शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

४४ तलाव गाळमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 23:05 IST

जलयुक्त शिवार अभियानाच्या जोडीला शासनाने गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार अभियान राबविले असून याचे सुखद परिणाम सध्या जिल्ह्यात दिसत आहे. साखरा गावातील एका शेतकऱ्याने तलावातील गाळ शेतात टाकल्यामुळे  कापसाचे उत्पादनात ५ पटीने वाढ झाली आहे.

ठळक मुद्देगाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार : गाळामुळे उत्पादनात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जलयुक्त शिवार अभियानाच्या जोडीला शासनाने गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार अभियान राबविले असून याचे सुखद परिणाम सध्या जिल्ह्यात दिसत आहे. साखरा गावातील एका शेतकऱ्याने तलावातील गाळ शेतात टाकल्यामुळे  कापसाचे उत्पादनात ५ पटीने वाढ झाली आहे.जलयुक्त शिवार या योजनेसारखीच शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना शासनाने सुरू केली. जिल्ह्यात यावर्षी ४४ तलावातील ११ लक्ष २३ हजार ४५ घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला. यामध्ये हिंगणघाट समुद्रपूर, आर्वी व कारंजा  तालुक्यातील सुमारे ५०० शेतकºयांनी स्वखर्चाने गाळ काढून नेला. तर काही शेतकºयांनी काढलेला गाळ स्वखर्चाने शेता पर्यंत नेला. याचा अतिशय चांगलाच फायदा शेतकºयांना झाल्याचे दिसते. साखरा या गावात दिवाकर कांबळी यांच्या शेतात तलावातील गाळाने चमत्कारच केला आहे. दिवाकर व त्यांच्या वडिलांची १५ एकर शेती गावातील तलावाला लागून आहे. कांबळी यांचे शेत म्हणजे मुरमाड जमीन. यामध्ये दरवर्षी कापसाचे एकरी २ क्विंटल उत्पादन होत होते; पण तलावातील सुपीक गाळ त्यांच्या शेतीसाठी फायद्याचाच ठरला आहे.साखरा गाव तलावातील गाळ २५ शेतकऱ्यांना ठरला लाभदायकसमुद्रपूर तालुक्यातील साखरा गावाच्या बाहेर असलेल्या ८ हेक्टरवरील या गाव तलावातून १० हजार घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला. तलावातील गाळ काढण्याचे काम मे महिन्यात जि.प. लघुसिंचन विभागाने अनुलोमच्या सहकार्याने लोक सहभागातुन सुरू केले. या तलावातून गावातील २५ शेतकºयांनी १० हजार घनमीटर गाळ नेला आहे. दिवाकर कांबळी त्यातीलच एक शेतकरी असून त्यांनी स्वत: १८५३ ट्रॉली गाळ १२ एकर शेतात ६ इंच थर होईल याप्रमाणे टाकला. यासाठी त्यांनी २२ ट्रॅक्टर  कामाला लावले होते. गाळ काढून वाहून नेण्यासाठी त्यांना साडेपाच लक्ष रुपये खर्च आला. केवळ २५० रुपये ट्रॉली मध्ये त्यांना हा गाळ मिळाला. यामध्ये डिझेलचा ७२ हजार रुपयांचा खर्च शासनाने केला. याचा अतिशय सुखद परिणाम त्यांना यावर्षी खरीप हंगामात पाहायला मिळाला.एकरी उत्पादनात वाढज्या शेतात एकरी २ क्विंटल कापूस व्हायचा. तेथे त्यांना पहिलाच वेचा ५५ क्विंटल झाला आहे. आणखी ३० क्विंटलचे दोन वेचे निघतील असा अंदाज या शेतकऱ्यांना आहे. म्हणजे एकरी ९.५ क्विंटलचे सरासरी उत्पादन त्यांना अपेक्षित आहे. त्यांच्या नेहमीच्या उत्पादनाच्या हे ५ पट आहे असे दिवाकर कांबळी यांनी सांगितले. मुख्य म्हणजे त्यांचे गाळ टाकलेले १२ एकर शेत आणि गाळ न टाकलेल्या ३ एकर शेतीतील पिकाच्या गुणवत्तेतील फरक लगेच लक्षात येतो. ३ एकर शेतातील पऱ्हाटीला केवळ पाच ते सहा बोंड दिसतात आणि त्याची वाढ सुद्धा २ फुटाच्या वर झालेली दिसत नाही.समुद्रपूर तालुक्यात ३५ हजार ९२३ घनमीटर गाळाचा उपसा केला. १६५ शेतकºयांनी याचा लाभ घेतला आहे. यामुळे तलावांची पाणी साठवण क्षमता वाढली असून शेतकºयांच्या उत्पादनातही वाढ झाल्याचे सुखद चित्र दिसत आहे.- हेमंत गेहलोत, कार्यकारी अभियंता, लघुसिंचन विभाग, जि. प. वर्धा.तलावातील गाळामुळे माज्या शेतीचा पोत सुधारला आहे. त्याचा फायदा लगेच यावर्षी दिसून येत आहे. मला गाळ टाकण्यासाठी आलेला सर्व खर्च यावर्षीच  निघणार आहे. शेवटचा  एक पाऊस आला असता तर कापसाचे उत्पादन यापेक्षाही जास्त झाले असते.- दिवाकर कांबळी, शेतकरी, साखरा.