, न.प. प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर, न.प. आरोग्य विभाग प्रमुख प्रविण बोरकर यांच्या मार्गदर्शनात अशोक ठाकूर, विशाल सोमवंशी, निखील लोहवे, गजानन पेटकर, लंकेश गोंडेकर, नवीन गोनाडे, आशीष गायकवाड, गुरूदेव हटवार, सतीश पडोळे, स्रेहा मेश्राम आदींनी केली.शासन आदेशावर अंमलशासनाने प्लास्टिक व थर्माकोलवर पूर्णत: बंदी आणली आहे. प्लास्टिक पिशवी घेऊन दिसणाºया व्यक्तीवर दंडात्मक कार्यवाही केली जाणार आहे. शिवाय व्यापाऱ्यांवरही ही कार्यवाही केली जात आहे. यात दंडही थोडा थोडका नसून ५००० रुपये आहे. शासनाच्या या निर्णयावर जिल्ह्यातील नगर परिषद, नगर पंचायती, ग्रामपंचायतींनी कार्यवाहीला प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे. अन्य ठिकाणी जनजागृती तर वर्धेत पालिकेकडून जागृतीसह प्रत्यक्ष कारवाई केली जात आहे. शहरातून प्लास्टिक हद्दपार करून शहर सुंदर व स्वच्छ करण्याच्या उद्देशाने पालिका प्रशासन कामाला लागले आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी