शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

महिनाभरात प्रवासादरम्यान ५० बसेस झाल्या ‘फेल’

By admin | Updated: February 10, 2017 01:26 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या प्रवासादरम्यान बंद पडण्याचे प्रमाण जिल्ह्यात आजही कायमच आहे.

पाच आगारात २८३ बसगाड्या : नादुरूस्त बसेसमुळे प्रवाशांना फटका वर्धा: राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या प्रवासादरम्यान बंद पडण्याचे प्रमाण जिल्ह्यात आजही कायमच आहे. प्रवाशांच्या सेवेकरिता पूर्णत: फिट नसलेल्या बसगाड्या रस्त्याने धावत असल्याने झालेल्या रस्त्यात मध्येच ब्रेकडाऊन होत आहे. यामुळे मुळे प्रवाशांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. एका जानेवारी महिन्यात तब्बन ५० बसगाड्या प्रवासादरम्यान बंद पडल्याची नोंद विभागात आहे.प्रवाशांना सेवा देणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीला आपली बस म्हणून शहरासह ग्रामीण भागातील नागरिक तिच्याकडे पाहत आहेत. या बसमधूनच त्यांचा प्रवास होत आहे. याच प्रवाशांच्या बळावर नफा कमविण्यात वर्धा विभागाने राज्यात नाव काढले आहे. मात्र याच प्रवाशांना सेवा अत्यावश्यक पुरविण्यात हा विभाग हयगय करीत असल्याचे दिसत आहे. रस्त्याने धावणाऱ्या बसगाड्या फिट आहेत अथवा नाही, याची कुठलीही शहानिशा न करता त्या पाठविण्यात येतात. या बसगाड्या रस्त्यात कुठेही बंद पडतात. याचा त्रास त्या बसमधून प्रवास करणाऱ्यांना सहन करावा लागतो. प्रवाशांना सेवा पुरविण्याकरिता जिल्ह्यातील पाच आगारातून एकूण २८३ बसगाड्यांच्या माध्यमातून १,६६२ फेऱ्या होत आहेत. या रस्त्याने धावत असलेल्या बऱ्याच बसगाड्या नादुरूस्त असल्याचे दिसते. प्रवाशांच्या सेवेत धावत असलेल्या बऱ्याच बसगाड्यांची जीवनरेषाच ब्रेक झाल्याचा अंदाज त्यांची अवस्था पाहताच येतो. या गाड्यात ना धड आसन व्यवस्था ना धाडाच्या खिडक्या आहेत. त्यांची तावदाने तर केव्हाच फुटली असल्याचे दिसून आले आहे. बसच्या चालकाला मागाहून येणारे वाहन दिसण्याकरिता असलेला आरसाही (साईड मिरर) बऱ्याच गाड्यात दोरीने बांधलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येते. या सर्व प्रकारातून परिवहन महामंडळाच्या लालपरिचा प्रवास सुरू आहे. याच बसगाड्यांच्या आधारावर वर्धा विभाग नफा कमविण्यात राज्यात आघाडी घेत असून सेवांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे.(प्रतिनिधी) पाच आगारातून लालपरीच्या दररोज १६६२ फेऱ्या नागरिकांना बससेवा पुरविण्याकरिता जिल्ह्यातून तब्बल १ हजार ६६२ बसफेऱ्या होत आहेत. मात्र यातील बऱ्याच बस प्रवासादरम्यान बंद पडत असल्याचे दिसून आले आहे. याचा त्रास बसमधील प्रवाशांना होत आहे. शिवाय परिवहन विभागालाही त्याचा फटका सहन करावा लागत आहे. याचा विचार राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे झाले आहे.