शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

४७ घरांवर चालला बुलडोजर

By admin | Updated: May 30, 2014 00:16 IST

रस्ता रूंदीकरणाच्या नावावर गुरुवारी गावात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यात गावातील घरे व दुकाने अशा एकूण ४७ इमारतीवर बुलडोजर चालविण्यात आला.

अनेक कुटुंब आले उघड्यावर : चोख पोलीस बंदोबस्तात राबविली मोहीमतळेगाव (टालाटुले) : रस्ता रूंदीकरणाच्या नावावर गुरुवारी गावात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यात गावातील घरे व दुकाने अशा एकूण ४७ इमारतीवर बुलडोजर चालविण्यात आला. अनेकांच्या डोक्यावरील छत गेले तर अनेकांच्या व्यवसायावर गंडांतर आले. ही अतिक्रमण हटाव मोहीम राजकीय द्वेषातून करण्यात आल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. येथून जाताना ठिकठिकाणी वाहनांची कोंडी होत असल्याच्या कारणाने रस्त्याचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण काढण्याची कारवाई बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आली. ज्यांचे अतिक्रमण आहे. त्यांनी ते स्वत: काढावे, अशा सूचना बांधकाम विभागाच्यावतीने पूर्वीच करण्यात आल्या. यामुळे दचकलेल्या गावकर्‍यांनी बांधकाम विभागाला ही कारवाई थांबविण्याकरिता निवदेन दिले. यावेळी पूर्ण चौकशी होणार नाही तोपर्यंत कुठलीही कारवाई करणार नसल्याचे आश्‍वासन अभियंत्याने देताच आंदोलन मागे घेतले. लगेच दुसर्‍या दिवशी बांधकाम विभागाची यंत्रणा गावात आली. नंतर अधिकारी सुमारे पाच वाजताच्या सुमारास आली. यावेळी झालेले चर्चेनंतर अधिकारी गावातून निघून गेले. अचानक गुरुवारी सकाळी ९ वाजता पोलिसांचा ताफा आला. नंतर बांधकाम विभागाचे अधिकारी आले. ते कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अतिक्रमणधारकांपैकी एकानेही आपले साहित्य काढले नव्हते त्यामुळे जेसीबी लागताच कुणी घरावरील टिन काढू लागले तर कुणी घरातील साहित्य काढत होते. अनेकांच्या घराते शेतीसाहित्यही होते. अतिक्रमण काढण्याकरिता महसूल विभागाचे अधिकारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव गायकवाड, उपअभियंता अय्यर,   उपभियंता गिरी, आचार्य, तहसीलदार व पोलीस हजर होते.(वार्ताहर)अनेकांच्या डोळ्यात अश्रूअतिक्रमणात ज्यांचे घर व दुकान पडले ते डोळ्यात आसवे असताना सुद्धा काही बोलू शकले नाही. ज्यांचे अतिक्रमण नाही. ते बरे झाले अतिक्रमण पडले, यामुळे रस्ता मोकळा झाला असे बोलत होते. कर्ज घेऊन बांधले घर, उभारली दुकाने अनेकांनी घर बांधण्यासाठी व दुकान थाटण्यासाठी कर्ज घेतले होते. या अतिक्रमण हटाव मोहिमेत घर व दुकाने पडल्याने त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उभे ठाकले आहे. अधिकार्‍यांना हवा होता सहा मीटर रस्ताअधिकार्‍यांना रस्त्याच्या मधोमध दोन्ही बाजूने सहा सहा मीटर रस्ता हवा होता. त्यामुळे त्यांनी येताच मोजणी केली व लगेच घरे तोडायला सुरूवात केली. काहींचे निशान केलेल्या जागेपेक्षा जास्त पडले तर काहींचे कमी.