शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

बंद संकेतस्थळामुळे 4,458 गरजू स्वस्त धान्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 05:00 IST

ज्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अधिकाऱ्यांना नोंद करावी लागते, तेच संकेतस्थळ मागील महिनाभरापासून बंद असल्याने तब्बल ४ हजार ४५८ गरजूंचे अर्ज धूळखात आहेत. शिवाय ते स्वस्त धान्यापासून वंचित असल्याचे वास्तव आहे. सदर समस्या तातडीने निकाली निघावी म्हणून जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या वर्धा येथील काही अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती मुंबई दरबारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात एकूण २ लाख ८० हजार १८० शिधापत्रिकाधारक असून, यावर तब्बल ११ लाख ३१ हजार ४६१ व्यक्तींची नोंद घेण्यात आली आहे. असे असले तरी नवीन शिधापत्रिका प्राप्त करू इच्छिणाऱ्यांचा अर्ज प्राप्त झाल्यावर आवेदकाची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली जाते. पण ज्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अधिकाऱ्यांना नोंद करावी लागते, तेच संकेतस्थळ मागील महिनाभरापासून बंद असल्याने तब्बल ४ हजार ४५८ गरजूंचे अर्ज धूळखात आहेत. शिवाय ते स्वस्त धान्यापासून वंचित असल्याचे वास्तव आहे. सदर समस्या तातडीने निकाली निघावी म्हणून जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या वर्धा येथील काही अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती मुंबई दरबारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. पण केवळ वातानुकूलित कक्षात बसून आपणच सर्व कामे करतो, असा आव आणणारे हे अधिकारी सध्या केवळ आश्वासनच देत असल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. ही समस्या तातडीने निकाली काढण्यात यावी, अशी मागणी नागरिकांची आहे. 

नागरिकांना झिजवावे लागतेय शासकीय कार्यालयांचे उंबरठे-    ऑनलाईन पद्धतीने नोंद घेणारे संकेतस्थळ बंद असले तरी नागरिकांच्या अडचणीत भर पडू नये, म्हणून तालुका पुरवठा अधिकारी कार्यालयात नवीन शिधापत्रिकेबाबतचे अर्ज स्वीकारले जात आहेत. पण संकेतस्थळ सुरू झाले काय याची विचारणा करण्यासाठी दररोज शेकडो नागरिकांना शासकीय कार्यालयाचे उंबरठेच झिजवावे लागत असल्याचे वास्तव आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर हतबल नागरिकांचा रोष-   संकेतस्थळ आज सुरू झाले असावे, या आशेने तालुका पुरवठा अधिकारी कार्यालयात येरझारा मारणाऱ्यांत वृद्धांचीही  मोठा संख्या असून संकेतस्थळच बंद असल्याने सध्या त्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. - नाहक त्रास सहन करून हतबल झालेले नागरिक सध्या जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसह मुंबई दरबारातील बड्या अधिकाऱ्यांच्या नावाने बोटच मोडत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

आपण आवश्यक कागदपत्रे संलग्न करून नवीन शिधापत्रिकेसाठी रीतसर अर्ज केला आहे. पण ऑनलाईन नोंद घेण्यासाठीचे संकेतस्थळच बंद असल्याने ते सुरू झाल्यावर नोंदणी होईल असे सांगण्यात आले. नागरिकांची समस्या लक्षात घेता अधिकाऱ्यांनी या प्रकरणी वेळीच लक्ष देत समस्या निकाली काढावी.- राखी वरभे, अर्जदार.

संकेतस्थळ बंद असून ऑनलाईन पद्धतीने नोंद घेताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे आम्ही वरिष्ठांना याची माहिती दिली आहे. शिवाय पाठपुरावा सुरू आहे. या प्रकरणी लवकरच योग्य कार्यवाही होण्याची अपेक्षा आहे.- प्रज्वल पाथरे,  पुरवठा अधिकारी, वर्धा. 

 

टॅग्स :Governmentसरकारgovernment schemeसरकारी योजना