शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

बंद संकेतस्थळामुळे 4,458 गरजू स्वस्त धान्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 05:00 IST

ज्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अधिकाऱ्यांना नोंद करावी लागते, तेच संकेतस्थळ मागील महिनाभरापासून बंद असल्याने तब्बल ४ हजार ४५८ गरजूंचे अर्ज धूळखात आहेत. शिवाय ते स्वस्त धान्यापासून वंचित असल्याचे वास्तव आहे. सदर समस्या तातडीने निकाली निघावी म्हणून जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या वर्धा येथील काही अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती मुंबई दरबारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात एकूण २ लाख ८० हजार १८० शिधापत्रिकाधारक असून, यावर तब्बल ११ लाख ३१ हजार ४६१ व्यक्तींची नोंद घेण्यात आली आहे. असे असले तरी नवीन शिधापत्रिका प्राप्त करू इच्छिणाऱ्यांचा अर्ज प्राप्त झाल्यावर आवेदकाची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली जाते. पण ज्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अधिकाऱ्यांना नोंद करावी लागते, तेच संकेतस्थळ मागील महिनाभरापासून बंद असल्याने तब्बल ४ हजार ४५८ गरजूंचे अर्ज धूळखात आहेत. शिवाय ते स्वस्त धान्यापासून वंचित असल्याचे वास्तव आहे. सदर समस्या तातडीने निकाली निघावी म्हणून जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या वर्धा येथील काही अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती मुंबई दरबारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. पण केवळ वातानुकूलित कक्षात बसून आपणच सर्व कामे करतो, असा आव आणणारे हे अधिकारी सध्या केवळ आश्वासनच देत असल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. ही समस्या तातडीने निकाली काढण्यात यावी, अशी मागणी नागरिकांची आहे. 

नागरिकांना झिजवावे लागतेय शासकीय कार्यालयांचे उंबरठे-    ऑनलाईन पद्धतीने नोंद घेणारे संकेतस्थळ बंद असले तरी नागरिकांच्या अडचणीत भर पडू नये, म्हणून तालुका पुरवठा अधिकारी कार्यालयात नवीन शिधापत्रिकेबाबतचे अर्ज स्वीकारले जात आहेत. पण संकेतस्थळ सुरू झाले काय याची विचारणा करण्यासाठी दररोज शेकडो नागरिकांना शासकीय कार्यालयाचे उंबरठेच झिजवावे लागत असल्याचे वास्तव आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर हतबल नागरिकांचा रोष-   संकेतस्थळ आज सुरू झाले असावे, या आशेने तालुका पुरवठा अधिकारी कार्यालयात येरझारा मारणाऱ्यांत वृद्धांचीही  मोठा संख्या असून संकेतस्थळच बंद असल्याने सध्या त्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. - नाहक त्रास सहन करून हतबल झालेले नागरिक सध्या जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसह मुंबई दरबारातील बड्या अधिकाऱ्यांच्या नावाने बोटच मोडत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

आपण आवश्यक कागदपत्रे संलग्न करून नवीन शिधापत्रिकेसाठी रीतसर अर्ज केला आहे. पण ऑनलाईन नोंद घेण्यासाठीचे संकेतस्थळच बंद असल्याने ते सुरू झाल्यावर नोंदणी होईल असे सांगण्यात आले. नागरिकांची समस्या लक्षात घेता अधिकाऱ्यांनी या प्रकरणी वेळीच लक्ष देत समस्या निकाली काढावी.- राखी वरभे, अर्जदार.

संकेतस्थळ बंद असून ऑनलाईन पद्धतीने नोंद घेताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे आम्ही वरिष्ठांना याची माहिती दिली आहे. शिवाय पाठपुरावा सुरू आहे. या प्रकरणी लवकरच योग्य कार्यवाही होण्याची अपेक्षा आहे.- प्रज्वल पाथरे,  पुरवठा अधिकारी, वर्धा. 

 

टॅग्स :Governmentसरकारgovernment schemeसरकारी योजना