शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

एका झाडावर ४३३ रुपयांचा खर्च

By admin | Updated: June 28, 2017 00:47 IST

शासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात १ जुलै २०१६ पासून वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविण्यात आला.

तरीही ६४० वृक्ष वाळले : ग्रा.पं.त आठ मजूर कार्यरत हर्षल तोटे। लोकमत न्यूज नेटवर्क पवनार : शासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात १ जुलै २०१६ पासून वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविण्यात आला. यात पवनार ग्रामपंचायतीच्यावतीने २,००० वृक्ष लागवड केली. आज त्यापैकी १,३६० वृक्ष जिवंत आहे. या झाडांच्या संगोपनासाठी जुलै २०१६ पासून किमान आठ मजूर कार्यरत आहे. एका मजुराच्या मागे १९३ रुपये रोजाप्रमाणे एका वर्षाचे ५ लक्ष ६३ हजार ५६० रुपये खर्च झाले. १३६० झाडेच जगल्यामुळे एका झाडाच्या संगोपनासाठी जवळपास ४३३ रुपये खर्च झाल्याचे दिसते. शासनाच्या नियमानुसार किमान दोन वर्ष या झाडांचे संगोपन करणे गरजेचे आहे. यामध्ये झाडांच्या लागवडीचा खर्च समाविष्ट नाही. गतवर्षी मोठा गाजावाजा करीत अनेक राजकीय, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन रोपट्यांची लागवड करीत सेल्फी काढून घेतल्या; परंतु ज्या रोपट्याची काय अवस्था आहे, ते जिवंत आहे की मेले याकडे मात्र अजिबात लक्ष दिले नाही. सर्व व्यवस्था, सोयी असताना इतक्या मोठया प्रमाणात रोपटे का नष्ट झाले यावर मंथन करणे गरजेचे आहे. आता पुन्हा १ जुलैला वृक्ष लागवडीचा मोठा उपक्रम शासनाने हाती घेतलेला आहे. त्या लागवडीमध्ये किमान ८० टक्के वृक्ष हे जिवंत राहिलेच पाहिजे हे निकष लावणे गरजेचे आहे. तरच झालेल्या खर्चाचा खऱ्या अर्थाने फायदा होईल, वृक्ष संवर्धनामध्ये शेतकरी प्रामुख्याने पुढाकार घेत असतो; परंतु माकडांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांनी बांधावरील वृक्षाची तोड केली आहे. शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करीत वृक्ष लागवड करुन त्याचे संगोपन केल्यास अनुदान देण्यात येईल अशी घोषणा केल्यास बांधावरील वृक्षाची संख्या झपाट्याने वाढू शकते. शासनाला रोजगार हमी योजनेत गरजूंना कामे देणेही महत्त्वाचे आहे. त्यांना वृक्षलागवडीऐवजी जलसंधारण, फळबागा लागवड, साफ सफाई, नर्सरीची निर्मिती यासारखी कामे दिल्यास ती ही अडचण दूर करता येवू शकते. ग्रामपंचायतीच्या अखत्यारित असलेले अनेक भुखंड रिकामे आहेत. या ठिकाणी बागा, खेळाचे मैदान रोजगार हमी योजनेतून तयार केले जाऊ शकतात. यामुळे गावाच्या सौंदर्यात भर पडू शकते. योग्य नियोजनाने या गोष्टी शक्य आहेत, परंतु फक्त कागदोपत्री योजना कश्या राबवायच्या याकडेच अधिकाऱ्यांचा कल असल्याने १ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण झाले. यातील किती वृक्ष जगले याचे संशोधन केल्यास खरे वास्तव कळल्याशिवाय राहणार नाही.