शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

४२ स्कूल बसला आरटीओचे ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 22:09 IST

स्कूल बसचे होणारे अपघात टाळण्याकरिता अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यात स्पीड गर्व्हनर, जीपीएस तंत्रज्ञानासह अन्य बाबींची सुधारणा करण्यात आली. असे असले तरी अवैध विद्यार्थी वाहतूक थांबत नसल्याचे दिसते.

ठळक मुद्दे२.८० लाखांचा दंड वसूल : ४८० पैकी २२६ वाहनांची केली तपासणी

प्रशांत हेलोंडे।ऑनलाईन लोकमतवर्धा : स्कूल बसचे होणारे अपघात टाळण्याकरिता अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यात स्पीड गर्व्हनर, जीपीएस तंत्रज्ञानासह अन्य बाबींची सुधारणा करण्यात आली. असे असले तरी अवैध विद्यार्थी वाहतूक थांबत नसल्याचे दिसते. याबाबत आरटीओने दहा महिन्यांत १६४ स्कूल बस आणि ६२ विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी अवैध वाहने तपासली. यातील ४२ वाहनांचे ब्रेक आरटीओकडून आवरण्यात आले आहेत.पाल्यांना शाळेत सोडणे आणि शाळेतून परत घरी आणणे, हे काम शहरांमध्ये पालकांसाठी जिकरीचे झाले आहे. स्कूल बस, आॅटो चालकाच्या विश्वासावर पाल्यांना शाळेत पाठवावे लागते. मागील काही वर्षांत बहुतांश शाळांनी स्वत:च्या स्कूल बस सुरू केल्या आहेत. असे असले तरी ज्यांना अधिक शुल्क अदा करणे शक्य होत नाही ते पालक आॅटोद्वारे आपल्या पाल्यांना शाळेत पाठवितात. मुंबई, नागपूर, वर्धेसह अनेक ठिकाणी स्कूल बस तथा विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया वाहनांना अपघात झाल्याच्या नोंदी आहेत. या घटना लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन विभागाकडून काही नियम घालून देण्यात आलेत. शिवाय वाहनांमध्येही सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यानुसार स्कूल बसमध्ये स्पीड गव्हर्नर बसविणे, जीपीएस तंत्रज्ञानाने वाहन सज्ज करणे, आसन व्यवस्था सुरळीत करणे, सुरक्षेच्या दृष्टीने खिडक्या, दारांना लोखंडी बार लावणे आदी सुधारणा सुचविल्या होत्या. शिवाय वाहन अपडेट ठेवण्याचेही निर्देश होते. या निर्देशांना बगल देणाऱ्या वाहनांवर आरटीओकडून कारवाई केली जाते.उपप्रादेशिक परिवहन विभागाने एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या दहा महिन्यांत नोंदणी असलेल्या ४८० पैकी १६४ स्कूल बस तथा ६२ विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने तपासली. यात ५८ स्कूल बस आणि ८ अवैध वाहने दोषी आढळून आली आहे. यातील ४२ वाहने आरटीओकडून अटकावून ठेवण्यात आली आहेत. या वाहन धारकांकडून २ लाख ८० हजार ९०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आलेला आहे. यातील १ लाख ५१ हजार ७०० रुपये तडजोड शुल्क तर १ लाख २९ हजार २०० रुपये विभागीय तडजोड शुल्क म्हणून वसूल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे शाळेत येणे-जाणे सुरक्षित व्हावे, पालकांची चिंता दूर व्हावी म्हणून स्कूल बस, आॅटो व अन्य वाहनांसाठी नियमावली तयार करण्यात आली; पण त्यालाच बगल दिली जात असेल तर कारवाईला सामोरे जावे लागेलच, असे आरटीओकडून सांगण्यात आले आहे.अपघात टाळण्यासाठी सुधारणास्कूल बसचे अपघात होऊन निरागस बालकांचे बळी जातात. अशा घटना राज्यात मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आरटीओकडून नियमांत सुधारणा करण्यात आली; पण त्यांनाही वाहनधारक जुमानत नसल्याने अपघात होतात. हे प्रकार रोखण्यासाठी आरटीओकडून वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. निरागस बालकांचे जीवन धोक्यात येऊ नये म्हणूनच वाहनांवर कारवाई केली जात असल्याने वाहनधारकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.शाळा, पालकांची सजगताआपल्या शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन येणारी वाहने अपडेटेड आहेत की नाही, याबाबत शाळेकडून वारंवार चौकशी होणे गरजेचे आहे. शिवाय पालकांनीही आपले पाल्य ज्या वाहनांद्वारे शाळेत जातात व परत येतात, ती वाहने आरटीओच्या नियमांप्रमाणे आहेत वा नाही, हे तपासणे, त्याबाबत वारंवार चौकशी करणे तथा नियमांचे ज्ञान मिळविणे गरजेचे झाले आहे.