शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
3
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
4
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
5
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
6
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
7
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
8
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
9
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
10
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
11
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
12
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
13
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
14
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
15
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
16
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
18
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
19
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
20
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न

४,२१२ नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांना ‘प्रेरणा’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 22:16 IST

मागील काही वर्षांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झाल्याने जगाला शांती व अहिंसेचा संदेश देणाºया गांधी जिल्ह्याला शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशीच नवी ओळख मिळाली. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी नोव्हेंबर २०१५ पासून प्रेरणा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । २०,०५७ शेतकऱ्यांचे समुपदेशन, आर्वी, हिंगणघाट, समुद्रपूर, कारंजा, पुलगाव अतिजोखमीचे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील काही वर्षांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झाल्याने जगाला शांती व अहिंसेचा संदेश देणाºया गांधी जिल्ह्याला शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशीच नवी ओळख मिळाली. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी नोव्हेंबर २०१५ पासून प्रेरणा प्रकल्प राबविण्यात येत आहे. याच प्रकल्पाची प्रभावी अंमलबजाणी करून नोव्हेंबर २०१५ ते एप्रिल २०१९ या कालावधीत एकूण ५ हजार २९५ नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांचा शोध घेण्यात आला. त्यापैकी ४ हजार २१२ शेतकऱ्यांना उपचार देऊन पाठपुरावा करण्यात येत आहे. शिवाय २० हजार ५७ शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे.जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांच्या नेतृत्त्वात जिल्ह्यात ‘प्रेरणा’ हा शासनाचा महत्त्वाकांशी प्रकल्प राबविल्या जात आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या शेतकरी आत्महत्या कशा थांबविता येईल यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रभावी प्रयत्न केले जात आहेत. नोव्हेंबर २०१५ ते एप्रिल २०१९ या कालावधीत जिल्ह्यातील ५ हजार २९५ शेतकरी नैराश्यग्रस्त असल्याचे पुढे आले. त्यापैकी ४ हजार २१२ शेतकºयांवर उपचार करून सध्या पाठपुरावा करण्यात येत आहे. तर याच कालावधीत वेळोवेळी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात तब्बल ३ हजार ४३५ शेतकरी व्यनाधिन असल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी १ हजार ५८६ व्यसनाधीन शेतकºयांवर उपचार सुरू आहेत. शिवाय त्यांची प्रकृती सुस्थितीत यावी यासाठी पाठपुरावाही केल्या जात आहे. शिवाय ३३ हजार १७४ शेतकरी मानसिक आजार किंवा दडपण तसेच इतर आजाराने ग्रासले असल्याची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे वर्धा जिल्ह्यातील आर्वी, हिंगणघाट, समुद्रपूर, कारंजा (घा.) तसेच पुलगाव हा परिसर अतिजोखमीचा असल्याचेही सर्वेक्षणात पुढे आले आहे.आशा स्वयंसेविकांचेही लाभते सहकार्यप्रेरणा प्रकल्पाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आशा स्वयंसेविकांचेही सहकार्य घेतले जात आहे. आशा स्वयंसेविकांनी केलेल्या सर्वेक्षणात २०१५-१६ मध्ये नैराश्यग्रस्त ९९९ शेतकरी, २०१७-१८ मध्ये १ हजार ४८ शेतकरी तर २०१८-१९ या आर्थिक वर्षात २ हजार ८७० शेतकरी आढळले. त्यापैकी वर्षनिहाय अनुक्रमे ५३०, ८७४ व २ हजार ६७६ नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांवर उपचार करण्यात आले आहेत.