शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

जिल्ह्यात ४० कोटींचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 23:03 IST

शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीक कर्ज दिले जाते. यंदा कर्जमाफी अस्पष्ट असल्याने कर्जवाटपाची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू आहे. जिल्ह्याला ८५० कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना १४ जूनपर्यंत केवळ ४० कोटींचेच पीक कर्ज वाटप होऊ शकले आहे.

ठळक मुद्दे८५० कोटींचे उद्दिष्ट गाठणे कठीणच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीक कर्ज दिले जाते. यंदा कर्जमाफी अस्पष्ट असल्याने कर्जवाटपाची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू आहे. जिल्ह्याला ८५० कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना १४ जूनपर्यंत केवळ ४० कोटींचेच पीक कर्ज वाटप होऊ शकले आहे. शेतकºयांना अद्याप पीक कर्जाचे वाटप न झाल्याने बी-बियाणे, शेतीसाहित्य व अन्य खरेदी रखडल्याचे चित्र आहे.प्रत्येक वर्षी सुमारे तीन लाख शेतकºयांकरिता ७०० ते ७५० कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्ह्याला दिले जाते. यंदा शेतकऱ्यांना अधिक मदत व्हावी म्हणून १०० कोटी वाढवून ८५० कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. शेतकºयांना कर्जमाफी दिल्याने यंदा सर्वच शेतकरी पीक कर्जाची उचल करतील, अशी अपेक्षा होती; पण अनेकांची कर्जमाफी अद्याप होऊ न शकल्याने पीक कर्ज वाटपाची गती मंदावली आहे. खरीप हंगामाला प्रारंभ झाला असताना केवळ ४० कोटींचे कर्जवाटप झाले. मग, ८५० कोटींचा टप्पा कधी गाठणार व शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार, हा प्रश्नच आहे.शेतकऱ्यांना नवीन कर्जासाठी घरपोच कागदपत्रे द्या- नवालछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील ६० हजार शेतकºयांचे कर्ज माफ झाले आहे. या शेतकºयांना सातबारा, ८ अ आदी कागदपत्रे घरपोच देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्यात.जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या पीक कर्ज आढावा बैठकीत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, सहायक उपनिबंधक उपस्थित होते.शेतकºयांचा शेती हंगाम सुरू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी नवीन कर्ज उपलब्ध होणे गरजेचे आहे. यासाठी ३० जूनपर्यंत कर्जमाफी झालेल्या शेतकºयांना बँकेमार्फत कर्ज उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावे. ज्यांची कर्जमाफी झाली आहे, त्यांची यादी पंचायत समितीमध्ये उपलब्ध आहे. शेतकºयांनी स्वत:चे नाव यादीत समाविष्ट असल्याची खात्री करून घ्यावी. या यादीत गाव, बँक, शेतकºयांच्या नावासह उल्लेख आहे. यादीप्रमाणे सर्व तहसीलदार यांनी शेतकºयांना सातबारा, नमुना ८ ‘अ’ व कर्जमाफीचे तलाठ्यांचे प्रमाणपत्र तथा नवीन कर्ज घेण्यासाठी अर्ज आदी कागदपत्रे घरपोच उपलब्ध करून द्यावे. यासाठी तलाठ्यांनी गरज पडल्यास गावातील स्वयंसहायता बचत गट, पोलीस पाटील, कोतवाल, आशा यांचे सहकार्य घ्यावे, अशा सूचना नवाल यांनी दिल्या. बँकेतून कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी काही अडचणी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील १८००२३३२३८३ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.तालुकास्तरावर गठित होणाºया समितीमध्ये तहसीलदार, बीडीओ, सहायक उपनिबंधक, तालुका कृषी अधिकारी यांचा समावेश करावा. या समितीचे नोडल अधिकारी म्हणून सहायक उपनिबंधकांनी काम पाहावे.बैठकीला जि.प. सीईओ अजय गुल्हाणे, आर्वीचे एसडीओ प्रकाश शर्मा, जिल्हा उपनिबंधक वालदे, अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर, सर्व तहसीलदार, बीडीओ सहा. उपनिबंधक उपस्थित होते.