शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

६० हजार बेरोजगारांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:28 IST

बेरोजगारी दिवसागणिक वाढत आहे. जिल्ह्याच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात दररोज बेरोगारांच्या नोंदी घेतल्या जात आहेत. वर्षभरात जिल्ह्यात ६० हजार ३८९ बेरोजगारांनी आपल्या नावाची नोंदणी केल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देरोजगाराचा प्रश्न बिकट : ४०,७६८ मुले तर १९,६२१ मुली

गौरव देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बेरोजगारी दिवसागणिक वाढत आहे. जिल्ह्याच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात दररोज बेरोगारांच्या नोंदी घेतल्या जात आहेत. वर्षभरात जिल्ह्यात ६० हजार ३८९ बेरोजगारांनी आपल्या नावाची नोंदणी केल्याची माहिती आहे. या नोंदीवरून बेरोजगारांची फौज वाढत असल्याचे दिसून येत आहे.मागील वर्षी वर्षभरात ८ हजार ८०६ बेरोजगारांची नोंदणी झाली होती; पण प्रत्येक वर्षी हजारो युवक शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात फिरताना आढळतात. रोजगार मिळावा या हेतूने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात आपल्या नावाची नोंदणी करून नोकरीची प्रतीक्षा करतात. हा विभागही सध्या हायटेक झाला आहे; पण सामान्य शेतकºयांच्या मुलापर्यंत रोजगार पोहोचत नसल्याचे चित्र आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. जिल्ह्यात बेरोजगार युवकांच्या रोजगार निर्मितीकरिता कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही. प्रत्येक वर्षी दहावी, बारावी व पदवी घेणाºया युवकांच्यास संख्येसोबतच बेरोजगारीही वाढत असल्याचे दिसून आले आहे.तालुकास्तरावर घेतले जातात मेळावेजिल्ह्यातील बेरोजगारांची वाढती संख्या पाहता येथील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. यात वर्धा, आष्टी, देवळी, हिंगणघाट येथील मेळाव्यात युवकांची प्राथमिक निवड करण्यात आली. बेरोजगारांनी नोंदणी कार्डची वैधता संपल्यानंतर नुतनीकरण केले नाही. जिल्ह्यात कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्रात गतवर्षी ८ हजार ८०६ बेरोजगारांची नोंद झाली होती. यात ५ हजार ३२० मुले तर ३ हजार ५०४ मुलींची नोंदणी झाली होती. यावर्षी एकूण ६० हजार ३८९ बेरोजगारांची नोंद झाली. यात मुलाची संख्या ४० हजार ७६८ तर मुलींची संख्या १९ हजार ६२१ आहे. जिल्ह्यात सहा रोजगार मेळावे घेतले असून २८१ उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.अधिकाधिक बेरोजगार उमेदवारांना सहज शक्य व्हावे म्हणून शासनाने आॅनलाईन अर्जाची सुविधा केली आहे. आमच्या विभागाद्वारे तालुकास्तरावर रोजगार मेळावे घेण्यात येतात. रोजगाराची सुविधा व्हावी यासाठीही आमचा विभाग प्रयत्नशील आहे.- दा.सी. कोसारे, वरिष्ठ लिपीक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वर्धा.