शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
3
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
4
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
5
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
6
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
7
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
8
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
9
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
10
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
11
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
12
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
13
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
14
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
15
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
16
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
17
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
18
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
19
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
20
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक

विकलांग निवृत्ती योजनेचे जिल्ह्यात ४११ लाभार्थी

By admin | Updated: September 8, 2016 00:41 IST

शासनस्तरावर इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे.

अंमलबजावणीकडे दुर्लक्ष : अपंगांची संख्या जास्त, लाभार्थी मोजकेच गौरव देशमुख  वर्धाशासनस्तरावर इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्हाभरातील केवळ ४११ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. विशेष म्हणजे मोठ्या संख्येने विकलांग लाभार्थी जिल्ह्यात आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण लाभार्थ्यांना हा लाभ मिळावा, अशी मागणी होत आहे.केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सर्व सामान्यांसाठी अनेक योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत; पण बहुतांश योजना केवळ नावापुरत्याच राबविण्यात येतात. काही योजनांसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे ती योजना कागदावरच राहते. अशा परिस्थितीत प्रशासकीय अधिकारी असो वा लोकप्रतिनिधी कुणीही याकडे लक्ष देण्यास तयार होत नाही. केवळ योजनेच्या नावावर निधी येतो आणि वर्ष अखेरीस आलेला निधी परत जातो. हा प्रकार नित्यनियमाने सुरू आहे. यात प्रामुख्याने इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेमधून ४०० आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेमधून २०० असे मिळून ६०० रूपये दिले जातात. याचे केवळ ४११ लाभार्थी जिल्ह्यात आहे. प्रत्यक्षात मात्र अपंगाच्या आकडा मोठा आहे. यासाठी आवश्यक असलेले निकष आणि अटीची पूर्तता करताना लाभार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. यात प्रशासकीय अधिकाऱ्यांचे असहकार धोरणे योजना राबविताना अडचणी निर्माण करतात. परिणामी, योजनेचा लाभ न घेतलेलाच बरा, असा समज लाभार्थ्यांमध्ये होत आहे. या योजनेसाठी २०१६-१७ मध्ये १३ लाख २३ हजार रूपये अनुदान वर्धा जिल्हा प्रशासनाकडे आले आहे. यातून मागील महिन्यापर्यंत ४ लाख ५० हजार रूपये अनुदान लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. योजना राबविताना येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने उपाय योजना करणे गरजेचे झाले आहे. योजना भरपूर पण फायदा बोटावर मोजक्याच लोकांचा मिळत असल्याचे वास्तव आहे.