शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
दिल्लीत तक्रार अन् मुंबईत डिल? उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेचा नेता भाजपशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, अंधारेंचा दावा
3
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
4
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
5
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
6
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
7
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
8
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
9
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
10
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
11
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
12
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
13
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
14
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
15
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
16
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
17
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
18
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
19
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
20
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४० कोटींचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 23:03 IST

शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीक कर्ज दिले जाते. यंदा कर्जमाफी अस्पष्ट असल्याने कर्जवाटपाची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू आहे. जिल्ह्याला ८५० कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना १४ जूनपर्यंत केवळ ४० कोटींचेच पीक कर्ज वाटप होऊ शकले आहे.

ठळक मुद्दे८५० कोटींचे उद्दिष्ट गाठणे कठीणच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीक कर्ज दिले जाते. यंदा कर्जमाफी अस्पष्ट असल्याने कर्जवाटपाची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू आहे. जिल्ह्याला ८५० कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना १४ जूनपर्यंत केवळ ४० कोटींचेच पीक कर्ज वाटप होऊ शकले आहे. शेतकºयांना अद्याप पीक कर्जाचे वाटप न झाल्याने बी-बियाणे, शेतीसाहित्य व अन्य खरेदी रखडल्याचे चित्र आहे.प्रत्येक वर्षी सुमारे तीन लाख शेतकºयांकरिता ७०० ते ७५० कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्ह्याला दिले जाते. यंदा शेतकऱ्यांना अधिक मदत व्हावी म्हणून १०० कोटी वाढवून ८५० कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. शेतकºयांना कर्जमाफी दिल्याने यंदा सर्वच शेतकरी पीक कर्जाची उचल करतील, अशी अपेक्षा होती; पण अनेकांची कर्जमाफी अद्याप होऊ न शकल्याने पीक कर्ज वाटपाची गती मंदावली आहे. खरीप हंगामाला प्रारंभ झाला असताना केवळ ४० कोटींचे कर्जवाटप झाले. मग, ८५० कोटींचा टप्पा कधी गाठणार व शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार, हा प्रश्नच आहे.शेतकऱ्यांना नवीन कर्जासाठी घरपोच कागदपत्रे द्या- नवालछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील ६० हजार शेतकºयांचे कर्ज माफ झाले आहे. या शेतकºयांना सातबारा, ८ अ आदी कागदपत्रे घरपोच देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्यात.जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या पीक कर्ज आढावा बैठकीत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, सहायक उपनिबंधक उपस्थित होते.शेतकºयांचा शेती हंगाम सुरू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी नवीन कर्ज उपलब्ध होणे गरजेचे आहे. यासाठी ३० जूनपर्यंत कर्जमाफी झालेल्या शेतकºयांना बँकेमार्फत कर्ज उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावे. ज्यांची कर्जमाफी झाली आहे, त्यांची यादी पंचायत समितीमध्ये उपलब्ध आहे. शेतकºयांनी स्वत:चे नाव यादीत समाविष्ट असल्याची खात्री करून घ्यावी. या यादीत गाव, बँक, शेतकºयांच्या नावासह उल्लेख आहे. यादीप्रमाणे सर्व तहसीलदार यांनी शेतकºयांना सातबारा, नमुना ८ ‘अ’ व कर्जमाफीचे तलाठ्यांचे प्रमाणपत्र तथा नवीन कर्ज घेण्यासाठी अर्ज आदी कागदपत्रे घरपोच उपलब्ध करून द्यावे. यासाठी तलाठ्यांनी गरज पडल्यास गावातील स्वयंसहायता बचत गट, पोलीस पाटील, कोतवाल, आशा यांचे सहकार्य घ्यावे, अशा सूचना नवाल यांनी दिल्या. बँकेतून कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी काही अडचणी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील १८००२३३२३८३ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.तालुकास्तरावर गठित होणाºया समितीमध्ये तहसीलदार, बीडीओ, सहायक उपनिबंधक, तालुका कृषी अधिकारी यांचा समावेश करावा. या समितीचे नोडल अधिकारी म्हणून सहायक उपनिबंधकांनी काम पाहावे.बैठकीला जि.प. सीईओ अजय गुल्हाणे, आर्वीचे एसडीओ प्रकाश शर्मा, जिल्हा उपनिबंधक वालदे, अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर, सर्व तहसीलदार, बीडीओ सहा. उपनिबंधक उपस्थित होते.