शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात प्रवासादरम्यान ५० बसेस झाल्या ‘फेल’

By admin | Updated: February 10, 2017 01:26 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या प्रवासादरम्यान बंद पडण्याचे प्रमाण जिल्ह्यात आजही कायमच आहे.

पाच आगारात २८३ बसगाड्या : नादुरूस्त बसेसमुळे प्रवाशांना फटका वर्धा: राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या प्रवासादरम्यान बंद पडण्याचे प्रमाण जिल्ह्यात आजही कायमच आहे. प्रवाशांच्या सेवेकरिता पूर्णत: फिट नसलेल्या बसगाड्या रस्त्याने धावत असल्याने झालेल्या रस्त्यात मध्येच ब्रेकडाऊन होत आहे. यामुळे मुळे प्रवाशांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. एका जानेवारी महिन्यात तब्बन ५० बसगाड्या प्रवासादरम्यान बंद पडल्याची नोंद विभागात आहे.प्रवाशांना सेवा देणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीला आपली बस म्हणून शहरासह ग्रामीण भागातील नागरिक तिच्याकडे पाहत आहेत. या बसमधूनच त्यांचा प्रवास होत आहे. याच प्रवाशांच्या बळावर नफा कमविण्यात वर्धा विभागाने राज्यात नाव काढले आहे. मात्र याच प्रवाशांना सेवा अत्यावश्यक पुरविण्यात हा विभाग हयगय करीत असल्याचे दिसत आहे. रस्त्याने धावणाऱ्या बसगाड्या फिट आहेत अथवा नाही, याची कुठलीही शहानिशा न करता त्या पाठविण्यात येतात. या बसगाड्या रस्त्यात कुठेही बंद पडतात. याचा त्रास त्या बसमधून प्रवास करणाऱ्यांना सहन करावा लागतो. प्रवाशांना सेवा पुरविण्याकरिता जिल्ह्यातील पाच आगारातून एकूण २८३ बसगाड्यांच्या माध्यमातून १,६६२ फेऱ्या होत आहेत. या रस्त्याने धावत असलेल्या बऱ्याच बसगाड्या नादुरूस्त असल्याचे दिसते. प्रवाशांच्या सेवेत धावत असलेल्या बऱ्याच बसगाड्यांची जीवनरेषाच ब्रेक झाल्याचा अंदाज त्यांची अवस्था पाहताच येतो. या गाड्यात ना धड आसन व्यवस्था ना धाडाच्या खिडक्या आहेत. त्यांची तावदाने तर केव्हाच फुटली असल्याचे दिसून आले आहे. बसच्या चालकाला मागाहून येणारे वाहन दिसण्याकरिता असलेला आरसाही (साईड मिरर) बऱ्याच गाड्यात दोरीने बांधलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येते. या सर्व प्रकारातून परिवहन महामंडळाच्या लालपरिचा प्रवास सुरू आहे. याच बसगाड्यांच्या आधारावर वर्धा विभाग नफा कमविण्यात राज्यात आघाडी घेत असून सेवांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे.(प्रतिनिधी) पाच आगारातून लालपरीच्या दररोज १६६२ फेऱ्या नागरिकांना बससेवा पुरविण्याकरिता जिल्ह्यातून तब्बल १ हजार ६६२ बसफेऱ्या होत आहेत. मात्र यातील बऱ्याच बस प्रवासादरम्यान बंद पडत असल्याचे दिसून आले आहे. याचा त्रास बसमधील प्रवाशांना होत आहे. शिवाय परिवहन विभागालाही त्याचा फटका सहन करावा लागत आहे. याचा विचार राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे झाले आहे.