शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

५० हजार नागरिक ‘आधार’पासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 22:16 IST

समुद्रपूर तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येच्या गिरड गावासह तब्बल ५० हजार नागरिक आधार केंद्राच्या सुविधेपासून वंचित आहे. परिणामी, नोंदणीसाठी नागरिकांना तालुकास्थळी येरझारा कराव्या लागत असल्याने वेळ आणि पैशाचा अपव्यय होत आहे.

ठळक मुद्देगिरड येथे केंद्रच नाही : तालुकास्थळावरील केंद्रावर येरझारा

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : समुद्रपूर तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येच्या गिरड गावासह तब्बल ५० हजार नागरिक आधार केंद्राच्या सुविधेपासून वंचित आहे. परिणामी, नोंदणीसाठी नागरिकांना तालुकास्थळी येरझारा कराव्या लागत असल्याने वेळ आणि पैशाचा अपव्यय होत आहे. मागील दोन वर्षांपासून गावातील बंद केलेले आधार केंद्र पूर्ववत कायमस्वरूपी सुरू करावे, या मागणीकरिता जिल्हा प्रशासनाला वारंवार निवेदने दिली. प्रशासनाने समस्या लक्षात घेता गिरड येथे आधार केंद्र सुरू करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.गिरड भागातील लाखो नागरिकांना आधार सुविधा देणारी आॅनलाईन यंत्रणा दोन वर्षांपासून बंद करण्यात आली आहे. परिणामी, गावखेड्यातील आॅनलाईन प्रशासकीय कारभार आॅफलाईन झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. प्रत्येक शासकीय आणि निमशासकीय कामासाठी आज आधार कार्ड गरजेचे असताना ते नव्याने काढणे आणि दुरुस्ती करणे जिकरीचे झाले आहे.सध्या तालुक्याच्या ठिकाणी एका आधार केंद्रावर ही सुविधा पुरविली जात आहे. पेठ, मोहगाव, आर्वी, तावी, फरीदपूर, वानरचुहा, केसलापार, रासा, पिपरी, पिंपळगाव, लोखंडी, साखरा, तळोदी, मंगरूळ, ताडगाव, दसोडा, गणेशपूर, उंदिरगाव, जोगीनगुंफा, शिवणफळ, अंतरगाव, घोरपड, सावंगी, वडगाव, धोंडगाव, हुसेनपूर, शिरपूर, भवानपूर, एदलाबाद, खुर्सार्पार, कवडापूर यासह दोनशेहून अधिक गावखेड्यांकरिता हे एकमेव केंद्र आधार ठरत आहे. यामुळेच नागरिकांना एकाच कामाकरिता वारंवार या केंद्रावर उंबरठे झिजवावे लागत आहे. या आधार केंद्रावर एका दिवशी केवळ ३० ते ३५ जणांचीच नोंदणी केली जाते. पयार्याने आधार कार्ड काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना आल्यापावली परत जावे लागते. शासकीय योजना, शिक्षण, बँक लिंक, पॅनकार्ड काढण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, त्यावर पूर्ण जन्म तारीख नमूद असणे गरजेचे आहे. सुरुवातीला काढण्यात आलेल्या कित्येक आधार कार्डवर जन्मतारखेचा उल्लेख नाही.याशिवाय अनेकांच्या नावातही त्रुटी आहेत. त्या दुरुस्ती करणे गरजेचे असताना तालुक्यात एकच आधार केंद्र अस्तित्वात आहे.सध्या सुरु असलेल्या केंद्रावर आधार कार्डसंबंधित सर्व्हर सुरळीत नसल्याने नागरिकांना एकाच कामासाठी वारंवार हेलपाट्या माराव्या लागत आहे. तर आधार पुनर्दुरुस्ती केल्यावरही दोन-दोन महिने आधार कार्ड मिळत नाही. शिष्यवृत्ती अर्ज दाखल करण्यासाठी आधार कार्डवर पूर्ण जन्मतारीख व मोबाईल क्रमांक असल्याशिवाय विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारल्या जात नाही. विविध शासकीय योजनांकरिता चिमुकल्यांपासून तर वृद्धांपर्यंत आधार असणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीनंतर मिळालेल्या पैशाची उचल करणे, बँकेतून पन्नास हजारांवर पैशाची उचल करण्याकरिता पॅन कार्ड सोबतच आधारदेखील अनिवार्य आहे. मात्र, प्रशासकीय अनास्थेमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.जिल्हा प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देत उपाययोजना कराव्या, गिरड येथे तथा तालुकास्थळी समुद्रपूर येथे अतिरिक्त केंद्रे देण्यात यावी, अशी मागणी गिरडसह दोनशी गावांतील नागरिकांनी केली आहे.एकमेव केंद्रावर दोनशेपेक्षा अधिक गावांचा भारसमुद्रपूर तालुक्यात सुरू असलेल्या सीएससी केंद्राला आधार केंद्र संलग्न करण्यात आले होते. याच केंद्रावर आधार कार्डसंबंधित साहित्य पुरविण्यात आले होते. प्रशासनाकडून कालांतराने हे साहित्य परत घेण्यात आले. सध्या समुद्रपूर येथे असलेल्या केंद्रावर संपूर्ण तालुक्यातील गावखेड्यांचा भार आहे. या एकाच केंद्रावर मोठी गर्दी उसळते. या केंद्रावरही अतिरिक्त पैसे घेतले जात असल्याचा विविध गावांतील नागरिकांचा आरोप आहे.शिष्यवृत्ती अर्ज दाखल करण्यासाठी आधार कार्डवर पूर्ण जन्मतारीख व मोबाईल क्रमांक असल्याशिवाय विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारल्या जात नाही. विविध शासकीय योजनांकरिता चिमुकल्यांपासून तर वृद्धांपर्यंत आधार बंधनकारक आहे. अपुºया केंद्राअभावी वंचित राहावे लागत असल्याने सर्वच चिंतित आहेत.समुद्रपूर तालुक्यात पूर्वी पाच ठिकाणी आधार केंद्रे सुरू करण्यात आली होती. या आधार केंद्रामुळे नागरिकांची दस्ताऐवज मिळविण्यासाठीची प्रशासकीय कार्यालयात होणारी दिरंगाई आणि अतिरिक्त पैशाच्या भुर्दंड यापासून मुक्तता झाली. मात्र, काही दिवस सुरळीत चाललेले आधार केंद्र अचानक प्रशासनाने बंद केल्याने परिस्थिती ‘जैसे थे‘ झाली आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड