शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

५४१ शेतकऱ्यांनी केली सौर कृषिपंपाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 23:47 IST

निसर्गाचा लहरीपणा आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून विद्युत जोडणी देताना राबविण्यात येणाऱ्या अडेलतट्टू धोरणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटकाच सहन करावा लागत असल्याचे वास्तव आहे. सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर होत त्याचा लाभ शेतकºयांना कसा देता येईल, या उद्देशाने शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना महावितरणच्या माध्यमातून सौर कृषिपंप देण्याची योजना आहे.

ठळक मुद्देएचव्हीडीएस योजना : केवळ सात जणांना दिली जोडणी

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निसर्गाचा लहरीपणा आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून विद्युत जोडणी देताना राबविण्यात येणाऱ्या अडेलतट्टू धोरणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटकाच सहन करावा लागत असल्याचे वास्तव आहे. सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर होत त्याचा लाभ शेतकऱ्यांना कसा देता येईल, या उद्देशाने शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना महावितरणच्या माध्यमातून सौर कृषिपंप देण्याची योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी एप्रिल २०१८ पासून ते आतापर्यंत ५४१ शेतकऱ्यांनी रितसर आवेदन महावितरणकडे सादर केले असून आतापर्यंत केवळ सात शेतकऱ्यांनाच जोडणी देण्यात आली आहे. परिणामी, या योजनेच्या प्रभावी जनजागृती करण्याची गरज आहे.प्राप्त माहितीनुसार, ज्या शेतकऱ्याच्या कृषिपंपाला विद्युत जोडणी देताना किमान ६०० मीटरच्यावर ११ केव्ही विद्युत वाहिनी टाकावी लागते, त्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला विद्युत जोडणी न देता त्यांना उच्चदाब वितरणप्रणाली या योजनेच्या माध्यमातून प्राधान्यक्रमाने सौर कृषीपंप कसे देता येईल, यासाठी सध्या महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. मार्च २०१८ अखेरपर्यंत वर्धा जिल्ह्यात २ हजार ६३३ सौरकृषीपंप शेतकऱ्यांना देण्याचे उद्दिष्ट शासनाच्यावतीने देण्यात आले होते. मात्र, सद्यस्थितीत केवळ सात शेतकऱ्यांच्या सौरकृषीपंपाला जोडणी देण्यात आली आहे.शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना किमान आठ तास वीजपुरवठा देण्याचे सरकारचे धोरण असले तरी जिल्ह्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसाला वीजपुरवठा केला जात नसल्याने त्यांच्या अडचणीत भर पडते. ही योजना शेतकरी हितार्थ असून या समस्येवर मात करण्यासाठी सौर कृषिपंप हा चांगला पर्याय ठरू शकत असल्याने त्याचे फायदे सध्या महावितरणचे अधिकारी व कर्मचाºयांकडून शेतकºयांना समजावून सांगितले जात आहेत.प्रस्तावाला मंजुरी देण्याचे अधिकार अधीक्षक अभियंत्यांनाउच्चदाब वितरणप्रणाली (एचव्हीडीएस) या योजनेच्या माध्यमातून महावितरणकडून सौर कृषिपंप मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे क्रमप्राप्त आहे.सुमारे चार दिवसांपूर्वी महावितरणने त्यासाठी नवीन वेबसाईट तयार केली असून त्यावर शेतकºयांनी प्रस्ताव सादर करावा, असे सांगण्यात येते. या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा अधिकार सध्या महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांना असल्याचेही सांगण्यात आले.तीन आणि पाच एचपीच्या सौरकृषीपंपांची होतेय चाचणीप्राप्त आवेदनानंतर कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करून ते प्रस्ताव संबंधितांकडे पाठविण्यात आले. त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार होत सध्या जिल्ह्यासाठी तीन आणि पाच एचपीचे सौर कृषिपंप प्राप्त झाले आहेत. त्याची चाचणी जिल्ह्यातील १२ ठिकाणी होणार असल्याचे सांगण्यात आले.२३१ शेतकऱ्यांना सौर कृषिपंप घेण्यासाठी घातले जातेय साकडेविद्युत जोडणीसाठी प्राप्त झालेल्या आवेदनापैकी २३१ अर्ज निकाली काढताना तसेच प्रत्यक्ष कामादरम्यान काही तांत्रिक अडचणी येणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. सदर शेतकऱ्यांना विद्युत जोडणी देण्यासाठी किमान ६०० मीटरच्यावर ११ केव्हीची विद्युत वाहिनी टाकावी लागत असल्याचे आणि ते महावितरण तसेच शेतकऱ्याला न परवडणारे असल्याने प्रामुख्याने निदर्शनास आल्याने या २३१ शेतकºयींनी सौरकृषीपंप घ्यावा, असे सध्या महावितरणच्या अधिकाºयांकडून पटवून दिले जात आहे.