शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात प्रवासादरम्यान ५० बसेस झाल्या ‘फेल’

By admin | Updated: February 10, 2017 01:26 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या प्रवासादरम्यान बंद पडण्याचे प्रमाण जिल्ह्यात आजही कायमच आहे.

पाच आगारात २८३ बसगाड्या : नादुरूस्त बसेसमुळे प्रवाशांना फटका वर्धा: राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या प्रवासादरम्यान बंद पडण्याचे प्रमाण जिल्ह्यात आजही कायमच आहे. प्रवाशांच्या सेवेकरिता पूर्णत: फिट नसलेल्या बसगाड्या रस्त्याने धावत असल्याने झालेल्या रस्त्यात मध्येच ब्रेकडाऊन होत आहे. यामुळे मुळे प्रवाशांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. एका जानेवारी महिन्यात तब्बन ५० बसगाड्या प्रवासादरम्यान बंद पडल्याची नोंद विभागात आहे.प्रवाशांना सेवा देणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीला आपली बस म्हणून शहरासह ग्रामीण भागातील नागरिक तिच्याकडे पाहत आहेत. या बसमधूनच त्यांचा प्रवास होत आहे. याच प्रवाशांच्या बळावर नफा कमविण्यात वर्धा विभागाने राज्यात नाव काढले आहे. मात्र याच प्रवाशांना सेवा अत्यावश्यक पुरविण्यात हा विभाग हयगय करीत असल्याचे दिसत आहे. रस्त्याने धावणाऱ्या बसगाड्या फिट आहेत अथवा नाही, याची कुठलीही शहानिशा न करता त्या पाठविण्यात येतात. या बसगाड्या रस्त्यात कुठेही बंद पडतात. याचा त्रास त्या बसमधून प्रवास करणाऱ्यांना सहन करावा लागतो. प्रवाशांना सेवा पुरविण्याकरिता जिल्ह्यातील पाच आगारातून एकूण २८३ बसगाड्यांच्या माध्यमातून १,६६२ फेऱ्या होत आहेत. या रस्त्याने धावत असलेल्या बऱ्याच बसगाड्या नादुरूस्त असल्याचे दिसते. प्रवाशांच्या सेवेत धावत असलेल्या बऱ्याच बसगाड्यांची जीवनरेषाच ब्रेक झाल्याचा अंदाज त्यांची अवस्था पाहताच येतो. या गाड्यात ना धड आसन व्यवस्था ना धाडाच्या खिडक्या आहेत. त्यांची तावदाने तर केव्हाच फुटली असल्याचे दिसून आले आहे. बसच्या चालकाला मागाहून येणारे वाहन दिसण्याकरिता असलेला आरसाही (साईड मिरर) बऱ्याच गाड्यात दोरीने बांधलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येते. या सर्व प्रकारातून परिवहन महामंडळाच्या लालपरिचा प्रवास सुरू आहे. याच बसगाड्यांच्या आधारावर वर्धा विभाग नफा कमविण्यात राज्यात आघाडी घेत असून सेवांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे.(प्रतिनिधी) पाच आगारातून लालपरीच्या दररोज १६६२ फेऱ्या नागरिकांना बससेवा पुरविण्याकरिता जिल्ह्यातून तब्बल १ हजार ६६२ बसफेऱ्या होत आहेत. मात्र यातील बऱ्याच बस प्रवासादरम्यान बंद पडत असल्याचे दिसून आले आहे. याचा त्रास बसमधील प्रवाशांना होत आहे. शिवाय परिवहन विभागालाही त्याचा फटका सहन करावा लागत आहे. याचा विचार राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे झाले आहे.