शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
4
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
5
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
8
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
9
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
10
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
11
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
12
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
13
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
14
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
15
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
16
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
17
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
18
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
19
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
20
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

५४१ शेतकऱ्यांनी केली सौर कृषिपंपाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 23:47 IST

निसर्गाचा लहरीपणा आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून विद्युत जोडणी देताना राबविण्यात येणाऱ्या अडेलतट्टू धोरणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटकाच सहन करावा लागत असल्याचे वास्तव आहे. सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर होत त्याचा लाभ शेतकºयांना कसा देता येईल, या उद्देशाने शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना महावितरणच्या माध्यमातून सौर कृषिपंप देण्याची योजना आहे.

ठळक मुद्देएचव्हीडीएस योजना : केवळ सात जणांना दिली जोडणी

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निसर्गाचा लहरीपणा आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून विद्युत जोडणी देताना राबविण्यात येणाऱ्या अडेलतट्टू धोरणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटकाच सहन करावा लागत असल्याचे वास्तव आहे. सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर होत त्याचा लाभ शेतकऱ्यांना कसा देता येईल, या उद्देशाने शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना महावितरणच्या माध्यमातून सौर कृषिपंप देण्याची योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी एप्रिल २०१८ पासून ते आतापर्यंत ५४१ शेतकऱ्यांनी रितसर आवेदन महावितरणकडे सादर केले असून आतापर्यंत केवळ सात शेतकऱ्यांनाच जोडणी देण्यात आली आहे. परिणामी, या योजनेच्या प्रभावी जनजागृती करण्याची गरज आहे.प्राप्त माहितीनुसार, ज्या शेतकऱ्याच्या कृषिपंपाला विद्युत जोडणी देताना किमान ६०० मीटरच्यावर ११ केव्ही विद्युत वाहिनी टाकावी लागते, त्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला विद्युत जोडणी न देता त्यांना उच्चदाब वितरणप्रणाली या योजनेच्या माध्यमातून प्राधान्यक्रमाने सौर कृषीपंप कसे देता येईल, यासाठी सध्या महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. मार्च २०१८ अखेरपर्यंत वर्धा जिल्ह्यात २ हजार ६३३ सौरकृषीपंप शेतकऱ्यांना देण्याचे उद्दिष्ट शासनाच्यावतीने देण्यात आले होते. मात्र, सद्यस्थितीत केवळ सात शेतकऱ्यांच्या सौरकृषीपंपाला जोडणी देण्यात आली आहे.शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना किमान आठ तास वीजपुरवठा देण्याचे सरकारचे धोरण असले तरी जिल्ह्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसाला वीजपुरवठा केला जात नसल्याने त्यांच्या अडचणीत भर पडते. ही योजना शेतकरी हितार्थ असून या समस्येवर मात करण्यासाठी सौर कृषिपंप हा चांगला पर्याय ठरू शकत असल्याने त्याचे फायदे सध्या महावितरणचे अधिकारी व कर्मचाºयांकडून शेतकºयांना समजावून सांगितले जात आहेत.प्रस्तावाला मंजुरी देण्याचे अधिकार अधीक्षक अभियंत्यांनाउच्चदाब वितरणप्रणाली (एचव्हीडीएस) या योजनेच्या माध्यमातून महावितरणकडून सौर कृषिपंप मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे क्रमप्राप्त आहे.सुमारे चार दिवसांपूर्वी महावितरणने त्यासाठी नवीन वेबसाईट तयार केली असून त्यावर शेतकºयांनी प्रस्ताव सादर करावा, असे सांगण्यात येते. या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा अधिकार सध्या महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांना असल्याचेही सांगण्यात आले.तीन आणि पाच एचपीच्या सौरकृषीपंपांची होतेय चाचणीप्राप्त आवेदनानंतर कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करून ते प्रस्ताव संबंधितांकडे पाठविण्यात आले. त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार होत सध्या जिल्ह्यासाठी तीन आणि पाच एचपीचे सौर कृषिपंप प्राप्त झाले आहेत. त्याची चाचणी जिल्ह्यातील १२ ठिकाणी होणार असल्याचे सांगण्यात आले.२३१ शेतकऱ्यांना सौर कृषिपंप घेण्यासाठी घातले जातेय साकडेविद्युत जोडणीसाठी प्राप्त झालेल्या आवेदनापैकी २३१ अर्ज निकाली काढताना तसेच प्रत्यक्ष कामादरम्यान काही तांत्रिक अडचणी येणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. सदर शेतकऱ्यांना विद्युत जोडणी देण्यासाठी किमान ६०० मीटरच्यावर ११ केव्हीची विद्युत वाहिनी टाकावी लागत असल्याचे आणि ते महावितरण तसेच शेतकऱ्याला न परवडणारे असल्याने प्रामुख्याने निदर्शनास आल्याने या २३१ शेतकºयींनी सौरकृषीपंप घ्यावा, असे सध्या महावितरणच्या अधिकाºयांकडून पटवून दिले जात आहे.