शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
3
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
4
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
5
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
8
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
9
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
10
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
11
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
12
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
13
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
14
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
15
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
16
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
17
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
18
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
19
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
20
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

५० टक्के अनुदानावर कांदाचाळ

By admin | Updated: May 27, 2017 00:26 IST

जिल्ह्यात कांदा पीक लागवड क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. यात शेतकरी उत्पन्न घेत असून कांदा दीर्घकाळ टिकविण्याकरिता कांदाचाळ उभारणी आवश्यक आहे.

आतापर्यंत १४ कांदा उत्पादकांनी घेतला योजनेचा लाभ लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात कांदा पीक लागवड क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. यात शेतकरी उत्पन्न घेत असून कांदा दीर्घकाळ टिकविण्याकरिता कांदाचाळ उभारणी आवश्यक आहे. अशाच कांदाचाळ उभारण्याकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदान एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास अभियान या योजनेंतर्गत देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ आजपर्यंत जिल्ह्यातील १४ शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यांनी यातून कादांचाळची उभारणी केली आहे. या कांदाचाळीत २३० मेट्रीक टन कांद्याची साठवणूक केली जाते. सन २०१७-१८ या वर्षामध्ये भरपूर प्रमाणात कांदाचाळ उभारणीचे लक्षांक कृषी विभागाला प्राप्त होणार आहे. यामुळे इच्छूक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदाचाळ उभारणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात अर्ज संबंधित कृषी सहायक कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे जमा करावेत. तद्नंतर तालुका हा घटक मानून जिल्हास्तरावर सोडत पद्धतीने लाभार्थीला पूर्वसंमती देण्यात येईल. अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाणार आहे. असे मिळणार अनुदान शासनाच्यावतीने देण्यात येणारे अनुदान ५ मेट्रीक टन पासून २५ मेट्रीक टन क्षमतेच्या कांदा चाळीस देय राहील. कांदाचाळी बांधण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल ३ हजार ५०० प्रती मेट्रीक टन या प्रमाणे २५ मेट्रीक टन क्षमतेपर्यंत कांदाचाळीवर जास्तीत जास्त ८७ हजार ५०० रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्जासोबत सातबारा, आठ अ, शेतकऱ्याचे छायाचित्र आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स जोडणे अनिवार्य असल्याचे कळविण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या सातबारावर कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.