शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

अवयदानासाठी जिल्ह्यातून ५३ जणांचा पुढाकार

By admin | Updated: September 2, 2016 02:04 IST

मृत्यूनंतर आपल्या शरीरातील काही अवयव दुसऱ्याच्या कामी यावे याकरिता शासनाच्यावतीने ३० आॅगस्ट ते १ सप्टेंबरपर्र्यंत

वर्धेत अवयवदान अभियान : यशस्वीतेकरिता नागरिकांत आणखी जनजागृतीची गरज वर्धा : मृत्यूनंतर आपल्या शरीरातील काही अवयव दुसऱ्याच्या कामी यावे याकरिता शासनाच्यावतीने ३० आॅगस्ट ते १ सप्टेंबरपर्र्यंत महाअवयवदान अभियान राबविण्याचा निर्णय घेतला होता. या अभियानात नागरिकांत जनजागृतीसह अवयवदान करण्याबाबत अर्ज भरून घ्यावयाचे होते. वर्धेत जाजागृती करण्यात आली; यात यशस्वी होण्याकरिता आणखी जनजागृतीची गरज असल्याचे दिसून आले आहे. या तीन दिवसात वर्धेत केवळ ५३ नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. शरीरातील अवयव निकामी झाल्याने अनेक नागरिक मृत्यूशी झुंज देत आहेत. ज्यांना जीवन मिळण्याकरिता हे अभियान असल्याचे शासनाच्यावतीने सांगण्यात आले. वर्धेत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा शल्य चिकित्सकांच्या उपस्थितीत या अभियानाच्या जनजागृतीकरिता कार्यक्रम राबविण्यात आले. यात शहरातून रॅली काढण्यात आली. गुरुवारी पुन्हा दुचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीद्वारे जिल्ह्यात करण्यात आलेल्या जनजागृतीतून ५३ नागरिकांनी अवयव दानाचा अर्ज भरून दिला आहे. हा अर्ज भरताना त्याची माहिती परिवारातील सदस्यांना देणे अनिवार्य होते. तसे अर्ज भरल्यानंतर या दात्यांना डोनेट कार्ड देण्यात आले तर त्यांचा अर्ज जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.(प्रतिनिधी) अभियानाच्या अंमलबजावणीकरिता विविध समित्याअभियानाच्या व्यापक व यशस्वी अंमलबजावणीकरिता जिल्ह्यात विविध स्तरावर समित्यांचे गठण करण्यात आले होत्या. यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत जिल्ह्याची समिती गठीत करण्यात आली होती. शिवाय तालुका स्तरावरही समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने केलेल्या जनजागृतीतून ५३ नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. या तीन दिवस चालणाऱ्या अभियानानंतर गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातून दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीला जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी प्रमोद पवार यांनी हिरवी झेंडी दिली. या रॅलीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मडावी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड, डीचओ चव्हाण सहभागी होते.