शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
4
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
5
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
6
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
7
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
8
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
9
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
10
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
11
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
12
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
13
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
14
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
15
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
16
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
17
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
18
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
19
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
20
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...

४२ स्कूल बसला आरटीओचे ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 22:09 IST

स्कूल बसचे होणारे अपघात टाळण्याकरिता अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यात स्पीड गर्व्हनर, जीपीएस तंत्रज्ञानासह अन्य बाबींची सुधारणा करण्यात आली. असे असले तरी अवैध विद्यार्थी वाहतूक थांबत नसल्याचे दिसते.

ठळक मुद्दे२.८० लाखांचा दंड वसूल : ४८० पैकी २२६ वाहनांची केली तपासणी

प्रशांत हेलोंडे।ऑनलाईन लोकमतवर्धा : स्कूल बसचे होणारे अपघात टाळण्याकरिता अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यात स्पीड गर्व्हनर, जीपीएस तंत्रज्ञानासह अन्य बाबींची सुधारणा करण्यात आली. असे असले तरी अवैध विद्यार्थी वाहतूक थांबत नसल्याचे दिसते. याबाबत आरटीओने दहा महिन्यांत १६४ स्कूल बस आणि ६२ विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी अवैध वाहने तपासली. यातील ४२ वाहनांचे ब्रेक आरटीओकडून आवरण्यात आले आहेत.पाल्यांना शाळेत सोडणे आणि शाळेतून परत घरी आणणे, हे काम शहरांमध्ये पालकांसाठी जिकरीचे झाले आहे. स्कूल बस, आॅटो चालकाच्या विश्वासावर पाल्यांना शाळेत पाठवावे लागते. मागील काही वर्षांत बहुतांश शाळांनी स्वत:च्या स्कूल बस सुरू केल्या आहेत. असे असले तरी ज्यांना अधिक शुल्क अदा करणे शक्य होत नाही ते पालक आॅटोद्वारे आपल्या पाल्यांना शाळेत पाठवितात. मुंबई, नागपूर, वर्धेसह अनेक ठिकाणी स्कूल बस तथा विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया वाहनांना अपघात झाल्याच्या नोंदी आहेत. या घटना लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन विभागाकडून काही नियम घालून देण्यात आलेत. शिवाय वाहनांमध्येही सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यानुसार स्कूल बसमध्ये स्पीड गव्हर्नर बसविणे, जीपीएस तंत्रज्ञानाने वाहन सज्ज करणे, आसन व्यवस्था सुरळीत करणे, सुरक्षेच्या दृष्टीने खिडक्या, दारांना लोखंडी बार लावणे आदी सुधारणा सुचविल्या होत्या. शिवाय वाहन अपडेट ठेवण्याचेही निर्देश होते. या निर्देशांना बगल देणाऱ्या वाहनांवर आरटीओकडून कारवाई केली जाते.उपप्रादेशिक परिवहन विभागाने एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या दहा महिन्यांत नोंदणी असलेल्या ४८० पैकी १६४ स्कूल बस तथा ६२ विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने तपासली. यात ५८ स्कूल बस आणि ८ अवैध वाहने दोषी आढळून आली आहे. यातील ४२ वाहने आरटीओकडून अटकावून ठेवण्यात आली आहेत. या वाहन धारकांकडून २ लाख ८० हजार ९०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आलेला आहे. यातील १ लाख ५१ हजार ७०० रुपये तडजोड शुल्क तर १ लाख २९ हजार २०० रुपये विभागीय तडजोड शुल्क म्हणून वसूल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे शाळेत येणे-जाणे सुरक्षित व्हावे, पालकांची चिंता दूर व्हावी म्हणून स्कूल बस, आॅटो व अन्य वाहनांसाठी नियमावली तयार करण्यात आली; पण त्यालाच बगल दिली जात असेल तर कारवाईला सामोरे जावे लागेलच, असे आरटीओकडून सांगण्यात आले आहे.अपघात टाळण्यासाठी सुधारणास्कूल बसचे अपघात होऊन निरागस बालकांचे बळी जातात. अशा घटना राज्यात मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आरटीओकडून नियमांत सुधारणा करण्यात आली; पण त्यांनाही वाहनधारक जुमानत नसल्याने अपघात होतात. हे प्रकार रोखण्यासाठी आरटीओकडून वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. निरागस बालकांचे जीवन धोक्यात येऊ नये म्हणूनच वाहनांवर कारवाई केली जात असल्याने वाहनधारकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.शाळा, पालकांची सजगताआपल्या शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन येणारी वाहने अपडेटेड आहेत की नाही, याबाबत शाळेकडून वारंवार चौकशी होणे गरजेचे आहे. शिवाय पालकांनीही आपले पाल्य ज्या वाहनांद्वारे शाळेत जातात व परत येतात, ती वाहने आरटीओच्या नियमांप्रमाणे आहेत वा नाही, हे तपासणे, त्याबाबत वारंवार चौकशी करणे तथा नियमांचे ज्ञान मिळविणे गरजेचे झाले आहे.