शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जिल्ह्यातील ५१२ शिक्षक बदलीच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:23 IST

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आॅनलाईन बदली प्रक्रि या सुरू झाली असून खो पद्धतीने ५१२ शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. यामध्ये उपशिक्षक, पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापकांचाही समावेश आहे. आॅनलाईन अर्ज भरण्याची सोमवारी रात्री १२ वाजतापर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती.

ठळक मुद्देप्रक्रियेला सुरुवात : आॅनलाईन अर्ज सादर करण्याची सोमवारी संपली मुदत

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आॅनलाईन बदली प्रक्रि या सुरू झाली असून खो पद्धतीने ५१२ शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. यामध्ये उपशिक्षक, पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापकांचाही समावेश आहे. आॅनलाईन अर्ज भरण्याची सोमवारी रात्री १२ वाजतापर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती.शिक्षकांच्या बदलीतील भ्रष्टाचार संपवून पारदर्शक बदली प्रक्रिया राबविण्यासाठी मागील वर्षीपासून आॅनलाईन बदली प्रक्रिया राबविली जात आहे. यावर्षी आचारसंहिता असल्याने बदली प्रक्रियेबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. परंतु आचार सहिंता संपात ग्रामविकास विभागाच्या २७ फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार शिक्षण विभागाने महाराष्ट्रातून सर्वात प्रथम जिल्ह्यात कार्यरत शिक्षकांचे मॅपिंग करून ४ जून रोजी आॅनलाईन मंजूर केले. तेव्हापासूनच शिक्षकांच्या बदलीकरिता आवेदनपत्र भरण्याची सुविधा ट्रान्सफर पोर्टलच्या शाळा लॉगिनमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्वात प्रथम संवर्ग-१ च्या शिक्षकांच्या अर्ज भरण्याला सुरुवात झाली. तसेच संवर्ग-२, संवर्ग-३ व संवर्ग-४ मधील सर्व शिक्षकांना बदलीकरिता अर्ज भरण्याची सुविधा ६ जूनला सकाळी ११ वाजतापासून उपलब्ध करून देण्यात आली. सवर्ग- १ ते सवर्ग-४ पर्यंतच्या सर्वच शिक्षकांना आपले आॅनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत १० जूनला रात्री १२ वाजतापर्यंत देण्यात आली.त्यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, अशा सूचनाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिल्या होत्या. त्यामुळे आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता बदलीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पाचवी फेरी होणार आॅफलाईनसवर्ग-१, संवर्ग-२, संवर्ग-३ व संवर्ग-४ मधील शिक्षकांच्या आॅनलाईन बदली प्रक्रि येनंतर पाचवी फेरी मुख कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या नियंत्रणात आॅफलाईन पद्धतीने होणार आहे. बदली पोर्टलमध्ये दहा वर्षे नोकरी झालेल्या आणि एकाच ठिकाणी कमीतकमी तीन वर्षे कार्यरत असलेल्या शिक्षकांनाच बदलीस पात्र ठरविले जात असल्याने मागीलवर्षीच्या बदली प्रक्रियेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा अर्ज पोर्टल स्वीकारत नाही. म्हणून या अतिरिक्त शिक्षकांच्या पाचव्या फेरीत आॅफलाईन पद्धतीने बदली होईल.मागीलवर्षी बदली प्रक्रियेत ज्यांना मनाप्रमाणे शाळा मिळाल्या नाही, असे शिक्षक न्यायालयात गेले होते. त्या शिक्षकांचा निकाल लागला असून १४३ शिक्षक आता बदलीस पात्र आहे. त्या शिक्षकांचे पाचव्या आॅफलाईन फेरीत प्राधान्य दिले जाईल. आॅनलाईन प्रक्रिया आटोपल्यानंतर त्यांचे समुपदेशन करून त्यांना त्यांच्या पसंतीनुसार शाळा दिली जाईल.अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचेही समुपदेशन करुन त्यांच्या बदल्या करण्यात येणार आहे. त्यांना पसंतीक्रम नसून नियुक्त केलेल्या ठिकाणीच जावे लागणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.बदली प्रक्रि येबाबत शिक्षकांची ओरड कायममागीलवर्षी झालेल्या बदली प्रक्रियेतील तक्रारीनंतर कारवाईचा बडगाही उगारण्यात आला होता. परंतु, न्यायालयाचे दार ठोठावल्यानंतर शासनाच्या आदेशावरच बोट ठेवत आदेशच अस्पष्ट असल्याने शिक्षकांवरील कारवाई टळली. आताही स्तनदा माता व गर्भवती शिक्षिकांचा संवर्ग-१ मध्ये समावेश करण्यात यावा, मागीलवर्षी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांनाही या भरती प्रक्रियेत अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात आली. परंतु, शिक्षकांची बदली पोर्टल महाराष्ट्राकरिता एकच असल्याने यात स्थानिक पातळीवरून बदल करणे शक्य नसल्याचे भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली.जिल्ह्यातील आठही तालुक्यातील कार्यरत ५१२ शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेच मागील वर्षी न्यायालया गेलेले १४३ शिक्षक आणि मागीलवर्षी अतिरिक्त ठरलेले शिक्षक यांना पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा नसल्याने त्यांच्या बदलीचे अधिकार मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना दिलेले आहे. त्यामुळे पाचव्या आॅफलाईन फेरीत न्यायालयात गेलेल्या आणि अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या बदल्या करण्यात येईल.-डॉ. वाल्मिक इंगोले, उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक वर्धा.