शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

४२ स्कूल बसला आरटीओचे ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 22:09 IST

स्कूल बसचे होणारे अपघात टाळण्याकरिता अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यात स्पीड गर्व्हनर, जीपीएस तंत्रज्ञानासह अन्य बाबींची सुधारणा करण्यात आली. असे असले तरी अवैध विद्यार्थी वाहतूक थांबत नसल्याचे दिसते.

ठळक मुद्दे२.८० लाखांचा दंड वसूल : ४८० पैकी २२६ वाहनांची केली तपासणी

प्रशांत हेलोंडे।ऑनलाईन लोकमतवर्धा : स्कूल बसचे होणारे अपघात टाळण्याकरिता अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यात स्पीड गर्व्हनर, जीपीएस तंत्रज्ञानासह अन्य बाबींची सुधारणा करण्यात आली. असे असले तरी अवैध विद्यार्थी वाहतूक थांबत नसल्याचे दिसते. याबाबत आरटीओने दहा महिन्यांत १६४ स्कूल बस आणि ६२ विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी अवैध वाहने तपासली. यातील ४२ वाहनांचे ब्रेक आरटीओकडून आवरण्यात आले आहेत.पाल्यांना शाळेत सोडणे आणि शाळेतून परत घरी आणणे, हे काम शहरांमध्ये पालकांसाठी जिकरीचे झाले आहे. स्कूल बस, आॅटो चालकाच्या विश्वासावर पाल्यांना शाळेत पाठवावे लागते. मागील काही वर्षांत बहुतांश शाळांनी स्वत:च्या स्कूल बस सुरू केल्या आहेत. असे असले तरी ज्यांना अधिक शुल्क अदा करणे शक्य होत नाही ते पालक आॅटोद्वारे आपल्या पाल्यांना शाळेत पाठवितात. मुंबई, नागपूर, वर्धेसह अनेक ठिकाणी स्कूल बस तथा विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया वाहनांना अपघात झाल्याच्या नोंदी आहेत. या घटना लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन विभागाकडून काही नियम घालून देण्यात आलेत. शिवाय वाहनांमध्येही सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यानुसार स्कूल बसमध्ये स्पीड गव्हर्नर बसविणे, जीपीएस तंत्रज्ञानाने वाहन सज्ज करणे, आसन व्यवस्था सुरळीत करणे, सुरक्षेच्या दृष्टीने खिडक्या, दारांना लोखंडी बार लावणे आदी सुधारणा सुचविल्या होत्या. शिवाय वाहन अपडेट ठेवण्याचेही निर्देश होते. या निर्देशांना बगल देणाऱ्या वाहनांवर आरटीओकडून कारवाई केली जाते.उपप्रादेशिक परिवहन विभागाने एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या दहा महिन्यांत नोंदणी असलेल्या ४८० पैकी १६४ स्कूल बस तथा ६२ विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने तपासली. यात ५८ स्कूल बस आणि ८ अवैध वाहने दोषी आढळून आली आहे. यातील ४२ वाहने आरटीओकडून अटकावून ठेवण्यात आली आहेत. या वाहन धारकांकडून २ लाख ८० हजार ९०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आलेला आहे. यातील १ लाख ५१ हजार ७०० रुपये तडजोड शुल्क तर १ लाख २९ हजार २०० रुपये विभागीय तडजोड शुल्क म्हणून वसूल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे शाळेत येणे-जाणे सुरक्षित व्हावे, पालकांची चिंता दूर व्हावी म्हणून स्कूल बस, आॅटो व अन्य वाहनांसाठी नियमावली तयार करण्यात आली; पण त्यालाच बगल दिली जात असेल तर कारवाईला सामोरे जावे लागेलच, असे आरटीओकडून सांगण्यात आले आहे.अपघात टाळण्यासाठी सुधारणास्कूल बसचे अपघात होऊन निरागस बालकांचे बळी जातात. अशा घटना राज्यात मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आरटीओकडून नियमांत सुधारणा करण्यात आली; पण त्यांनाही वाहनधारक जुमानत नसल्याने अपघात होतात. हे प्रकार रोखण्यासाठी आरटीओकडून वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. निरागस बालकांचे जीवन धोक्यात येऊ नये म्हणूनच वाहनांवर कारवाई केली जात असल्याने वाहनधारकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.शाळा, पालकांची सजगताआपल्या शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन येणारी वाहने अपडेटेड आहेत की नाही, याबाबत शाळेकडून वारंवार चौकशी होणे गरजेचे आहे. शिवाय पालकांनीही आपले पाल्य ज्या वाहनांद्वारे शाळेत जातात व परत येतात, ती वाहने आरटीओच्या नियमांप्रमाणे आहेत वा नाही, हे तपासणे, त्याबाबत वारंवार चौकशी करणे तथा नियमांचे ज्ञान मिळविणे गरजेचे झाले आहे.