शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

एका झाडावर ४३३ रुपयांचा खर्च

By admin | Updated: June 28, 2017 00:47 IST

शासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात १ जुलै २०१६ पासून वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविण्यात आला.

तरीही ६४० वृक्ष वाळले : ग्रा.पं.त आठ मजूर कार्यरत हर्षल तोटे। लोकमत न्यूज नेटवर्क पवनार : शासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात १ जुलै २०१६ पासून वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविण्यात आला. यात पवनार ग्रामपंचायतीच्यावतीने २,००० वृक्ष लागवड केली. आज त्यापैकी १,३६० वृक्ष जिवंत आहे. या झाडांच्या संगोपनासाठी जुलै २०१६ पासून किमान आठ मजूर कार्यरत आहे. एका मजुराच्या मागे १९३ रुपये रोजाप्रमाणे एका वर्षाचे ५ लक्ष ६३ हजार ५६० रुपये खर्च झाले. १३६० झाडेच जगल्यामुळे एका झाडाच्या संगोपनासाठी जवळपास ४३३ रुपये खर्च झाल्याचे दिसते. शासनाच्या नियमानुसार किमान दोन वर्ष या झाडांचे संगोपन करणे गरजेचे आहे. यामध्ये झाडांच्या लागवडीचा खर्च समाविष्ट नाही. गतवर्षी मोठा गाजावाजा करीत अनेक राजकीय, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन रोपट्यांची लागवड करीत सेल्फी काढून घेतल्या; परंतु ज्या रोपट्याची काय अवस्था आहे, ते जिवंत आहे की मेले याकडे मात्र अजिबात लक्ष दिले नाही. सर्व व्यवस्था, सोयी असताना इतक्या मोठया प्रमाणात रोपटे का नष्ट झाले यावर मंथन करणे गरजेचे आहे. आता पुन्हा १ जुलैला वृक्ष लागवडीचा मोठा उपक्रम शासनाने हाती घेतलेला आहे. त्या लागवडीमध्ये किमान ८० टक्के वृक्ष हे जिवंत राहिलेच पाहिजे हे निकष लावणे गरजेचे आहे. तरच झालेल्या खर्चाचा खऱ्या अर्थाने फायदा होईल, वृक्ष संवर्धनामध्ये शेतकरी प्रामुख्याने पुढाकार घेत असतो; परंतु माकडांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांनी बांधावरील वृक्षाची तोड केली आहे. शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करीत वृक्ष लागवड करुन त्याचे संगोपन केल्यास अनुदान देण्यात येईल अशी घोषणा केल्यास बांधावरील वृक्षाची संख्या झपाट्याने वाढू शकते. शासनाला रोजगार हमी योजनेत गरजूंना कामे देणेही महत्त्वाचे आहे. त्यांना वृक्षलागवडीऐवजी जलसंधारण, फळबागा लागवड, साफ सफाई, नर्सरीची निर्मिती यासारखी कामे दिल्यास ती ही अडचण दूर करता येवू शकते. ग्रामपंचायतीच्या अखत्यारित असलेले अनेक भुखंड रिकामे आहेत. या ठिकाणी बागा, खेळाचे मैदान रोजगार हमी योजनेतून तयार केले जाऊ शकतात. यामुळे गावाच्या सौंदर्यात भर पडू शकते. योग्य नियोजनाने या गोष्टी शक्य आहेत, परंतु फक्त कागदोपत्री योजना कश्या राबवायच्या याकडेच अधिकाऱ्यांचा कल असल्याने १ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण झाले. यातील किती वृक्ष जगले याचे संशोधन केल्यास खरे वास्तव कळल्याशिवाय राहणार नाही.