शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

४,२१२ नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांना ‘प्रेरणा’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 22:16 IST

मागील काही वर्षांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झाल्याने जगाला शांती व अहिंसेचा संदेश देणाºया गांधी जिल्ह्याला शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशीच नवी ओळख मिळाली. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी नोव्हेंबर २०१५ पासून प्रेरणा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । २०,०५७ शेतकऱ्यांचे समुपदेशन, आर्वी, हिंगणघाट, समुद्रपूर, कारंजा, पुलगाव अतिजोखमीचे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील काही वर्षांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झाल्याने जगाला शांती व अहिंसेचा संदेश देणाºया गांधी जिल्ह्याला शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशीच नवी ओळख मिळाली. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी नोव्हेंबर २०१५ पासून प्रेरणा प्रकल्प राबविण्यात येत आहे. याच प्रकल्पाची प्रभावी अंमलबजाणी करून नोव्हेंबर २०१५ ते एप्रिल २०१९ या कालावधीत एकूण ५ हजार २९५ नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांचा शोध घेण्यात आला. त्यापैकी ४ हजार २१२ शेतकऱ्यांना उपचार देऊन पाठपुरावा करण्यात येत आहे. शिवाय २० हजार ५७ शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे.जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांच्या नेतृत्त्वात जिल्ह्यात ‘प्रेरणा’ हा शासनाचा महत्त्वाकांशी प्रकल्प राबविल्या जात आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या शेतकरी आत्महत्या कशा थांबविता येईल यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रभावी प्रयत्न केले जात आहेत. नोव्हेंबर २०१५ ते एप्रिल २०१९ या कालावधीत जिल्ह्यातील ५ हजार २९५ शेतकरी नैराश्यग्रस्त असल्याचे पुढे आले. त्यापैकी ४ हजार २१२ शेतकºयांवर उपचार करून सध्या पाठपुरावा करण्यात येत आहे. तर याच कालावधीत वेळोवेळी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात तब्बल ३ हजार ४३५ शेतकरी व्यनाधिन असल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी १ हजार ५८६ व्यसनाधीन शेतकºयांवर उपचार सुरू आहेत. शिवाय त्यांची प्रकृती सुस्थितीत यावी यासाठी पाठपुरावाही केल्या जात आहे. शिवाय ३३ हजार १७४ शेतकरी मानसिक आजार किंवा दडपण तसेच इतर आजाराने ग्रासले असल्याची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे वर्धा जिल्ह्यातील आर्वी, हिंगणघाट, समुद्रपूर, कारंजा (घा.) तसेच पुलगाव हा परिसर अतिजोखमीचा असल्याचेही सर्वेक्षणात पुढे आले आहे.आशा स्वयंसेविकांचेही लाभते सहकार्यप्रेरणा प्रकल्पाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आशा स्वयंसेविकांचेही सहकार्य घेतले जात आहे. आशा स्वयंसेविकांनी केलेल्या सर्वेक्षणात २०१५-१६ मध्ये नैराश्यग्रस्त ९९९ शेतकरी, २०१७-१८ मध्ये १ हजार ४८ शेतकरी तर २०१८-१९ या आर्थिक वर्षात २ हजार ८७० शेतकरी आढळले. त्यापैकी वर्षनिहाय अनुक्रमे ५३०, ८७४ व २ हजार ६७६ नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांवर उपचार करण्यात आले आहेत.